शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

काँग्रेसच्या बैलबंडी मोर्चाची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 23:36 IST

‘मायबाप म्हणतात अभ्यास कर, मोदी म्हणतात पकोडे तळ’, ‘नरेंद्र-देवेंद्र बेरोजगारीचे केंद्र’, ‘देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र, मंत्रालयात उंदरं’ आदी सरकारीविरोधी घोषणा देत युवक काँग्रेसच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर १६ एप्रिल रोजी बैलबंडी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जिल्ह्यातील हजारो बेरोजगार, शेतकरी व युवक सहभागी झाले होते.

ठळक मुद्देघोषणांनी दुमदुमला आसमंत : ‘मायबाप म्हणतात अभ्यास कर, मोदी म्हणतात पकोडे तळ’

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : ‘मायबाप म्हणतात अभ्यास कर, मोदी म्हणतात पकोडे तळ’, ‘नरेंद्र-देवेंद्र बेरोजगारीचे केंद्र’, ‘देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र, मंत्रालयात उंदरं’ आदी सरकारीविरोधी घोषणा देत युवक काँग्रेसच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर १६ एप्रिल रोजी बैलबंडी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जिल्ह्यातील हजारो बेरोजगार, शेतकरी व युवक सहभागी झाले होते.शेतकऱ्यांच्या मालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव द्यावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात, धानाला प्रती क्विंटल ४ हजार ५००, कापसाला १० हजार, सोयाबिनला आठ हजार रूपये प्रमाणे भाव द्यावा, वनसंवर्धन कायद्यामुळे रखडलेले तुलतुली, कारवाफा, चेन्ना, पिपरी रिठ, डुरकानगुड्रा, कळमगाव आदी सिंचन प्रकल्पांना मंजुरी देऊन काम करावे, गरीब, शेतकरी, शेतमजूर यांना काँग्रेस सरकारच्या काळाप्रमाणे स्वस्त धान्य दुकानातून अन्न, धान्य, साखर, रॉकेल, डाळीचा पुरवठा करावा, संजय गांधी श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांचे मानधन वाढवून दोन हजार रूपये करावे, सुशिक्षीत बेरोजगारांना दरमहा १० हजार रूपये बेरोजगार भत्ता द्यावा, एमपीएससी, युपीएससीची रिक्त पदे त्वरीत जाहीर करावी, सुशिक्षीत बेरोजगारांचे सर्वेक्षण करावे, लोखंड कारखाना स्थापन करून जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगार द्यावा, रखडलेली शिष्यवृत्तीची रक्कम द्यावी, ५० टक्के ओपनच्या जागा भरताना गुणवत्ताप्राप्त मागस प्रवर्गातील उमेदवारांना संधी द्यावी आदी मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.मोर्चाचे नेतृत्व माजी खासदार नाना पटोले, मारोतराव कोवासे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, काँग्रसचे निरिक्षक सुरेश भोयर, प्रतिभा रघुवंशी, माजी आमदार आनंदराव गेडाम, अविनाश वारजुरकर, पंकज गुड्डेवार, सहसराम पोरेटे, एन. टी. किरसान, सतीश वारजुरकर, हसनअली गिलानी, रवींद्र दरेकर, प्रकाश इटनकर, जीया पटेल, नितीन कुंभलकर, प्रफुल्ल गुडघे, नरेंद्र जिचकार, संजय चरडुके, प्रमोद भगत, रवींद्र शहा, निशांत नैताम, वैभव भिवापुरे, दीपक ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य मनिषा दोनाडकर, रूपाली पंदिलवार, वैशाली ताटपल्लीवार, कविता भगत, मनोहर पोरेटी, बंडू शनिवारे, विश्वजित कोवासे, जेसा मोटवानी, नरेंद्र गजपुरे, नेताजी गावतुरे, नगरसेवक सतीश विधाते, अमोल भडांगे, निलेश राठोड, शंकरराव सालोटकर, किशोर चापले, सुदाम मोटवानी, अर्पणा खेवले, ढोक, जयंत हरडे, जीवन नाट, परसराम टिकले, पी. आर. आकरे, तौफीख शेख, गौरव आलाम, रजनिकांत मोटघरे यांनी केले.मोर्चाचे आयोजन गडचिरोली-चिमूर लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केले.युवक काँगे्रसच्या नेतृत्वामुळे आंदोलनात दिसले एकीचे बळकाँग्रेस पदाधिकाºयांमध्ये बºयाच वेळा एखाद्या आंदोलनावरून मतभेद निर्माण होतात. एका गटाचे आंदोलन असेल तर दुसºया गटाचे पदाधिकारी सहभागी होत नसल्याचा आजपर्यंतचा अनुभव आहे. मात्र युवक काँग्रेसच्या मुख्य नेतृत्वात सोमवारी काढलेल्या मोर्चात जिल्हाभरातील वरिष्ठ फळीतले सर्वच काँग्रेसचे पदाधिकारी मतभेद विसरून सहभागी झाले होते. एवढेच नाही तर जिल्हा परिषद सदस्य, पं.स. सभापती, माजी जि.प.उपाध्यक्ष यांनी सुध्दा कार्यकर्त्यांसह आंदोलनात हजेरी लावली होती. त्यामुळे आंदोलनात काँग्रेसचे एकीचे बळ दिसले.१ वाजता इंदिरा गांधी चौकातून बैलबंडी मोर्चा निघाला. माजी खासदार नाना पटोले, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, निरिक्षक सुरेश भोयर यांच्यासह वरिष्ठ फळीतील पदाधिकारी बैलबंडीवर स्वार झाले होते. कडक ऊन असल्याने घामाच्या धारा वाहत असतानाही इंदिरा गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतचे सुमारे तीन किमीचे अंतर कार्यकर्त्यांनी पायदळ तर पदाधिकाºयांनी बैलबंडीवर गाठले. बैलबंडी, हजारो कार्यकर्ते यामुळे काही काळ गडचिरोली शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती.