शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी व महाविद्यालये आर्थिक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 23:07 IST

चंद्रपूर, गडचिरोली या दोन जिल्ह्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या गोंडवाना विद्यापीठांतर्गत विनाअनुदान तत्वांवर असलेल्या सव्वाशेवर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्काची रक्कम गेल्या तीन वर्षांपासून केंद्र व राज्य सरकारने अदा केली नाही.

ठळक मुद्देसरकार उदासीन : तीन वर्षांपासून कोट्यवधींची शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क प्रलंबित

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : चंद्रपूर, गडचिरोली या दोन जिल्ह्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या गोंडवाना विद्यापीठांतर्गत विनाअनुदान तत्वांवर असलेल्या सव्वाशेवर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्काची रक्कम गेल्या तीन वर्षांपासून केंद्र व राज्य सरकारने अदा केली नाही. परिणामी चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील विनाअनुदान तत्वांवरील महाविद्यालयांसह विविध अभ्यासक्रमाला शिकणारे हजारो विद्यार्थी आर्थिक संकटात सापडले आहेत.स्थानिक गोंडवाना विद्यापीठाशी गडचिरोली, चंद्रपूर हे दोन्ही जिल्हे मिळून एकूण २३८ महाविद्यालये संलग्नीत आहेत. यापैकी विनाअनुदान तत्वावरील ३० महाविद्यालयांची मान्यता विद्यापीठ प्रशासनाने काही दिवसांपूर्वीच काढल्याने हे महाविद्यालय बंद झाले आहेत. आता विद्यापीठांतर्गत अनुदानित व विनाअनुदानित मिळून २०८ महाविद्यालये आहे. यापैकी जवळपास ५० महाविद्यालये अनुदानित आहेत. तर सव्वाशे महाविद्यालये विनाअनुदान तत्वावर सुरू आहे. शिक्षण शुल्काच्या माध्यमातून विनाअनुदानित अभ्यासक्रमाला शिकणाºया विद्यार्थ्यांसाठी नियुक्त केलेल्या प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचाºयांचे मानधन दिले जाते. याशिवाय पाठ्यपुस्तके, उपकरणे, स्टेशनरी, वीज बि, टेलिफोन बिल व इतर किरकोळ खर्चही भागविला जातो. मात्र सन २०१४-१५, २०१५-१६ व २०१६-१७ या तीन वर्षातील शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्काची रक्कम विद्यार्थी तसेच महाविद्यालयांना सरकारने अदा केली नाही. त्यामुळे शिक्षण शुल्काची प्रतीपूर्ती कशी करावी, या विवंचनेत महाविद्यालय प्रशासन, प्राचार्य तसेच विद्यार्थीही सापडले आहेत. सरकारच्या उदासीनतेमुळे शिक्षण क्षेत्रात मोठे संकट निर्माण झाले आहे.प्राचार्यांनी अर्थमंत्र्यांना सांगितली परिस्थितीगोंडवाना विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्त राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार गडचिरोलीत आले होते. यावेळी गोंडवाना विद्यापीठ प्राचार्य फोरमच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. प्रलंबित शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्कामुळे विनाअनुदानित महाविद्यालये कशी अडचणीत आली आहेत. याबाबतची संपूर्ण परिस्थिती त्यांना सांगितली. शासनाने तत्काळ ठोस निर्णय घेऊन शिक्षण शुल्क व इतर शुल्काचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी केली.महाविद्यालय प्रशासन व प्राचार्य सापडले आर्थिक व मानसिक कोडींतमागासवर्गीय संवर्गातील विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क वसूल करू नये, अन्यथा प्राचार्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येईल, अशी समाज कल्याण विभागाची सूचना आहे. शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्काची रक्कम सरकारकडून मिळत नाही, विद्यार्थ्यांकडून शुल्काची रक्कम घ्यायची नाही. मात्र विद्यापीठाच्या शुल्काची रक्कम अदा करणे बंधनकार आहे. अशा परिस्थितीत विनाअनुदानित महाविद्यालये, प्राचार्य आर्थिक व मानसिक कोंडीत सापडले आहेत.