शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

विद्यार्थ्यांनी उच्चपदे मिळवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 00:47 IST

स्पर्धत टिकायचे असेल तर सर्वांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळणे आवश्यक आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे याकरिता आदिवासी विकास विभागामार्फत २४ कोटी रुपये खर्च करून ,,,,,,,,,,

ठळक मुद्दे्रपालकमंत्र्यांचे प्रतिपादन : एकलव्य विद्यालयाच्या इमारतीचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : स्पर्धत टिकायचे असेल तर सर्वांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळणे आवश्यक आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे याकरिता आदिवासी विकास विभागामार्फत २४ कोटी रुपये खर्च करून अहेरीत इंग्रजी माध्यमाचे निवासी एकलव्य मॉडेल स्कूल सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यात ८० कोटी रुपये खर्च करून आदिवासी विद्यार्थ्यांकरिता वसतिगृह बांधले जात आहेत या सर्व शैक्षणिक सोयीसुविधांचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी उच्चपदस्थ अधिकारी व्हावे, असे प्रतिपादन पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले.अहेरी येथे आदिवासी विकास विभागाकडून इसत्ता ६ वी ते १२ वी पर्यंतच्या आदिवासी विदयार्थ्यांसाठी इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळावे याकरिता एकलव्य निवासी विद्यालय बांधण्यात आले. या इमारतीच्या लोकार्पणप्रसंगी शुक्रवारी ते बोलत होते.सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून जि. प. अध्यक्ष योगीता भांडेकर, केंद्रीय जनजातीय कार्य मंत्रालयाचे सचिव दीपक खांडेकर, महाराष्ट्र आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अहेरीच्या नगराध्यक्ष हर्षा ठाकरे, जि. प. समाजकल्याण सभापती माधुरी उरेते, न.पं. उपाध्यक्ष कमल पडगेलवार, नगरसेविका स्मिता येमुलवार सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. सचिन अंबोसे, अहेरीच्या प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजय बंसल उपस्थित होते.अहेरी विधानसभा क्षेत्रात अनेक विकासकामे सुरु झाली आहेत. शिक्षण, आरोग्य, रस्ते, वीज, पाणी, शेती सिंचन आदी कामे सुरू आहेत. येत्या काही दिवसात अहेरी जिल्ह्याची निर्मिती होईल. वेगळा जिल्हा झाला तर अधिक गतीने विकास होईल, असेही पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी सांगितले. यावेळी दीपक खांडेकर यांनीही मार्गदर्शन केले. मनीषा वर्मा यांनी राज्यात २० एकलव्य शाळा निर्माण केल्या जाणार आहेत. या प्रत्येक शाळांच्या माध्यमातून इयत्ता सहावी ते बारावीपर्यं ४७० विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाणार आहे,असे सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. इंदूराणी जाखड, संचालन शिक्षक भाऊराव पोटे तर आभार सतीश पडघन यांनीे मानले. यावेळी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.