शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

बसफेरी बंद झाल्याने विद्यार्थ्याचे हाल

By admin | Updated: July 22, 2016 01:24 IST

एटापल्ली शहरासह आजूबाजूच्या गावांतील विद्यार्थी शिक्षणासाठी दररोज आलापल्ली व अहेरी येथे ये-जा करतात. विद्यार्थी दररोज सकाळी १० वाजता...

अनेकांना घरी परतावे लागले : शाळेच्या वेळेत बस द्या; पालकांची मागणी एटापल्ली : एटापल्ली शहरासह आजूबाजूच्या गावांतील विद्यार्थी शिक्षणासाठी दररोज आलापल्ली व अहेरी येथे ये-जा करतात. विद्यार्थी दररोज सकाळी १० वाजता जारावंडी-एटापल्ली-अहेरी या बसने जात होते. विद्यार्थ्यांनी बससाठी एसटीची पासही काढली होती; मात्र काही दिवसांपासून ही बसफेरी बंद झाल्याने विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळेत पोहोचणे कठीण झाले आहे. सध्या विद्यार्थ्यांना आर्थिक भूर्दंड सहन करून खासगी वाहनाने जावे लागत आहे. अनेकदा अधिकच उशीर झाल्यास शाळेत न जाता घरी परतावे लागत आहे. खासगी वाहनात प्रवाशी कोंबून जात आहेत. त्यामुळे विद्यार्थिनींना मोठा त्रास सहन करावा लागतो. खासगी वाहनात सर्व विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अनेक शासकीय कर्मचारीही अहेरी व आलापल्लीच्या कार्यालयात याच बसगाडीने येतात. त्यांच्यातही सध्या नाराजीचा सूर आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून अहेरी-एटापल्ली ही सकाळी ९ वाजताची बसफेरी सुरू करावी, सदर बस १० वाजता एटापल्लीवरून परत जाऊ शकते किंवा बंद झालेली जारावंडी-अहेरी ही बस पुन्हा सुरू करावी, अशी मागणी केली आहे. (तालुका प्रतिनिधी) नागुलवाही परिसरातही बसअभावी पायपीट मुलचेरा : ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसमुळे सुविधा उपलब्ध होते. मात्र मुलचेरा तालुक्यात नागुलवाही, मच्छीगट्टा, मरपल्ली येथील नागरिकांना एसटी बसअभावी ८ किमीची पायपीट करावी लागत आहे. मुलचेरा तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या या तिन्ही गावातील रस्त्यावर एसटी धावलेली नाही. या गावातील नागरिकांना कोर्ट कचेरीच्या कामासाठी मुलचेरा येथे यावे लागते. तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लगाम येथे जावे लागते. लगामपासून ८ किमी अंतरावर असलेल्या या गावातील नागरिकांना बससेवेचा लाभ मिळत नसल्याने लगामपर्यंत पायीच प्रवास करावा लागतो. त्यामुळे पावसाळ्यात मोठे हाल होतात. अहेरी आगाराने प्रायोगिक तत्त्वावर अहेरी-लगाम-नागुलवाही ही यशवंती बस सुरू करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)