शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

बसफेरी बंद झाल्याने विद्यार्थ्याचे हाल

By admin | Updated: July 22, 2016 01:24 IST

एटापल्ली शहरासह आजूबाजूच्या गावांतील विद्यार्थी शिक्षणासाठी दररोज आलापल्ली व अहेरी येथे ये-जा करतात. विद्यार्थी दररोज सकाळी १० वाजता...

अनेकांना घरी परतावे लागले : शाळेच्या वेळेत बस द्या; पालकांची मागणी एटापल्ली : एटापल्ली शहरासह आजूबाजूच्या गावांतील विद्यार्थी शिक्षणासाठी दररोज आलापल्ली व अहेरी येथे ये-जा करतात. विद्यार्थी दररोज सकाळी १० वाजता जारावंडी-एटापल्ली-अहेरी या बसने जात होते. विद्यार्थ्यांनी बससाठी एसटीची पासही काढली होती; मात्र काही दिवसांपासून ही बसफेरी बंद झाल्याने विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळेत पोहोचणे कठीण झाले आहे. सध्या विद्यार्थ्यांना आर्थिक भूर्दंड सहन करून खासगी वाहनाने जावे लागत आहे. अनेकदा अधिकच उशीर झाल्यास शाळेत न जाता घरी परतावे लागत आहे. खासगी वाहनात प्रवाशी कोंबून जात आहेत. त्यामुळे विद्यार्थिनींना मोठा त्रास सहन करावा लागतो. खासगी वाहनात सर्व विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अनेक शासकीय कर्मचारीही अहेरी व आलापल्लीच्या कार्यालयात याच बसगाडीने येतात. त्यांच्यातही सध्या नाराजीचा सूर आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून अहेरी-एटापल्ली ही सकाळी ९ वाजताची बसफेरी सुरू करावी, सदर बस १० वाजता एटापल्लीवरून परत जाऊ शकते किंवा बंद झालेली जारावंडी-अहेरी ही बस पुन्हा सुरू करावी, अशी मागणी केली आहे. (तालुका प्रतिनिधी) नागुलवाही परिसरातही बसअभावी पायपीट मुलचेरा : ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसमुळे सुविधा उपलब्ध होते. मात्र मुलचेरा तालुक्यात नागुलवाही, मच्छीगट्टा, मरपल्ली येथील नागरिकांना एसटी बसअभावी ८ किमीची पायपीट करावी लागत आहे. मुलचेरा तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या या तिन्ही गावातील रस्त्यावर एसटी धावलेली नाही. या गावातील नागरिकांना कोर्ट कचेरीच्या कामासाठी मुलचेरा येथे यावे लागते. तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लगाम येथे जावे लागते. लगामपासून ८ किमी अंतरावर असलेल्या या गावातील नागरिकांना बससेवेचा लाभ मिळत नसल्याने लगामपर्यंत पायीच प्रवास करावा लागतो. त्यामुळे पावसाळ्यात मोठे हाल होतात. अहेरी आगाराने प्रायोगिक तत्त्वावर अहेरी-लगाम-नागुलवाही ही यशवंती बस सुरू करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)