शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी उच्चपदे मिळवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 00:47 IST

स्पर्धत टिकायचे असेल तर सर्वांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळणे आवश्यक आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे याकरिता आदिवासी विकास विभागामार्फत २४ कोटी रुपये खर्च करून ,,,,,,,,,,

ठळक मुद्दे्रपालकमंत्र्यांचे प्रतिपादन : एकलव्य विद्यालयाच्या इमारतीचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : स्पर्धत टिकायचे असेल तर सर्वांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळणे आवश्यक आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे याकरिता आदिवासी विकास विभागामार्फत २४ कोटी रुपये खर्च करून अहेरीत इंग्रजी माध्यमाचे निवासी एकलव्य मॉडेल स्कूल सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यात ८० कोटी रुपये खर्च करून आदिवासी विद्यार्थ्यांकरिता वसतिगृह बांधले जात आहेत या सर्व शैक्षणिक सोयीसुविधांचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी उच्चपदस्थ अधिकारी व्हावे, असे प्रतिपादन पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले.अहेरी येथे आदिवासी विकास विभागाकडून इसत्ता ६ वी ते १२ वी पर्यंतच्या आदिवासी विदयार्थ्यांसाठी इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळावे याकरिता एकलव्य निवासी विद्यालय बांधण्यात आले. या इमारतीच्या लोकार्पणप्रसंगी शुक्रवारी ते बोलत होते.सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून जि. प. अध्यक्ष योगीता भांडेकर, केंद्रीय जनजातीय कार्य मंत्रालयाचे सचिव दीपक खांडेकर, महाराष्ट्र आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अहेरीच्या नगराध्यक्ष हर्षा ठाकरे, जि. प. समाजकल्याण सभापती माधुरी उरेते, न.पं. उपाध्यक्ष कमल पडगेलवार, नगरसेविका स्मिता येमुलवार सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. सचिन अंबोसे, अहेरीच्या प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजय बंसल उपस्थित होते.अहेरी विधानसभा क्षेत्रात अनेक विकासकामे सुरु झाली आहेत. शिक्षण, आरोग्य, रस्ते, वीज, पाणी, शेती सिंचन आदी कामे सुरू आहेत. येत्या काही दिवसात अहेरी जिल्ह्याची निर्मिती होईल. वेगळा जिल्हा झाला तर अधिक गतीने विकास होईल, असेही पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी सांगितले. यावेळी दीपक खांडेकर यांनीही मार्गदर्शन केले. मनीषा वर्मा यांनी राज्यात २० एकलव्य शाळा निर्माण केल्या जाणार आहेत. या प्रत्येक शाळांच्या माध्यमातून इयत्ता सहावी ते बारावीपर्यं ४७० विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाणार आहे,असे सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. इंदूराणी जाखड, संचालन शिक्षक भाऊराव पोटे तर आभार सतीश पडघन यांनीे मानले. यावेळी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.