शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

वीज ग्राहकांवर अतिरिक्त बिलाचा ताण

By admin | Updated: October 27, 2014 22:36 IST

वीज वितरण कंपनी वीज देयकांच्या माध्यमातून ग्राहकांची लूट व फसवणूक करीत आहे. ग्राहक वीज बिल मिळाल्यानंतर अधिक चौकशी न करता, बिल भरून मोकळे होतात.

गडचिरोली : वीज वितरण कंपनी वीज देयकांच्या माध्यमातून ग्राहकांची लूट व फसवणूक करीत आहे. ग्राहक वीज बिल मिळाल्यानंतर अधिक चौकशी न करता, बिल भरून मोकळे होतात. याचाच फायदा घेत गाहकांच्या खिशावर डल्ला मारला जात आहे. विविध प्रकारचे कर आकारून ग्राहकांना आर्थिक त्रास दिला जात आहे. महावितरणद्वारे दरमहा वीज आकार देयकात १६ प्रकारचे कर असतात. यात स्थिर आकार, वीज, शुल्क, अंधन समायोजन आकार, वीज विक्री कर व सरासरी देयकाची रक्कम, व्याज इतर आकार, समायोजित रक्कम, व्याजाची थकबाकी, देयकाची निव्वळ रक्कम, पूर्णांक देयक, सुरक्षा ठेव जमा आदींचा समावेश आहे. हे कर निव्वळ ग्राहकांची दिशाभूल करणारे आहेत. बिलात दर्शविलेले वितरण हे सामान्य ग्राहकांना समजण्यापलिकडचे असते. यामुळे ग्राहकांना समजणारे साधे व सरळ देयक का देण्यात येत नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ग्राहकांच्या वीज देयकात समायोजित रकमेच्या रकाण्यात लावलेली रक्कम ही ग्राहकाची आर्थिक फसवणूक आहे. वीज वितरण कंपनीला जे आर्थिक नुकसान वा तूट होते, ती देखील ग्राहकांकडून वसूल केली जाते. महावितरणातील गैरप्रकार, विजेची चोरी, तूट यामुळे आर्थिक नुकसान होत असेल तर ती ग्राहकांकडून वसूल करण्याचे प्रयोजन काय, हा महत्वाचा प्रश्न आहे. दरमहा वीज देयकात अंतिम तारीख असते. त्या तारखेपूर्वी देयक अदा केल्यास १०-२० रूपये सुट व अंतिम तारखेपर्यंत रक्कम न भरल्यास १०- २० रूपयांचा दंड सोसावा लागतो. यातील सुट दिलेली रक्कम पुढील देयकात वळती करीत थकबाकी सूचनेत केवळ ३.७० पैसे वा २.१६ पैसे तत्पर सूट दर्शविली जाते.हा प्रकार निव्वळ दिशाभूल करून लूट करणारा आहे. विजेची देयके नेहमीच उशीरा व अंतिम तारखेच्यानंतर दिली जातात. यामुळे ग्राहकांना नाहक भुर्दंड सासावा लागतो. निर्माता कंपनी असो वा वितरण कंपनी, वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे कर्तव्य बजावल्यास नुकसान होत नाही. वीज कंपनीचे अधिकारीच गैरप्रकार करीत असल्याने कंपनी तोट्यात येत असल्याचे सर्वश्रुत आहे. ही नुकसान भराई त्यांच्याकडून वसूल करणे सोडून ग्राहकांची पिळवणूक केली जाते. वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी हा प्रकार रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्राहकांतून होत आहे. कंपनीच्या कारभारामुळे अनेक ग्राहक त्रस्त आहेत. (शहर प्रतिनिधी)