शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकटी देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 22:28 IST

विधान परिषदेच्या चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार म्हणून रणांगणात उतरलेले डॉ.रामदास आंबटकर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांचे अनेक प्रकारचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि त्यांना बळकट करण्यासाठी ......

ठळक मुद्देभाजप उमेदवार रामदास आंबटकर : गडचिरोली दौऱ्यानंतर व्यक्त केला विजयाचा आत्मविश्वास

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : विधान परिषदेच्या चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार म्हणून रणांगणात उतरलेले डॉ.रामदास आंबटकर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांचे अनेक प्रकारचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि त्यांना बळकट करण्यासाठी आपली उमेदवारी असल्याचा मनोदय शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केला.दोन दिवस गडचिरोली जिल्ह्यात फिरून मतदारांच्या गाठीभेटी घेतल्यानंतर त्यांनी विजयाचा आत्मविश्वास व्यक्त केला. भाजपच्या मतदारांचे प्राबल्य असले तरीही कोणत्याही लढाईत शत्रुला कमी लेखू नये, म्हणून ही निवडणूक आपण गांभिर्याने लढत असल्याचेही त्यांनी सांगितले.या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करीत असलेले विद्यमान आमदार भाजपचेच आहे, पण त्यांनी गेल्या सहा वर्षात गडचिरोलीकरांची चांगलीच निराशा केली. असे असताना मतदार तुम्हाला स्वीकारतील का? असा प्रश्न केला असता गडचिरोली माझ्यासाठी नवीन नसून येथील विविध प्रश्नांची मला माहिती आहे. त्यामुळे गडचिरोलीकडे विशेष लक्ष राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विशेषत: नवीन नगर पंचायतींचा कारभार कसा चालवावा याचे प्रशिक्षण, तसेच अधिकारांची जाणीव करून देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.यावेळी खासदार अशोक नेते यांनी डॉ.आंबटकर यांच्या विजयाची पूर्ण खात्री दिली. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीत आणण्यासाठी रातुम नागपूर विद्यापीठाचे सिनेट प्रतिनिधी म्हणून आंबटकर यांनी कसे योगदान दिले याची माहिती त्यांनी दिली. याप्रसंगी आमदार डॉ.देवराव होळी, भाजपचे जिल्हा महामंत्री रवी ओललवार, डॉ.भारत खटी, नगरसेवक प्रमोद पिपरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.या निवडणुकीसाठी पक्षीय मतदारांचे संख्याबळ पाहता भाजपचे प्राबल्य असले तरी जास्त रिस्क न घेता तळ्यात-मळ्यात करणाºया काही मतदारांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्नही भाजपाकडून सुरू आहे.भाजपचे मतदार जाणार सहलीलाया निवडणुकीत जिल्हा परिषद, नगर परिषद, नगर पंचायतचे सदस्य असलेले अनेक मतदार उमेदवारांकडून मलिदा मिळण्याची आस लावून बसलेले आहेत. अशा परिस्थितीत काँग्रेस उमेदवाराकडून त्यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न होऊ नये म्हणून भाजपची यंत्रणा त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवून आहे. मात्र तरीही अनेक लोकांनी मतदानाच्या दिवसापर्यंत सहलीला जाण्याची इच्छा व्यक्त केल्याने ते भाजपशासित एखाद्या राज्यात सहलीसाठी निघणार आहेत. त्यांची चांगली व्यवस्था करण्याची जबाबदारी संबंधित राज्याच्या सत्ताधारी पदाधिकाºयांकडे दिली जाणार असल्याचे समजते.