शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
2
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
3
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
4
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
5
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
6
मायेची सावली! भावासाठी बहीण झाली ढाल; किडनी डोनेट करुन दिलं जीवदान, रक्षाबंधन झालं खास
7
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
8
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
9
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
10
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
11
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
12
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
13
Monsoon Travel : कुर्ग की मुन्नार; पावसाळी पिकनिकसाठी कोणतं ठिकाण ठरेल बेस्ट?
14
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
15
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
16
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
17
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
18
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
19
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
20
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक

एसटीचे विभागीय कार्यालय नावापुरतेच

By admin | Updated: September 29, 2014 00:44 IST

नागरिक व लोकप्रतिनिधी यांच्या सततच्या मागणीनंतर गडचिरोली येथे एसटीचे विभागीय कार्यालय सुरू करण्यात आले असले तरी या कार्यालयाचा भार केवळ १५ कर्मचारी सांभाळत असून

गडचिरोली : नागरिक व लोकप्रतिनिधी यांच्या सततच्या मागणीनंतर गडचिरोली येथे एसटीचे विभागीय कार्यालय सुरू करण्यात आले असले तरी या कार्यालयाचा भार केवळ १५ कर्मचारी सांभाळत असून विभागीय नियंत्रकाचे पदसुद्धा रिक्त आहे. त्यामुळे सदर कार्यालय केवळ नावापुरतेच सुरू करण्यात आले असल्याची टीका नागरिकांकडून केली जात आहे. गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली व अहेरी येथे आगार आहेत. त्याचबरोबर गडचिरोली जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन एसटीबाबतचे स्वतंत्र निर्णय घेण्याच्या उद्देशाने गडचिरोली येथे विभागीय कार्यालय सुरू करण्यात यावे, अशी मागणी सातत्याने लावून धरण्यात आली. त्यानंतर एसटीने गडचिरोली, अहेरी व ब्रह्मपुरी या तीन आगारांसाठी स्वतंत्र गडचिरोली येथे विभागीय कार्यालय सुरू केले. या विभागीय कार्यालयांतर्गत तिनही आगाराचे मिळून जवळपास १ हजार कर्मचारी व ३०० एसटी बसेस आहेत. यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी विभागीय कार्यालयाची आहे. त्याचबरोबर एसटीचे योग्य व्यवस्थापन करण्याची जबाबदारी सुद्धा विभागीय कार्यालयाची आहे. हे लक्षात घेऊनच या कार्यालयात जवळपास ८० पदे मंजूर करण्यात आली आहेत. मात्र सध्य:स्थितीत या कार्यालयात केवळ १५ कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये वाहतूक शाखेत ७, आस्थापना विभागात ६ व अकॉऊंट विभागात २ असे एकूण केवळ १५ कर्मचारी कार्यरत आहेत. या कार्यालयाचे प्रमुख अधिकारी विभागीय नियंत्रक यांना १५ दिवसापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी लाच घेतांना अटक केली. त्यानंतर चवरे यांना निलंबित करण्यात आले. तेव्हापासून विभागीय नियंत्रकाचे पद रिक्त झाले आहे. मुख्य अधिकारीच नसल्याने याबाबतचे निर्णय घेण्यास सुद्धा अडचण जात आहे. विभागीय कार्यालय सुरू केले असले तरी या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत नाही. त्यामुळे आगारातील एका खोलीतून विभागीय कार्यालयाचा कारभार सांभाळला जात आहे. विभागीय कार्यालयाच्या अखत्यारिमध्ये वर्कशॉप व स्टोअर असणे गरजेचे आहे. मात्र हे दोन विभाग गडचिरोली येथे आणण्याबाबतचा अजून कोणताच निर्णय एसटीने घेतला नाही. त्यामुळे विभागीय कार्यालय सुरू झाले असले तरी एसटी वाहनामध्ये बिघाड निर्माण झाल्यास सदर वाहन चंद्रपूर येथील वर्कशॉपमध्येच नेऊन दुरूस्त करावे लागते. त्याचबरोबर साहित्य सुद्धा चंद्रपूर येथूनच आणावे लागत असल्याने विभागीय कार्यालयाचा फायदा काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (नगर प्रतिनिधी)