शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

स्पर्धा परीक्षांच्या ‘तारीख पे तारीख’मुळे विद्यार्थी गाेंधळात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 05:00 IST

मार्च २०२०मध्ये आयाेजित करण्यात आलेली राज्य सेवेची पूर्व परीक्षा तब्बल एक वर्ष उशिरा म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आली. कंबाईन परीक्षा तर दीड वर्षांपासून झालीच नाही. अनेक परीक्षा नियाेजित वेळेत घेतल्या जात नाहीत. परीक्षा घेतली तर त्याचा निकाल लावला जात नाही. निकाल घाेषित केला तर नाेकरी दिली जात नसल्याने एमपीएससी परीक्षा देणारे युवक गाेंधळात सापडले आहेत.

ठळक मुद्देदाेन वर्षांपासून पदभरतीच नाही, तयारीसाठी शहरात राहाणे झाले कठीण

दिगांबर जवादेलाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : विविध पदांची भरती  करण्यासाठी जाहिरात काढू, असे आश्वासन मंत्र्यांकडून दिले जात असले तरी मागील दाेन वर्षांपासून एमपीएससीसह इतरही पदांच्या जागा निघाल्या नाहीत. विद्यार्थी केवळ आश्वासनांवर भराेसा ठेवून आहेत. जागा निघणार की नाहीत, याबाबत विद्यार्थी गाेंधळात सापडले आहेत. मार्च २०२०मध्ये आयाेजित करण्यात आलेली राज्य सेवेची पूर्व परीक्षा तब्बल एक वर्ष उशिरा म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आली. कंबाईन परीक्षा तर दीड वर्षांपासून झालीच नाही. अनेक परीक्षा नियाेजित वेळेत घेतल्या जात नाहीत. परीक्षा घेतली तर त्याचा निकाल लावला जात नाही. निकाल घाेषित केला तर नाेकरी दिली जात नसल्याने एमपीएससी परीक्षा देणारे युवक गाेंधळात सापडले आहेत. तलाठी, ग्रामसेवक, लिपीक, आराेग्य सेवक आदी पदेही रिक्त आहेत. ही पदेसुद्धा भरण्यात आली नाहीत. ग्रामीण भागातील अनेक युवक या परीक्षेच्या माध्यमातून नाेकरी मिळवितात. मात्र, या नाेकऱ्याही मिळवणे कठीण झाले आहे. 

वय निघून चालले

एका निश्चित वेळी परीक्षा हाेणार आहे, असे गृहीत धरून अभ्यास केला जाते. मात्र, वेळाेवेळी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने पुन्हा रिव्हिजन करावी लागत आहे. यामुळे निराशा येते. परीक्षा झाल्यानंतर मी शहरातील खाेली साेडून गावाकडे येईन, असे आई-वडिलांना सांगितले आहे. मात्र, परीक्षा पुढे ढकलल्याने शहरातच राहावे लागत आहे. त्यामुळे निराश झालो आहे.  - मंगेश माेहुर्ले, परीक्षार्थी

मागील दाेन वर्षाांपासून एमपीएससीच्या परीक्षा झाल्या नाहीत. एमपीएससीच्या तयारीसाठी शहरात राहून आर्थिक व मानसिक खच्चीकरण हाेत आहे. अधिक काळ तग धरणे शक्य नाही. शासनाने परीक्षा लवकरात लवकर घ्यावी. वय निघून जात असल्याने चिंता निर्माण झाली आहे. - अजय वेलादी, परीक्षार्थी

लाखाे रुपये खर्चून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा सेटअप उभारण्यात आला. मात्र, मागील दीड वर्षांपासून काेराेनामुळे क्लासेस घेण्यास मनाई करण्यात आली आहे. तेव्हापासूनच संस्था अडचणीत आली आहे.  कर्ज घेऊन सेटअप उभारला आहे. कर्जाचे हप्ते भरणेही कठीण झाले आहे. दीड वर्षात आलेले लाखाे रुपयांचे लाईटबिल भरण्यात आले आहे. ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहिल्यास संस्था चालविणे कठीण हाेईल. - संताेष बाेलूवार, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रप्रमुख

माेठ्या बॅनरचे अतिक्रमण

एमपीएससी मार्गदर्शन केंद्र माेठा बॅनर असलेल्या संस्था चालवित हाेत्या. काेराेनापूर्वी त्यांना फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र, काेराेना कालावधीत अनेक संस्थांनी ऑनलाईन क्लासेस सुरू केले आहेत. त्यामुळे युवक माेठ्या बॅनरचे क्लास करण्यास पसंती दर्शवत असल्याचे दिसून येत आहे. याचा फटका लहान संस्थांना बसत आहे.

 

टॅग्स :examपरीक्षा