शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

जिल्ह्यातील दूरसंचार सेवा बळकट करा

By admin | Updated: July 5, 2017 01:18 IST

गडचिरोली जिल्ह्यात दळणवळणाची साधने अत्यंत मर्यादित आहेत. दळणवळणाच्या साधनांअभावी जिल्ह्याचा विकास रखडला आहे.

खासदारांचे आवाहन : बीएसएनएलच्या कामकाजाचा सभेत घेतला आढावालोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात दळणवळणाची साधने अत्यंत मर्यादित आहेत. दळणवळणाच्या साधनांअभावी जिल्ह्याचा विकास रखडला आहे. त्यामुळे दळणवळण व दूरसंचार सेवा बळकट करावी, असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी केले. दूरसंचार सल्लागार समितीची बैठक मंगळवारी बीएसएनएल कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी मार्गदर्शन करताना खासदार अशोक नेते बोलत होते. यावेळी बीएसएनएलचे जिल्हा प्रबंधक एम. ए. जीवणे, दूरसंचार सल्लागार समितीचे सदस्य नाना नाकाडे, राम लांजेवार, डॉ. भारत खटी, विनोद अमनपल्लीवार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी खासदारांनी बीएसएनएलच्या समस्यांबाबत अधिकाऱ्यांना अवगत केले. या समस्या तत्काळ सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना केल्या. ग्रामपंचायत आॅनलाईन करणे, नवीन ठिकाणी टू-जी व थ्री-जी टॉवर लावणे बीएसएनएलची कामे जिल्ह्यातीलच कंत्राटदारांना द्यावे आदी बाबतच्या सूचना केल्या. गडचिरोली जिल्ह्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत उत्पन्न कमी असल्याने खासगी कंपन्या सेवा देण्यास तयार होत नाही. त्यामुळे बीएसएनएल या एकाच कंपनीवर येथील नागरिक अवलंबून आहेत. बीएसएनएल ही केंद्र शासनाची कंपनी असल्याने नफा कमविण्याबरोबरच सामाजिक जबाबदारीही पार पाडायची आहे. त्यामुळे काही ठिकाणी टॉवर उभे करताना उत्पन्नाचा विचार न करता स्थानिक विकासाला प्राधान्य द्यावे, असे मार्गदर्शन केले. यावेळी सल्लागार समितीच्या सदस्यांनी सुध्दा आपापल्या भागातील समस्या मांडल्या. या सर्व समस्यांची दखल घेऊन त्या सोडविल्या जातील, असे आश्वासन बीएसएनएलचे जिल्हा प्रबंधक एम. ए. जीवणे यांनी दिले. प्रास्ताविकातून जीवणे यांनी बीएसएनएलच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली. संचालन अभियंता किशोर कापगते, तर आभार मनोज लभाने यांनी मानले.