शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
4
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
5
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
6
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
7
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
8
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
9
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
10
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
11
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
12
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
13
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
14
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
15
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
16
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
17
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
18
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
19
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
20
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP

स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकटी देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 22:28 IST

विधान परिषदेच्या चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार म्हणून रणांगणात उतरलेले डॉ.रामदास आंबटकर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांचे अनेक प्रकारचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि त्यांना बळकट करण्यासाठी ......

ठळक मुद्देभाजप उमेदवार रामदास आंबटकर : गडचिरोली दौऱ्यानंतर व्यक्त केला विजयाचा आत्मविश्वास

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : विधान परिषदेच्या चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार म्हणून रणांगणात उतरलेले डॉ.रामदास आंबटकर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांचे अनेक प्रकारचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि त्यांना बळकट करण्यासाठी आपली उमेदवारी असल्याचा मनोदय शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केला.दोन दिवस गडचिरोली जिल्ह्यात फिरून मतदारांच्या गाठीभेटी घेतल्यानंतर त्यांनी विजयाचा आत्मविश्वास व्यक्त केला. भाजपच्या मतदारांचे प्राबल्य असले तरीही कोणत्याही लढाईत शत्रुला कमी लेखू नये, म्हणून ही निवडणूक आपण गांभिर्याने लढत असल्याचेही त्यांनी सांगितले.या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करीत असलेले विद्यमान आमदार भाजपचेच आहे, पण त्यांनी गेल्या सहा वर्षात गडचिरोलीकरांची चांगलीच निराशा केली. असे असताना मतदार तुम्हाला स्वीकारतील का? असा प्रश्न केला असता गडचिरोली माझ्यासाठी नवीन नसून येथील विविध प्रश्नांची मला माहिती आहे. त्यामुळे गडचिरोलीकडे विशेष लक्ष राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विशेषत: नवीन नगर पंचायतींचा कारभार कसा चालवावा याचे प्रशिक्षण, तसेच अधिकारांची जाणीव करून देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.यावेळी खासदार अशोक नेते यांनी डॉ.आंबटकर यांच्या विजयाची पूर्ण खात्री दिली. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीत आणण्यासाठी रातुम नागपूर विद्यापीठाचे सिनेट प्रतिनिधी म्हणून आंबटकर यांनी कसे योगदान दिले याची माहिती त्यांनी दिली. याप्रसंगी आमदार डॉ.देवराव होळी, भाजपचे जिल्हा महामंत्री रवी ओललवार, डॉ.भारत खटी, नगरसेवक प्रमोद पिपरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.या निवडणुकीसाठी पक्षीय मतदारांचे संख्याबळ पाहता भाजपचे प्राबल्य असले तरी जास्त रिस्क न घेता तळ्यात-मळ्यात करणाºया काही मतदारांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्नही भाजपाकडून सुरू आहे.भाजपचे मतदार जाणार सहलीलाया निवडणुकीत जिल्हा परिषद, नगर परिषद, नगर पंचायतचे सदस्य असलेले अनेक मतदार उमेदवारांकडून मलिदा मिळण्याची आस लावून बसलेले आहेत. अशा परिस्थितीत काँग्रेस उमेदवाराकडून त्यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न होऊ नये म्हणून भाजपची यंत्रणा त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवून आहे. मात्र तरीही अनेक लोकांनी मतदानाच्या दिवसापर्यंत सहलीला जाण्याची इच्छा व्यक्त केल्याने ते भाजपशासित एखाद्या राज्यात सहलीसाठी निघणार आहेत. त्यांची चांगली व्यवस्था करण्याची जबाबदारी संबंधित राज्याच्या सत्ताधारी पदाधिकाºयांकडे दिली जाणार असल्याचे समजते.