शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
2
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
3
'काम करा नाहीतर निलंबित होण्यासाठी तयार रहा', मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा अधिकाऱ्यांना इशारा
4
ती म्हणाली होती की,... 'मॅन ऑफ द मॅच' वेळी सूर्या भाऊला आली बायकोची आठवण
5
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
6
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
7
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
8
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
9
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
10
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
11
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
12
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
13
लातुरात लॉजवरच सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांची धाड, दोन महिलांची सुटका; सात जणांना अटक
14
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
15
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
16
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
17
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
18
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
19
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
20
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव

विद्यार्थ्यांचा शौचविधी उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 22:45 IST

सर्पदंशाने आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू होण्याच्या घटना वारंवार घडत असतानाही आदिवासी आश्रमशाळा-वसतिगृहांमधील परिस्थितीत बदल होताना दिसत नाही.

ठळक मुद्देसर्पदंशाच्या घटनेची पुनरावृत्ती शक्य : कोठीच्या आश्रमशाळेतील वास्तव, पलंगाअभावी खाली झोपतात विद्यार्थी

रमेश मारगोनवार ।लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : सर्पदंशाने आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू होण्याच्या घटना वारंवार घडत असतानाही आदिवासी आश्रमशाळा-वसतिगृहांमधील परिस्थितीत बदल होताना दिसत नाही. भामरागड आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत येणाºया कोठी येथील पहिली ते दहावीच्या १०६ मुलांना शौचालयाच्या दुरवस्थेमुळे रात्री-बेरात्री जीव मुठीत घेऊन चक्क उघड्यावर शौचविधीसाठी जावे लागत आहे. यामुळे सर्पदंशाच्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रशासकीय यंत्रणेची ही दिरंगाई म्हणजे ‘कळते पण वळत नाही’ अशी स्थिती आहे.कोठी येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत पहिली ते दहावीपर्यंत शिकणारे २२३ विद्यार्थी आहेत. त्यापैकी १६७ विद्यार्थी वसतिगृहात राहतात. त्यात १०६ मुले आणि ६१ मुली आहेत. परंतू एवढ्या विद्यार्थ्यांच्या निवासाच्या व्यवस्थेचे मात्र तीनतेरा वाजले आहे. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होत आहे.सर्वात महत्वाचे म्हणजे मुलांच्या शौचालयाची अत्यंत वाईट अवस्था आहे. सेप्टिक टँक फुटलेला आहे. शौचालय चोकअप झालेले आहेत. पण त्याच्या दुरूस्तीकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नाही. परिणामी सर्व मुलांना शौचविधीसाठी बाहेर जावे लागते. शाळेत स्वच्छ भारत अभियानाचे धडे गिरवताना प्रत्यक्षात मात्र विद्यार्थ्यांना बाहेर शौचास जावे लागते. रात्रीच्या अंधारात बाहेर शौचास जाताना साप-विंचवाची भिती असते. पण शाळा प्रशासनाला त्याचे काहीही वाटत नाही.गेल्यावर्षी याच आश्रमशाळेच्या दुरवस्थेवर लोकमतने केलेल्या स्टिंग आॅपरेशननंतर मुलींच्या शौचालय, स्रानगृहाची चांगली सोय करण्यात आली. पण मुलांच्या नशिबी अजूनही नरकयातना आहेत. शाळेचे वॉल कंपाऊंड तुटून पडल्याने मोकाट गुरांचा शाळेच्या आवारात मुक्तसंचार असतो. सात-आठ वर्षापूर्वी एका वर्गखोलीचे आणि कर्मचाºयांच्या वसाहतीचे बांधकाम करण्यात आले. पण तेही निकृष्ट दर्जाचे होते. तरीही तत्कालीन प्रकल्प अधिकाºयांनी ते ताब्यात घेतले. त्यावरून कामाच्या दर्जाविषयी अधिकारी किंवा कंत्राटदार यांना काहीही घेणे देणे नसल्याचे स्पष्ट होते. वरिष्ठ अधिकाºयांनी कोणतीही दुर्घटना होण्यापूर्वी सावध होणे गरजेचे आहे.जमिनीवर झोपतात १०६ मुलेया आश्रमशाळेच्या नवीन इमारतीमध्ये यावर्षीपासून वर्ग भरत आहेत. परंतू निवास व्यवस्थेत कोणतीही सुधारणा करण्यात आलेली नाही. तळमजल्यावर असलेल्या एका बहुउद्देशिय सभागृहात १०६ मुले दाटीवाटीने झोपतात. विशेष म्हणजे त्यांना झोपण्यासाठी पलंगही नाहीत. त्यामुळे फरशीवर गादी किंवा चादर टाकून झोपावे लागते. अशात रात्रीच्या वेळी विषारी सापाने त्या सभागृहात प्रवेश केल्यास विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे. पण त्याचे कोणालाही काही सोयरसुतक दिसत नाही. पालकवर्गाने वारंवार पलंग उपलब्ध करण्याची मागणी केली, मात्र काही फरक पडला नाही.दुरवस्थेला जबादार कोण?कोठीच्या शासकीय आश्रमशाळेतील या दुरवस्थेबद्दल भामरागडचे प्रकल्प अधिकारी मोरे यांना विचारणा केली असता त्यांनी वेळ मारून नेण्याचे उत्तर दिले. जुन्या वर्गखोल्यांची डागडुजी करून तिथे मुलांची निवास व्यवस्था करणार असल्याचे ते म्हणाले. पलंगांची व्यवस्था, शौचालयांची दुरूस्ती, कर्मचाºयांची रिक्त पदे आणि इतर समस्यांसाठी वरिष्ठांकडे पाठपुरावा केला आहे, पण प्रशासनाकडून मंजुरी आल्यावरच या गोष्टी होतील असे ते म्हणाले. यामुळे दुरवस्थेसाठी नेमके जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.महिला अधीक्षकाचे पद रिक्त६१ मुली वसतिगृहात राहात असताना या ठिकाणी महिला अधीक्षकाचे पद रिक्त आहे. एका महिला सहायक शिक्षिकेकडे तात्पुरता अतिरिक्त प्रभार दिला आहे. पण त्या मुलींसाठी पूर्ण वेळ देऊ शकत नाही. यावरून मुलींच्या सुरक्षिततेबाबत आदिवासी प्रकल्प विभाग किती गंभीर आहे हे दिसून येते.थंड पाण्याने आंघोळ, जनरेटरअभावी अंधाराचे साम्राज्यया वसतिगृहातील सोलर वॉटर हिटर लावले तेव्हापासूनच बंद अवस्थेत आहे. त्यामुळे ते नवीन लावले होते की कुठले बंद पडलेले लावले होते हेच कळायला मार्ग नाही. अशात विद्यार्थ्यांना थंड पाण्यानेच आंघोळ करावी लागत आहे. येणाºया हिवाळ्याच्या दिवसातही ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.येथील जनरेटर अनेक दिवसांपासून बाहेरच धूळखात आणि गंजत पडून आहे. कितीही वेळ वीज पुरवठा खंडित झाला तरी जनरेटर सुरू होत नाही. कागदोपत्री मात्र जनरेटर सुरू असण्याची शक्यता नाकारता येत नाही. नळावर लावलेले मोटरपंप बंद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना हातपंपावर जाऊन कपडे धुवावे लागतात.