शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या बैलबंडी मोर्चाची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 23:36 IST

‘मायबाप म्हणतात अभ्यास कर, मोदी म्हणतात पकोडे तळ’, ‘नरेंद्र-देवेंद्र बेरोजगारीचे केंद्र’, ‘देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र, मंत्रालयात उंदरं’ आदी सरकारीविरोधी घोषणा देत युवक काँग्रेसच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर १६ एप्रिल रोजी बैलबंडी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जिल्ह्यातील हजारो बेरोजगार, शेतकरी व युवक सहभागी झाले होते.

ठळक मुद्देघोषणांनी दुमदुमला आसमंत : ‘मायबाप म्हणतात अभ्यास कर, मोदी म्हणतात पकोडे तळ’

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : ‘मायबाप म्हणतात अभ्यास कर, मोदी म्हणतात पकोडे तळ’, ‘नरेंद्र-देवेंद्र बेरोजगारीचे केंद्र’, ‘देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र, मंत्रालयात उंदरं’ आदी सरकारीविरोधी घोषणा देत युवक काँग्रेसच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर १६ एप्रिल रोजी बैलबंडी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जिल्ह्यातील हजारो बेरोजगार, शेतकरी व युवक सहभागी झाले होते.शेतकऱ्यांच्या मालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव द्यावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात, धानाला प्रती क्विंटल ४ हजार ५००, कापसाला १० हजार, सोयाबिनला आठ हजार रूपये प्रमाणे भाव द्यावा, वनसंवर्धन कायद्यामुळे रखडलेले तुलतुली, कारवाफा, चेन्ना, पिपरी रिठ, डुरकानगुड्रा, कळमगाव आदी सिंचन प्रकल्पांना मंजुरी देऊन काम करावे, गरीब, शेतकरी, शेतमजूर यांना काँग्रेस सरकारच्या काळाप्रमाणे स्वस्त धान्य दुकानातून अन्न, धान्य, साखर, रॉकेल, डाळीचा पुरवठा करावा, संजय गांधी श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांचे मानधन वाढवून दोन हजार रूपये करावे, सुशिक्षीत बेरोजगारांना दरमहा १० हजार रूपये बेरोजगार भत्ता द्यावा, एमपीएससी, युपीएससीची रिक्त पदे त्वरीत जाहीर करावी, सुशिक्षीत बेरोजगारांचे सर्वेक्षण करावे, लोखंड कारखाना स्थापन करून जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगार द्यावा, रखडलेली शिष्यवृत्तीची रक्कम द्यावी, ५० टक्के ओपनच्या जागा भरताना गुणवत्ताप्राप्त मागस प्रवर्गातील उमेदवारांना संधी द्यावी आदी मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.मोर्चाचे नेतृत्व माजी खासदार नाना पटोले, मारोतराव कोवासे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, काँग्रसचे निरिक्षक सुरेश भोयर, प्रतिभा रघुवंशी, माजी आमदार आनंदराव गेडाम, अविनाश वारजुरकर, पंकज गुड्डेवार, सहसराम पोरेटे, एन. टी. किरसान, सतीश वारजुरकर, हसनअली गिलानी, रवींद्र दरेकर, प्रकाश इटनकर, जीया पटेल, नितीन कुंभलकर, प्रफुल्ल गुडघे, नरेंद्र जिचकार, संजय चरडुके, प्रमोद भगत, रवींद्र शहा, निशांत नैताम, वैभव भिवापुरे, दीपक ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य मनिषा दोनाडकर, रूपाली पंदिलवार, वैशाली ताटपल्लीवार, कविता भगत, मनोहर पोरेटी, बंडू शनिवारे, विश्वजित कोवासे, जेसा मोटवानी, नरेंद्र गजपुरे, नेताजी गावतुरे, नगरसेवक सतीश विधाते, अमोल भडांगे, निलेश राठोड, शंकरराव सालोटकर, किशोर चापले, सुदाम मोटवानी, अर्पणा खेवले, ढोक, जयंत हरडे, जीवन नाट, परसराम टिकले, पी. आर. आकरे, तौफीख शेख, गौरव आलाम, रजनिकांत मोटघरे यांनी केले.मोर्चाचे आयोजन गडचिरोली-चिमूर लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केले.युवक काँगे्रसच्या नेतृत्वामुळे आंदोलनात दिसले एकीचे बळकाँग्रेस पदाधिकाºयांमध्ये बºयाच वेळा एखाद्या आंदोलनावरून मतभेद निर्माण होतात. एका गटाचे आंदोलन असेल तर दुसºया गटाचे पदाधिकारी सहभागी होत नसल्याचा आजपर्यंतचा अनुभव आहे. मात्र युवक काँग्रेसच्या मुख्य नेतृत्वात सोमवारी काढलेल्या मोर्चात जिल्हाभरातील वरिष्ठ फळीतले सर्वच काँग्रेसचे पदाधिकारी मतभेद विसरून सहभागी झाले होते. एवढेच नाही तर जिल्हा परिषद सदस्य, पं.स. सभापती, माजी जि.प.उपाध्यक्ष यांनी सुध्दा कार्यकर्त्यांसह आंदोलनात हजेरी लावली होती. त्यामुळे आंदोलनात काँग्रेसचे एकीचे बळ दिसले.१ वाजता इंदिरा गांधी चौकातून बैलबंडी मोर्चा निघाला. माजी खासदार नाना पटोले, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, निरिक्षक सुरेश भोयर यांच्यासह वरिष्ठ फळीतील पदाधिकारी बैलबंडीवर स्वार झाले होते. कडक ऊन असल्याने घामाच्या धारा वाहत असतानाही इंदिरा गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतचे सुमारे तीन किमीचे अंतर कार्यकर्त्यांनी पायदळ तर पदाधिकाºयांनी बैलबंडीवर गाठले. बैलबंडी, हजारो कार्यकर्ते यामुळे काही काळ गडचिरोली शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती.