शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
6
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
7
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
8
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
9
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
10
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
11
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
12
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
13
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
14
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
15
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
16
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
17
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
18
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
19
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
20
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!

बस पासेससाठी विद्यार्थ्यांची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 23:06 IST

२६ जूनपासून शैक्षणिक सत्र सुरू झाले असल्याने शाळेत जाण्यासाठी बाहेर गावावरील विद्यार्थ्यांची धावपळ वाढली आहे. परिणामी राज्य परिवहन महामंडळाच्या बस पासेससाठी आष्टी भागातील विद्यार्थ्यांना अहेरीच्या आगारात जाऊन पासेस घ्यावे लागत आहे. परिणामी विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास होत आहे.

ठळक मुद्देएसटीच्या कर्मचाऱ्याला अहेरीत बोलावले : आष्टी भागातील विद्यार्थ्यांची अडचण

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : २६ जूनपासून शैक्षणिक सत्र सुरू झाले असल्याने शाळेत जाण्यासाठी बाहेर गावावरील विद्यार्थ्यांची धावपळ वाढली आहे. परिणामी राज्य परिवहन महामंडळाच्या बस पासेससाठी आष्टी भागातील विद्यार्थ्यांना अहेरीच्या आगारात जाऊन पासेस घ्यावे लागत आहे. परिणामी विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास होत आहे.राज्य परिवहन महामंडळाच्या आष्टी येथील बसस्थानकावर एक कर्मचारी गेल्या तीन वर्षांपासून कार्यरत होते. यापूर्वी आष्टी येथूनच विद्यार्थिनींना बस पासेस मिळत होते. मात्र अहेरीच्या आगार प्रमुखाने आष्टीच्या त्या एकमेव कर्मचाºयाला अहेरीच्या आगारात बोलावून घेतले. त्यामुळे आता आष्टी भागातील विद्यार्थी, विद्यार्थिनी व कर्मचाऱ्यांना बस पासेससाठी धावपळ करावी लागत आहे.अहेरी डेपोमधील कर्मचारी देवराव ढवस हे गेल्या तीन वर्षांपासून आष्टी येथील बसस्थानकामध्ये कार्यरत आहे. या मार्गाने जाणाºया प्रत्येक बसची नोंद करणे, विद्यार्थ्यांच्या पासेस काढणे, कर्मचाºयांना त्रैमासिक, मासिक तसेच वार्षिक पास देणे आदी काम ते आष्टी येथून करीत होते. त्यामुळे यापूर्वी या भागातील विद्यार्थ्यांना स्थानिकस्तरावर पासेस मिळत होत्या. कर्मचाºयांनाही पासेसची सुविधा मिळत होती. यातून एसटी महामंडळाला वार्षिक २० लाख रुपयांचा नफा मिळत होता. मात्र गेल्या पाच दिवसांपूर्वीपासून अहेरीच्या आगार प्रमुखांनी सदर कर्मचाºयाला अहेरी आगारात बोलावून घेतले. त्यामुळे विद्यार्थ्यांना पासेस काढण्यासाठी आता अहेरीला जावे लागत आहे.२६ जूनपासून शाळा सुरू झाल्यापासून आष्टी भागातील मोठ्या गावांमध्ये असलेल्या शाळांमध्ये लगतच्या गावातील विद्यार्थी शिक्षण घेतात. बहुतांश विद्यार्थ्यांच्या गावी शाळा नसल्याने दुसºया गावच्या शाळेत ये-जा करून शिक्षण घ्यावे लागत आहे. अशा विद्यार्थ्यांना बस पासेसची गरज पडते. मात्र बस पासेसची व्यवस्था या वर्षी स्थानिक स्तरावर ठेवण्यात आली नाही. आष्टी भागातील काही विद्यार्थी बस पासेस काढण्यासाठी गडचिरोलीला गेले असता, त्यांना आष्टीलाच पासेस काढा असे सांगून महामंडळाच्या वतीने परत पाठविण्यात आले. एसटीची पास कोणत्याही डेपोतून काढून देणे गरजेचे आहे. परंतु ज्या भागातील विद्यार्थी असेल, त्याच भागातून पासेस काढा, असे एसटी कर्मचारी सांगतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना बस पासेससाठी हेलपाटे मारावे लागत आहे.सरकारने एकेकीकडे विद्यार्थ्यांसाठी बसेसची सुविधा उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. मोफत पासेस दिल्या जातात. मात्र या पासेससाठी विद्यार्थ्यांना धावपळ करावी लागत आहे. शैक्षणिक सत्र सुरू झाल्याने इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी शिक्षणाच्या कामात लागले आहेत. दरम्यान शाळा बुडू नये, यासाठी बाहेर गावातील विद्यार्थी महामंडळाच्या स्थानिक कार्यालयात जाऊन बस पासेससाठी अर्ज करीत आहेत. मात्र सदर कामात दिरंगाई केल्या जात असल्याने बºयाच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.मानव विकास मिशनच्या बसेस सुरू झाल्याच नाहीशाळा सुरू होऊन चार दिवस उलटले. मात्र अद्यापही मानव विकास मिशनच्या बसगाड्या मार्गावर सुरू करण्यात आल्या नाही. मानव विकास मिशनच्या बसफेºयांचे नियोजन एसटी महामंडळाने शाळा सुरू होण्यापूर्वी करायला पाहिजे होते. मात्र नियोजन ढासळल्याने याचा फटका बाहेर गावाहून शाळेच्या ठिकाणी ये-जा करणाºया शेकडो विद्यार्थी व विद्यार्थिनींना बसत आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय व आगाराच्या कार्यालयाला पत्र देऊन विद्यार्थ्यांसाठी असलेल्या मानव विकास मिशनच्या बसगाड्या सुरू कराव्या, अशी मागणी आष्टी परिसरातील पालकांसह विद्यार्थ्यांनी केली आहे. बस पासेससाठी गडचिरोली आगार, आरमोरी, देसाईगंज या ठिकाणच्या बसस्थानक कार्यालयात विद्यार्थ्यांची दिवसभर गर्दी दिसून येत आहे. सदर कामाचा वेग वाढविण्याची मागणी आहे.