शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी झोपतात वर्गखोलीत

By admin | Updated: September 12, 2015 01:20 IST

भामरागड तालुक्यातील लाहेरी येथील शासकीय आश्रमशाळेतील निवासी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह बांधण्यात आले नाही.

लाहेरी आश्रमशाळेची विदारक परिस्थिती : रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानदेवराव येरकलवार  लाहेरीभामरागड तालुक्यातील लाहेरी येथील शासकीय आश्रमशाळेतील निवासी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह बांधण्यात आले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना वर्गखोल्यांमध्येच झोपावे लागत आहे. विशेष म्हणजे पलंगाचा पुरवठा करण्यात आला नसल्याने जमिनीवरच झोपून रात्र काढावी लागत आहे. भामरागड तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या लाहेरी या दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी, यासाठी शासनाने आश्रमशाळा सुरू केली. सदर आश्रमशाळेची इमारत जीर्ण झाल्याने मागील वर्षी नवीन आश्रमशाळेची प्रशस्त इमारत बांधण्यात आली आहे. शाळेच्या इमारतीबरोबरच मुलींसाठी वसतिगृहाचीही इमारत बांधण्यात आली. मात्र मुलांसाठी स्वतंत्र वसतिगृह बांधण्यात आले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना वर्गखोल्यांमध्येच झोपावे लागत आहे. दिवसभर शिक्षण व रात्री त्याच वर्गखोलीत झोपण्याची पाळी विद्यार्थ्यांवर आली आहे. आश्रमशाळेची नवीन इमारत बांधून एक वर्षांचा कालावधी पूर्ण झाला असला तरी त्या इमारतीचा ताबा अजूनपर्यंत शाळेकडे देण्यात आला नाही. जुनी आश्रमशाळेची इमारत जीर्ण झाली आहे. मात्र याच आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांना बसावे लागत आहे. सदर इमारत कोसळून मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तीन वर्षांपूर्वी शाळेला विद्युत जनरेटर पुरविण्यात आले. मात्र डिझेलची व्यवस्था नाही. डिझेलसाठी स्वतंत्र तरतूद करण्यात आली नाही. त्यामुळे लाखो रूपये खर्चुन खरेदी केलेले जनरेटर केवळ शोभेची वस्तू बनली आहे. लाहेरी ते भामरागडचे अंतर १६ किमी आहे. एवढ्या दूर अंतरावरून डिझेल कसे आणायचे हा सुद्धा प्रश्न शाळा व्यवस्थापनासमोर निर्माण होतो. त्यामुळे सदर जनरेटर अजूनपर्यंत सुरू सुद्धा झाले नाही. सोलर वॉटर हिटरचीही तीच परिस्थिती आहे. यावर झालेला लाखोंचा खर्च पाण्यात गेला आहे. स्वयंपाक घराभोवती चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या चिखलाची दुर्गंधी स्वयंपाक घरात येते. चिखलावर माशा घोंगावत असून त्या अन्नावर बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. आश्रमशाळा इमारतीच्या परिसरात हातपंप असून सदर हातपंप चिखलाने वेढले आहे. आश्रमशाळेतील या दुरावस्थेने विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. लाखो रूपये खर्चून बांधण्यात आलेल्या नवीन इमारतीचा ताबा आश्रमशाळा प्रशासनाकडे देऊन त्या ठिकाणी वर्ग सुरू करावे, अशी मागणी आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.