शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
2
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
3
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
4
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
5
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
6
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
7
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
8
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
9
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
10
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
11
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
12
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
13
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
14
Iran strikes US air base: इराणचे प्रत्युत्तर; कतारमधील अमेरिकन लष्करी तळांवर जोरदार मिसाईल हल्ला
15
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
16
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
17
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
18
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
19
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
20
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?

जातीय विषमता मोडून संघर्ष करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 22:40 IST

अनादी काळापासून समाजात जातीयवादाचे विष पेरून माणसाला माणसापासून वेगळे केले जात आहे. यातून मिळवलेल्या सत्तेच्या बळावर बहुजनांना गुलाम बनवण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. याप्रती जागृत होऊन समाजात पसरविली जाणारी जातीयवादी विषमता मोडीत काढावी.

ठळक मुद्देसमाज प्रबोधन कार्यक्रम : गडचिरोली व देसाईगंज येथे अमोल मिटकरी यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली/ देसाईगंज : अनादी काळापासून समाजात जातीयवादाचे विष पेरून माणसाला माणसापासून वेगळे केले जात आहे. यातून मिळवलेल्या सत्तेच्या बळावर बहुजनांना गुलाम बनवण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. याप्रती जागृत होऊन समाजात पसरविली जाणारी जातीयवादी विषमता मोडीत काढावी. आपल्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करायला तयार राहावे, असे प्रतिपादन ओबीसी बहुजनवादी वक्ते अमोल मिटकरी यांनी केले.गडचिरोली येथील जिल्हा परिषद हायस्कूल व देसाईगंज येथील दीक्षाभूमीच्या आवारात समाजप्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. गडचिरोली येथील कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून अमोल मिटकरी यांच्यासह मूलनिवासी महिला संघ भंडाराच्या जिल्हाध्यक्ष शरयू डहाट होत्या. अध्यक्षस्थानी अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष विलास निंबोरकर होते. प्रमुख अतिथी म्हणून माळी महिला संघटनेच्या अध्यक्ष सुधा चौधरी, मुख्याधिकारी संजीव ओहोळ होते. गडचिरोली येथील कार्यक्रम राष्टÑीय ओबीसी महासंघ सोशल एज्युकेशन मुव्हमेंट, बामसेफ, महिला मैत्री संघ, भारिप बहुजन महासंघ, बीआरएसपी, भारतीय विद्यार्थी मोर्चा, आंबेडकर राईट पार्टी आॅफ इंडिया, बीआरव्हीएम यांच्या वतीने करण्यात आले होते.देसाईगंज येथील दीक्षाभूमीच्या आवारात ओबीसी तालुका संघटनेच्या वतीने आयोजित सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त जिल्हा सत्र न्यायाधीश चंद्रलाल मेश्राम होते. उद्घाटन मुरलीधर सुंदरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी धनपाल राऊत, सरपंच मारोती बघमारे, प्रा. डॉ. श्रीराम गहाणे, कमलेश बारस्कर, ममता जांभुळकर उपस्थित होते.पुढे बोलताना अमोल मिटकरी म्हणाले, रयतेचे राजे शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने तुकाराम महाराज यांना आपले गुरु मानत होते. स्वराज्याची स्थापना करताना त्यांनी जातीयवादाला कदापी थारा दिला नाही. शिक्षणाचे आद्यजनक महात्मा जोतिबा फुले व त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून सावित्रीबाई फुले यांनी जातीयवादाला थारा न देता शिक्षणामुळेच अज्ञानावर मात करता येणे शक्य असल्याचे ओळखून सर्वांसाठी शिक्षणाची दारे खुली केली.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना लिहिताना ज्यांची जेवढी लोकसंख्या तेवढी त्यांची भागीदारी, या तत्वावर सर्वांना समता बंधुता व न्याय या सूत्रात बांधून भविष्यातही जातीयवाद उफाळून येणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली होती. आपल्या संत महात्म्यांनी आपल्या प्रबोधनातुन जातीयवादावर कट्टर प्रहार करत समाजात फक्त मानवता रुजवण्याचा प्रयत्न केला होता, असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाला देसाईगंज तालुक्यातील कुणबी, कोहळी, माळी, तेली, नाभिक, सुतार, लोहार, सोनार, परीट, श्रमिक समाज संघटनेचे पदाधिकारी तसेच नागरिक उपस्थित होते. संचालन प्रदीप तुपटे, प्रास्ताविक प्रा. दामोदर शिंगाडे तर आभार दिलीप नाकाडे यांनी मानले.

टॅग्स :OBCअन्य मागासवर्गीय जाती