शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
5
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
6
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
7
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
8
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
9
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
10
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
11
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
12
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
13
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
14
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
15
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
16
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
17
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
18
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
19
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
20
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?

एसटीचे विभागीय कार्यालय नावापुरतेच

By admin | Updated: September 29, 2014 00:44 IST

नागरिक व लोकप्रतिनिधी यांच्या सततच्या मागणीनंतर गडचिरोली येथे एसटीचे विभागीय कार्यालय सुरू करण्यात आले असले तरी या कार्यालयाचा भार केवळ १५ कर्मचारी सांभाळत असून

गडचिरोली : नागरिक व लोकप्रतिनिधी यांच्या सततच्या मागणीनंतर गडचिरोली येथे एसटीचे विभागीय कार्यालय सुरू करण्यात आले असले तरी या कार्यालयाचा भार केवळ १५ कर्मचारी सांभाळत असून विभागीय नियंत्रकाचे पदसुद्धा रिक्त आहे. त्यामुळे सदर कार्यालय केवळ नावापुरतेच सुरू करण्यात आले असल्याची टीका नागरिकांकडून केली जात आहे. गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली व अहेरी येथे आगार आहेत. त्याचबरोबर गडचिरोली जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन एसटीबाबतचे स्वतंत्र निर्णय घेण्याच्या उद्देशाने गडचिरोली येथे विभागीय कार्यालय सुरू करण्यात यावे, अशी मागणी सातत्याने लावून धरण्यात आली. त्यानंतर एसटीने गडचिरोली, अहेरी व ब्रह्मपुरी या तीन आगारांसाठी स्वतंत्र गडचिरोली येथे विभागीय कार्यालय सुरू केले. या विभागीय कार्यालयांतर्गत तिनही आगाराचे मिळून जवळपास १ हजार कर्मचारी व ३०० एसटी बसेस आहेत. यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी विभागीय कार्यालयाची आहे. त्याचबरोबर एसटीचे योग्य व्यवस्थापन करण्याची जबाबदारी सुद्धा विभागीय कार्यालयाची आहे. हे लक्षात घेऊनच या कार्यालयात जवळपास ८० पदे मंजूर करण्यात आली आहेत. मात्र सध्य:स्थितीत या कार्यालयात केवळ १५ कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये वाहतूक शाखेत ७, आस्थापना विभागात ६ व अकॉऊंट विभागात २ असे एकूण केवळ १५ कर्मचारी कार्यरत आहेत. या कार्यालयाचे प्रमुख अधिकारी विभागीय नियंत्रक यांना १५ दिवसापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी लाच घेतांना अटक केली. त्यानंतर चवरे यांना निलंबित करण्यात आले. तेव्हापासून विभागीय नियंत्रकाचे पद रिक्त झाले आहे. मुख्य अधिकारीच नसल्याने याबाबतचे निर्णय घेण्यास सुद्धा अडचण जात आहे. विभागीय कार्यालय सुरू केले असले तरी या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत नाही. त्यामुळे आगारातील एका खोलीतून विभागीय कार्यालयाचा कारभार सांभाळला जात आहे. विभागीय कार्यालयाच्या अखत्यारिमध्ये वर्कशॉप व स्टोअर असणे गरजेचे आहे. मात्र हे दोन विभाग गडचिरोली येथे आणण्याबाबतचा अजून कोणताच निर्णय एसटीने घेतला नाही. त्यामुळे विभागीय कार्यालय सुरू झाले असले तरी एसटी वाहनामध्ये बिघाड निर्माण झाल्यास सदर वाहन चंद्रपूर येथील वर्कशॉपमध्येच नेऊन दुरूस्त करावे लागते. त्याचबरोबर साहित्य सुद्धा चंद्रपूर येथूनच आणावे लागत असल्याने विभागीय कार्यालयाचा फायदा काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (नगर प्रतिनिधी)