शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

विद्यार्थी व महाविद्यालये आर्थिक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 23:07 IST

चंद्रपूर, गडचिरोली या दोन जिल्ह्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या गोंडवाना विद्यापीठांतर्गत विनाअनुदान तत्वांवर असलेल्या सव्वाशेवर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्काची रक्कम गेल्या तीन वर्षांपासून केंद्र व राज्य सरकारने अदा केली नाही.

ठळक मुद्देसरकार उदासीन : तीन वर्षांपासून कोट्यवधींची शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क प्रलंबित

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : चंद्रपूर, गडचिरोली या दोन जिल्ह्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या गोंडवाना विद्यापीठांतर्गत विनाअनुदान तत्वांवर असलेल्या सव्वाशेवर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्काची रक्कम गेल्या तीन वर्षांपासून केंद्र व राज्य सरकारने अदा केली नाही. परिणामी चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील विनाअनुदान तत्वांवरील महाविद्यालयांसह विविध अभ्यासक्रमाला शिकणारे हजारो विद्यार्थी आर्थिक संकटात सापडले आहेत.स्थानिक गोंडवाना विद्यापीठाशी गडचिरोली, चंद्रपूर हे दोन्ही जिल्हे मिळून एकूण २३८ महाविद्यालये संलग्नीत आहेत. यापैकी विनाअनुदान तत्वावरील ३० महाविद्यालयांची मान्यता विद्यापीठ प्रशासनाने काही दिवसांपूर्वीच काढल्याने हे महाविद्यालय बंद झाले आहेत. आता विद्यापीठांतर्गत अनुदानित व विनाअनुदानित मिळून २०८ महाविद्यालये आहे. यापैकी जवळपास ५० महाविद्यालये अनुदानित आहेत. तर सव्वाशे महाविद्यालये विनाअनुदान तत्वावर सुरू आहे. शिक्षण शुल्काच्या माध्यमातून विनाअनुदानित अभ्यासक्रमाला शिकणाºया विद्यार्थ्यांसाठी नियुक्त केलेल्या प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचाºयांचे मानधन दिले जाते. याशिवाय पाठ्यपुस्तके, उपकरणे, स्टेशनरी, वीज बि, टेलिफोन बिल व इतर किरकोळ खर्चही भागविला जातो. मात्र सन २०१४-१५, २०१५-१६ व २०१६-१७ या तीन वर्षातील शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्काची रक्कम विद्यार्थी तसेच महाविद्यालयांना सरकारने अदा केली नाही. त्यामुळे शिक्षण शुल्काची प्रतीपूर्ती कशी करावी, या विवंचनेत महाविद्यालय प्रशासन, प्राचार्य तसेच विद्यार्थीही सापडले आहेत. सरकारच्या उदासीनतेमुळे शिक्षण क्षेत्रात मोठे संकट निर्माण झाले आहे.प्राचार्यांनी अर्थमंत्र्यांना सांगितली परिस्थितीगोंडवाना विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्त राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार गडचिरोलीत आले होते. यावेळी गोंडवाना विद्यापीठ प्राचार्य फोरमच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. प्रलंबित शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्कामुळे विनाअनुदानित महाविद्यालये कशी अडचणीत आली आहेत. याबाबतची संपूर्ण परिस्थिती त्यांना सांगितली. शासनाने तत्काळ ठोस निर्णय घेऊन शिक्षण शुल्क व इतर शुल्काचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी केली.महाविद्यालय प्रशासन व प्राचार्य सापडले आर्थिक व मानसिक कोडींतमागासवर्गीय संवर्गातील विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क वसूल करू नये, अन्यथा प्राचार्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येईल, अशी समाज कल्याण विभागाची सूचना आहे. शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्काची रक्कम सरकारकडून मिळत नाही, विद्यार्थ्यांकडून शुल्काची रक्कम घ्यायची नाही. मात्र विद्यापीठाच्या शुल्काची रक्कम अदा करणे बंधनकार आहे. अशा परिस्थितीत विनाअनुदानित महाविद्यालये, प्राचार्य आर्थिक व मानसिक कोंडीत सापडले आहेत.