शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
‘लाडकी बहीण’ योजनेकडे महिलांची पाठ? ५ महिन्यांत एकही नवा अर्ज नाही! क्रेझ ओसरल्याची चर्चा
3
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, काँग्रेसला १ नंबर पक्ष बनवा”: सपकाळ
4
India restricts Bangladeshi Jute Products: बांगलादेशला जोरदार झटका, नव्या निर्बधांनी भारतानं दिलं 'जशास तसं' उत्तर; कशावर होणार परिणाम?
5
स्फोट अन् भूकबळींनंतर गाजामध्ये आजारांचे थैमान, लोकांचे जाताहेत बळी; लान्सेट रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा
6
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद
7
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याला 'ईडी'कडून समन्स; अडचणी वाढणार? प्रकरण काय...
8
पुतिन-ट्रम्प भेटीपूर्वी मोठा 'धमाका' करण्याच्या तयारीत रशिया; अमेरिकेलाही धडकी भरणार, संपूर्ण जग नुसतं बघतच बसणार!
9
WI vs PAK : कॅरेबियन बेटावर पाकचा करेक्ट कार्यक्रम! ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
10
'या' कारणाने लक्षात राहिली 'राऊडी राठोड'ची ऑडिशन; भार्गवी चिरमुले म्हणाली, 'त्यांनी मला..."
11
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका
12
DRDOचा गेस्ट हाऊस मॅनेजर करत होता आयएसआयसाठी हेरगिरी; राजस्थानच्या सीआयडीने केली अटक
13
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! आता बचत खात्यात 'इतके' पैसे ठेवावे लागणार, नाहीतर बसणार दंड!
14
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
15
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
16
जेठालालपेक्षाही साधा भोळा आहे दयाबेनचा रिअल लाइफ नवरा, काय करतो माहितीये का?
17
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
18
तानाजी गळगुंडेला 'सैराट'साठी मिळालेलं इतक्या हजार रुपयांचं मानधन, स्वतःवर खर्च न करता दिले मित्राला
19
पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना! पत्नीच्या नावावर FD करुन मिळवा बँक एफडीपेक्षा जास्त परतावा!
20
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...

स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकटी देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 22:28 IST

विधान परिषदेच्या चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार म्हणून रणांगणात उतरलेले डॉ.रामदास आंबटकर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांचे अनेक प्रकारचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि त्यांना बळकट करण्यासाठी ......

ठळक मुद्देभाजप उमेदवार रामदास आंबटकर : गडचिरोली दौऱ्यानंतर व्यक्त केला विजयाचा आत्मविश्वास

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : विधान परिषदेच्या चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार म्हणून रणांगणात उतरलेले डॉ.रामदास आंबटकर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांचे अनेक प्रकारचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि त्यांना बळकट करण्यासाठी आपली उमेदवारी असल्याचा मनोदय शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केला.दोन दिवस गडचिरोली जिल्ह्यात फिरून मतदारांच्या गाठीभेटी घेतल्यानंतर त्यांनी विजयाचा आत्मविश्वास व्यक्त केला. भाजपच्या मतदारांचे प्राबल्य असले तरीही कोणत्याही लढाईत शत्रुला कमी लेखू नये, म्हणून ही निवडणूक आपण गांभिर्याने लढत असल्याचेही त्यांनी सांगितले.या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करीत असलेले विद्यमान आमदार भाजपचेच आहे, पण त्यांनी गेल्या सहा वर्षात गडचिरोलीकरांची चांगलीच निराशा केली. असे असताना मतदार तुम्हाला स्वीकारतील का? असा प्रश्न केला असता गडचिरोली माझ्यासाठी नवीन नसून येथील विविध प्रश्नांची मला माहिती आहे. त्यामुळे गडचिरोलीकडे विशेष लक्ष राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विशेषत: नवीन नगर पंचायतींचा कारभार कसा चालवावा याचे प्रशिक्षण, तसेच अधिकारांची जाणीव करून देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.यावेळी खासदार अशोक नेते यांनी डॉ.आंबटकर यांच्या विजयाची पूर्ण खात्री दिली. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीत आणण्यासाठी रातुम नागपूर विद्यापीठाचे सिनेट प्रतिनिधी म्हणून आंबटकर यांनी कसे योगदान दिले याची माहिती त्यांनी दिली. याप्रसंगी आमदार डॉ.देवराव होळी, भाजपचे जिल्हा महामंत्री रवी ओललवार, डॉ.भारत खटी, नगरसेवक प्रमोद पिपरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.या निवडणुकीसाठी पक्षीय मतदारांचे संख्याबळ पाहता भाजपचे प्राबल्य असले तरी जास्त रिस्क न घेता तळ्यात-मळ्यात करणाºया काही मतदारांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्नही भाजपाकडून सुरू आहे.भाजपचे मतदार जाणार सहलीलाया निवडणुकीत जिल्हा परिषद, नगर परिषद, नगर पंचायतचे सदस्य असलेले अनेक मतदार उमेदवारांकडून मलिदा मिळण्याची आस लावून बसलेले आहेत. अशा परिस्थितीत काँग्रेस उमेदवाराकडून त्यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न होऊ नये म्हणून भाजपची यंत्रणा त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवून आहे. मात्र तरीही अनेक लोकांनी मतदानाच्या दिवसापर्यंत सहलीला जाण्याची इच्छा व्यक्त केल्याने ते भाजपशासित एखाद्या राज्यात सहलीसाठी निघणार आहेत. त्यांची चांगली व्यवस्था करण्याची जबाबदारी संबंधित राज्याच्या सत्ताधारी पदाधिकाºयांकडे दिली जाणार असल्याचे समजते.