शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

बस पासेससाठी विद्यार्थ्यांची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 23:06 IST

२६ जूनपासून शैक्षणिक सत्र सुरू झाले असल्याने शाळेत जाण्यासाठी बाहेर गावावरील विद्यार्थ्यांची धावपळ वाढली आहे. परिणामी राज्य परिवहन महामंडळाच्या बस पासेससाठी आष्टी भागातील विद्यार्थ्यांना अहेरीच्या आगारात जाऊन पासेस घ्यावे लागत आहे. परिणामी विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास होत आहे.

ठळक मुद्देएसटीच्या कर्मचाऱ्याला अहेरीत बोलावले : आष्टी भागातील विद्यार्थ्यांची अडचण

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : २६ जूनपासून शैक्षणिक सत्र सुरू झाले असल्याने शाळेत जाण्यासाठी बाहेर गावावरील विद्यार्थ्यांची धावपळ वाढली आहे. परिणामी राज्य परिवहन महामंडळाच्या बस पासेससाठी आष्टी भागातील विद्यार्थ्यांना अहेरीच्या आगारात जाऊन पासेस घ्यावे लागत आहे. परिणामी विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास होत आहे.राज्य परिवहन महामंडळाच्या आष्टी येथील बसस्थानकावर एक कर्मचारी गेल्या तीन वर्षांपासून कार्यरत होते. यापूर्वी आष्टी येथूनच विद्यार्थिनींना बस पासेस मिळत होते. मात्र अहेरीच्या आगार प्रमुखाने आष्टीच्या त्या एकमेव कर्मचाºयाला अहेरीच्या आगारात बोलावून घेतले. त्यामुळे आता आष्टी भागातील विद्यार्थी, विद्यार्थिनी व कर्मचाऱ्यांना बस पासेससाठी धावपळ करावी लागत आहे.अहेरी डेपोमधील कर्मचारी देवराव ढवस हे गेल्या तीन वर्षांपासून आष्टी येथील बसस्थानकामध्ये कार्यरत आहे. या मार्गाने जाणाºया प्रत्येक बसची नोंद करणे, विद्यार्थ्यांच्या पासेस काढणे, कर्मचाºयांना त्रैमासिक, मासिक तसेच वार्षिक पास देणे आदी काम ते आष्टी येथून करीत होते. त्यामुळे यापूर्वी या भागातील विद्यार्थ्यांना स्थानिकस्तरावर पासेस मिळत होत्या. कर्मचाºयांनाही पासेसची सुविधा मिळत होती. यातून एसटी महामंडळाला वार्षिक २० लाख रुपयांचा नफा मिळत होता. मात्र गेल्या पाच दिवसांपूर्वीपासून अहेरीच्या आगार प्रमुखांनी सदर कर्मचाºयाला अहेरी आगारात बोलावून घेतले. त्यामुळे विद्यार्थ्यांना पासेस काढण्यासाठी आता अहेरीला जावे लागत आहे.२६ जूनपासून शाळा सुरू झाल्यापासून आष्टी भागातील मोठ्या गावांमध्ये असलेल्या शाळांमध्ये लगतच्या गावातील विद्यार्थी शिक्षण घेतात. बहुतांश विद्यार्थ्यांच्या गावी शाळा नसल्याने दुसºया गावच्या शाळेत ये-जा करून शिक्षण घ्यावे लागत आहे. अशा विद्यार्थ्यांना बस पासेसची गरज पडते. मात्र बस पासेसची व्यवस्था या वर्षी स्थानिक स्तरावर ठेवण्यात आली नाही. आष्टी भागातील काही विद्यार्थी बस पासेस काढण्यासाठी गडचिरोलीला गेले असता, त्यांना आष्टीलाच पासेस काढा असे सांगून महामंडळाच्या वतीने परत पाठविण्यात आले. एसटीची पास कोणत्याही डेपोतून काढून देणे गरजेचे आहे. परंतु ज्या भागातील विद्यार्थी असेल, त्याच भागातून पासेस काढा, असे एसटी कर्मचारी सांगतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना बस पासेससाठी हेलपाटे मारावे लागत आहे.सरकारने एकेकीकडे विद्यार्थ्यांसाठी बसेसची सुविधा उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. मोफत पासेस दिल्या जातात. मात्र या पासेससाठी विद्यार्थ्यांना धावपळ करावी लागत आहे. शैक्षणिक सत्र सुरू झाल्याने इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी शिक्षणाच्या कामात लागले आहेत. दरम्यान शाळा बुडू नये, यासाठी बाहेर गावातील विद्यार्थी महामंडळाच्या स्थानिक कार्यालयात जाऊन बस पासेससाठी अर्ज करीत आहेत. मात्र सदर कामात दिरंगाई केल्या जात असल्याने बºयाच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.मानव विकास मिशनच्या बसेस सुरू झाल्याच नाहीशाळा सुरू होऊन चार दिवस उलटले. मात्र अद्यापही मानव विकास मिशनच्या बसगाड्या मार्गावर सुरू करण्यात आल्या नाही. मानव विकास मिशनच्या बसफेºयांचे नियोजन एसटी महामंडळाने शाळा सुरू होण्यापूर्वी करायला पाहिजे होते. मात्र नियोजन ढासळल्याने याचा फटका बाहेर गावाहून शाळेच्या ठिकाणी ये-जा करणाºया शेकडो विद्यार्थी व विद्यार्थिनींना बसत आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय व आगाराच्या कार्यालयाला पत्र देऊन विद्यार्थ्यांसाठी असलेल्या मानव विकास मिशनच्या बसगाड्या सुरू कराव्या, अशी मागणी आष्टी परिसरातील पालकांसह विद्यार्थ्यांनी केली आहे. बस पासेससाठी गडचिरोली आगार, आरमोरी, देसाईगंज या ठिकाणच्या बसस्थानक कार्यालयात विद्यार्थ्यांची दिवसभर गर्दी दिसून येत आहे. सदर कामाचा वेग वाढविण्याची मागणी आहे.