शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

विद्यार्थ्यांनी उलगडले गांधीजींचे व्यक्तिमत्त्व

By admin | Updated: October 4, 2014 23:27 IST

अहिंसेच्या मार्गाने भारताला स्वातंत्र मिळवून देण्याबरोबरच जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे व्यक्तिमत्त्व उलगडण्याचा प्रयत्न गडचिरोली येथील विद्यार्थ्यांनी निबंध

गडचिरोली : अहिंसेच्या मार्गाने भारताला स्वातंत्र मिळवून देण्याबरोबरच जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे व्यक्तिमत्त्व उलगडण्याचा प्रयत्न गडचिरोली येथील विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धेदरम्यान केला. गांधीजींच्या जीवनाबद्दलचे विद्यार्थ्यांनी निबंधाच्या माध्यमातून व्यक्त केलेले विचार वाचून मान्यवरही मंत्रमुग्ध झाले. लोकमत बालविकास मंच व गोंडवाना सैनिकी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गांधी जयंतीनिमित्त महात्मा गांधी यांचे व्यक्तिमत्त्व, विचार व कार्य या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. वर्ग ५ ते ७ च्या विद्यार्थ्यांचा अ गट व ८ ते १० पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा ब गट पाडण्यात आले होते. सदर स्पर्धा २ आॅक्टोबर रोजी गोंडवाना सैनिकी विद्यालयात घेण्यात आली. याप्रसंगी उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. राहुल खाडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोेंडवाना सैनिकी विद्यालयाचे प्राचार्य संजय भांडाकर होते. प्रमुख अतिथी म्हणून लोकमत सखी मंचच्या सहसंयोजिका सोनिया बैस, बाल विकास मंचच्या जिल्हा संयोजिका किरण पवार आदी मान्यवर उपस्थित होते. निबंध स्पर्धेत अ गटातून प्रथम क्रमांक गोंडवाना सैनिकी विद्यालयाचा विद्यार्थी युग उरकुंटवार, द्वितीय क्रमांक कारमेल हायस्कूलचा विद्यार्थी सार्थक संजय खांडरे याने पटकाविला. गोंडवाना सैनिकी विद्यालयाचे सुरज वसंत गव्हारे, अथर्व श्रीपदवार, रोहित रामटेके यांना प्रोत्साहनपर पारितोषिक देण्यात आले. ब गटात प्रथम पारितोषिक गोंडवाना सैनिकी विद्यालयाचा साहिल मोगरे, द्वितीय क्रमांक दिव्यानी दिलीप कांबळे यांनी पटकाविला. प्रोत्साहनपर पारितोषिक शिवाजी विद्यालयाचा ओंकार कुटे व गोंडवाना सैनिकी विद्यालयाचे शुभम कन्नाके व डेनिस उईके यांनी पटकाविला. प्रथम येणाऱ्यास १ हजार रूपये, द्वितीय येणाऱ्यास ५०० रूपये व प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून १०० रूपये रोख देण्यात आले. संचालन कुळमेथे तर आभार रेचनकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उंदीरवाडे यांच्यासह शाळेतील शिक्षकांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)