शहरं
Join us  
Trending Stories
1
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
2
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
3
पाकिस्तानमध्ये अजब घोटाळा! डिलिव्हरी न करता अब्जावधींचे पेमेंट; कपडे अन् शूजवर पाण्यासारखे पैसे वाया गेले
4
सुझलॉनमध्ये पैसे गुंतवलेत? आता झालाय मोठा बदल, गुंतवणूकदारांना माहीत असणं गरजेचं
5
Sonam Raghuwanshi : राजाच्या हत्येनंतर १४ दिवस फ्लॅटमध्ये काय करत होती सोनम? चौकशीदरम्यान मोठा खुलासा
6
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
7
शर्यतीच्या नादात पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने दोघांचा उडवलं; बापाने चोप देत पोलिसांकडे सोपवलं
8
...अन् कोट्यवधींच्या अलिशान कारमधून फिरणारा चहल बुलेटचा ठोका ऐकून झाला थक्क (VIDEO)
9
Karur Vysya Bank Ltd Bonus Share: चौथ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; २५ जुलैपूर्वी होणार निर्णय, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
कोर्टात लव्ह मॅरेज, लग्नानंतर सातत्याने भांडण; Video रेकॉर्ड करून युवकानं जीवन संपवलं
11
'माफी मागा...', एअर इंडिया विमान अपघाताच्या बातमीवर वैमानिकांनी डब्ल्यूएसजेला नोटीस पाठवली
12
रश्मी वहिनींसह उद्धव ठाकरे पोहोचले संजय राऊतांच्या घरी; नेमके कारण काय? चर्चांना उधाण
13
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या घरांसाठी फॉर्म कसा भरायचा? जाणून घ्या अर्ज करण्याची अगदी सोपी पद्धत!
14
"हा शिक्षक नाही राक्षस आहे"; नापास करायची भीती दाखवून शाळेत २३ मुलांचे लैंगिक शोषण, व्हिडिओ बनवले
15
What Is Option Trading: किती धोकादायक आहे ऑप्शन ट्रेडिंग? या व्यक्तीचे ५५ लाख बुडाले; असा होतो 'गेम'
16
WCL 2025 : पाकनं मॅच जिंकली; पण मैदानातील 'गडबड-घोटाळ्या'मुळं झाली फजिती! व्हिडिओ व्हायरल
17
वाफवलेलं की उकडलेलं... कोणतं अन्न आरोग्यासाठी जास्त चांगलं? फायदे समजल्यावर तुम्हीही खाल
18
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
19
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
20
Reliance Q1 Results: ही आहे मुकेश अंबानींची जादू; ३ महिन्यांत केली २६,९९४ कोटी रुपयांची कमाई, जाणून घ्या

विद्यार्थी झोपतात वर्गखोलीत

By admin | Updated: September 12, 2015 01:20 IST

भामरागड तालुक्यातील लाहेरी येथील शासकीय आश्रमशाळेतील निवासी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह बांधण्यात आले नाही.

लाहेरी आश्रमशाळेची विदारक परिस्थिती : रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानदेवराव येरकलवार  लाहेरीभामरागड तालुक्यातील लाहेरी येथील शासकीय आश्रमशाळेतील निवासी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह बांधण्यात आले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना वर्गखोल्यांमध्येच झोपावे लागत आहे. विशेष म्हणजे पलंगाचा पुरवठा करण्यात आला नसल्याने जमिनीवरच झोपून रात्र काढावी लागत आहे. भामरागड तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या लाहेरी या दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी, यासाठी शासनाने आश्रमशाळा सुरू केली. सदर आश्रमशाळेची इमारत जीर्ण झाल्याने मागील वर्षी नवीन आश्रमशाळेची प्रशस्त इमारत बांधण्यात आली आहे. शाळेच्या इमारतीबरोबरच मुलींसाठी वसतिगृहाचीही इमारत बांधण्यात आली. मात्र मुलांसाठी स्वतंत्र वसतिगृह बांधण्यात आले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना वर्गखोल्यांमध्येच झोपावे लागत आहे. दिवसभर शिक्षण व रात्री त्याच वर्गखोलीत झोपण्याची पाळी विद्यार्थ्यांवर आली आहे. आश्रमशाळेची नवीन इमारत बांधून एक वर्षांचा कालावधी पूर्ण झाला असला तरी त्या इमारतीचा ताबा अजूनपर्यंत शाळेकडे देण्यात आला नाही. जुनी आश्रमशाळेची इमारत जीर्ण झाली आहे. मात्र याच आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांना बसावे लागत आहे. सदर इमारत कोसळून मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तीन वर्षांपूर्वी शाळेला विद्युत जनरेटर पुरविण्यात आले. मात्र डिझेलची व्यवस्था नाही. डिझेलसाठी स्वतंत्र तरतूद करण्यात आली नाही. त्यामुळे लाखो रूपये खर्चुन खरेदी केलेले जनरेटर केवळ शोभेची वस्तू बनली आहे. लाहेरी ते भामरागडचे अंतर १६ किमी आहे. एवढ्या दूर अंतरावरून डिझेल कसे आणायचे हा सुद्धा प्रश्न शाळा व्यवस्थापनासमोर निर्माण होतो. त्यामुळे सदर जनरेटर अजूनपर्यंत सुरू सुद्धा झाले नाही. सोलर वॉटर हिटरचीही तीच परिस्थिती आहे. यावर झालेला लाखोंचा खर्च पाण्यात गेला आहे. स्वयंपाक घराभोवती चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या चिखलाची दुर्गंधी स्वयंपाक घरात येते. चिखलावर माशा घोंगावत असून त्या अन्नावर बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. आश्रमशाळा इमारतीच्या परिसरात हातपंप असून सदर हातपंप चिखलाने वेढले आहे. आश्रमशाळेतील या दुरावस्थेने विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. लाखो रूपये खर्चून बांधण्यात आलेल्या नवीन इमारतीचा ताबा आश्रमशाळा प्रशासनाकडे देऊन त्या ठिकाणी वर्ग सुरू करावे, अशी मागणी आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.