शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

जातीय विषमता मोडून संघर्ष करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 22:40 IST

अनादी काळापासून समाजात जातीयवादाचे विष पेरून माणसाला माणसापासून वेगळे केले जात आहे. यातून मिळवलेल्या सत्तेच्या बळावर बहुजनांना गुलाम बनवण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. याप्रती जागृत होऊन समाजात पसरविली जाणारी जातीयवादी विषमता मोडीत काढावी.

ठळक मुद्देसमाज प्रबोधन कार्यक्रम : गडचिरोली व देसाईगंज येथे अमोल मिटकरी यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली/ देसाईगंज : अनादी काळापासून समाजात जातीयवादाचे विष पेरून माणसाला माणसापासून वेगळे केले जात आहे. यातून मिळवलेल्या सत्तेच्या बळावर बहुजनांना गुलाम बनवण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. याप्रती जागृत होऊन समाजात पसरविली जाणारी जातीयवादी विषमता मोडीत काढावी. आपल्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करायला तयार राहावे, असे प्रतिपादन ओबीसी बहुजनवादी वक्ते अमोल मिटकरी यांनी केले.गडचिरोली येथील जिल्हा परिषद हायस्कूल व देसाईगंज येथील दीक्षाभूमीच्या आवारात समाजप्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. गडचिरोली येथील कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून अमोल मिटकरी यांच्यासह मूलनिवासी महिला संघ भंडाराच्या जिल्हाध्यक्ष शरयू डहाट होत्या. अध्यक्षस्थानी अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष विलास निंबोरकर होते. प्रमुख अतिथी म्हणून माळी महिला संघटनेच्या अध्यक्ष सुधा चौधरी, मुख्याधिकारी संजीव ओहोळ होते. गडचिरोली येथील कार्यक्रम राष्टÑीय ओबीसी महासंघ सोशल एज्युकेशन मुव्हमेंट, बामसेफ, महिला मैत्री संघ, भारिप बहुजन महासंघ, बीआरएसपी, भारतीय विद्यार्थी मोर्चा, आंबेडकर राईट पार्टी आॅफ इंडिया, बीआरव्हीएम यांच्या वतीने करण्यात आले होते.देसाईगंज येथील दीक्षाभूमीच्या आवारात ओबीसी तालुका संघटनेच्या वतीने आयोजित सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त जिल्हा सत्र न्यायाधीश चंद्रलाल मेश्राम होते. उद्घाटन मुरलीधर सुंदरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी धनपाल राऊत, सरपंच मारोती बघमारे, प्रा. डॉ. श्रीराम गहाणे, कमलेश बारस्कर, ममता जांभुळकर उपस्थित होते.पुढे बोलताना अमोल मिटकरी म्हणाले, रयतेचे राजे शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने तुकाराम महाराज यांना आपले गुरु मानत होते. स्वराज्याची स्थापना करताना त्यांनी जातीयवादाला कदापी थारा दिला नाही. शिक्षणाचे आद्यजनक महात्मा जोतिबा फुले व त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून सावित्रीबाई फुले यांनी जातीयवादाला थारा न देता शिक्षणामुळेच अज्ञानावर मात करता येणे शक्य असल्याचे ओळखून सर्वांसाठी शिक्षणाची दारे खुली केली.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना लिहिताना ज्यांची जेवढी लोकसंख्या तेवढी त्यांची भागीदारी, या तत्वावर सर्वांना समता बंधुता व न्याय या सूत्रात बांधून भविष्यातही जातीयवाद उफाळून येणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली होती. आपल्या संत महात्म्यांनी आपल्या प्रबोधनातुन जातीयवादावर कट्टर प्रहार करत समाजात फक्त मानवता रुजवण्याचा प्रयत्न केला होता, असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाला देसाईगंज तालुक्यातील कुणबी, कोहळी, माळी, तेली, नाभिक, सुतार, लोहार, सोनार, परीट, श्रमिक समाज संघटनेचे पदाधिकारी तसेच नागरिक उपस्थित होते. संचालन प्रदीप तुपटे, प्रास्ताविक प्रा. दामोदर शिंगाडे तर आभार दिलीप नाकाडे यांनी मानले.

टॅग्स :OBCअन्य मागासवर्गीय जाती