शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

विद्यार्थी झोपतात वर्गखोलीत

By admin | Updated: September 12, 2015 01:20 IST

भामरागड तालुक्यातील लाहेरी येथील शासकीय आश्रमशाळेतील निवासी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह बांधण्यात आले नाही.

लाहेरी आश्रमशाळेची विदारक परिस्थिती : रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानदेवराव येरकलवार  लाहेरीभामरागड तालुक्यातील लाहेरी येथील शासकीय आश्रमशाळेतील निवासी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह बांधण्यात आले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना वर्गखोल्यांमध्येच झोपावे लागत आहे. विशेष म्हणजे पलंगाचा पुरवठा करण्यात आला नसल्याने जमिनीवरच झोपून रात्र काढावी लागत आहे. भामरागड तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या लाहेरी या दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी, यासाठी शासनाने आश्रमशाळा सुरू केली. सदर आश्रमशाळेची इमारत जीर्ण झाल्याने मागील वर्षी नवीन आश्रमशाळेची प्रशस्त इमारत बांधण्यात आली आहे. शाळेच्या इमारतीबरोबरच मुलींसाठी वसतिगृहाचीही इमारत बांधण्यात आली. मात्र मुलांसाठी स्वतंत्र वसतिगृह बांधण्यात आले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना वर्गखोल्यांमध्येच झोपावे लागत आहे. दिवसभर शिक्षण व रात्री त्याच वर्गखोलीत झोपण्याची पाळी विद्यार्थ्यांवर आली आहे. आश्रमशाळेची नवीन इमारत बांधून एक वर्षांचा कालावधी पूर्ण झाला असला तरी त्या इमारतीचा ताबा अजूनपर्यंत शाळेकडे देण्यात आला नाही. जुनी आश्रमशाळेची इमारत जीर्ण झाली आहे. मात्र याच आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांना बसावे लागत आहे. सदर इमारत कोसळून मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तीन वर्षांपूर्वी शाळेला विद्युत जनरेटर पुरविण्यात आले. मात्र डिझेलची व्यवस्था नाही. डिझेलसाठी स्वतंत्र तरतूद करण्यात आली नाही. त्यामुळे लाखो रूपये खर्चुन खरेदी केलेले जनरेटर केवळ शोभेची वस्तू बनली आहे. लाहेरी ते भामरागडचे अंतर १६ किमी आहे. एवढ्या दूर अंतरावरून डिझेल कसे आणायचे हा सुद्धा प्रश्न शाळा व्यवस्थापनासमोर निर्माण होतो. त्यामुळे सदर जनरेटर अजूनपर्यंत सुरू सुद्धा झाले नाही. सोलर वॉटर हिटरचीही तीच परिस्थिती आहे. यावर झालेला लाखोंचा खर्च पाण्यात गेला आहे. स्वयंपाक घराभोवती चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या चिखलाची दुर्गंधी स्वयंपाक घरात येते. चिखलावर माशा घोंगावत असून त्या अन्नावर बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. आश्रमशाळा इमारतीच्या परिसरात हातपंप असून सदर हातपंप चिखलाने वेढले आहे. आश्रमशाळेतील या दुरावस्थेने विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. लाखो रूपये खर्चून बांधण्यात आलेल्या नवीन इमारतीचा ताबा आश्रमशाळा प्रशासनाकडे देऊन त्या ठिकाणी वर्ग सुरू करावे, अशी मागणी आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.