शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

वादळाने अनेक नागरिकांंचे नुकसान

By admin | Updated: May 27, 2014 00:52 IST

नवतपांना सुरूवात होताच जिल्ह्याचे तापमान वाढीबरोबरच वादळाने थैमान घातल्याने शेकडो नागरिकांच्या घरावरील पत्रे उडून गेले. काही ठिकाणी झाडे पडल्याने रस्ता बंद झाल्याच्या

गडचिरोली : नवतपांना सुरूवात होताच जिल्ह्याचे तापमान वाढीबरोबरच वादळाने थैमान घातल्याने शेकडो नागरिकांच्या घरावरील पत्रे उडून गेले. काही ठिकाणी झाडे पडल्याने रस्ता बंद झाल्याच्या घटनासुद्धा घडल्या आहेत. २५ जानेवारीपासून रोहणी नक्षत्राला सुरूवात झाली आहे. पावसाळ्याच्या नक्षत्रापैकी रोहणी हा पहिला नक्षत्र असला तरी या नक्षत्रामध्ये फार क्वचितच जिल्ह्यात पाऊस पडतो. या कालावधीत तापमान अतिशय जास्त राहत असल्याने याला नवतपा म्हणून ओळखले जाते. नवतपांना सुरूवात झाली आहे. आजपर्यंत ४० ते ४१ अंशाच्या जवळपास असलेला तापमानाचा पारा मागील तीन दिवसांपासून ४३ अंशाच्यावर गेला आहे. असह्य उकाड्यामुळे सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत घराबाहेर पडणे अशक्य झाले आहेत. त्यामुळे या कालावधीत शहरातील रस्ते सुनसान दिसून येत आहेत. मेहनतीचे काम करणार्‍या मजुरांसाठी तर उकाडा अत्यंत अडचणीचा झाला आहे. दिवसा ऊन व रात्री सोसाट्याचा वारा यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. वारा सुरू झाल्याबरोबर वीज गुल होते. त्यानंतर अख्खी रात्र गर्मीतच काढावी लागत आहे. रविवारच्या सायंकाळी संपूर्ण जिल्ह्यात वादळाने थैमान घातले होते. सायंकाळी ७ वाजता सुरू झालेले वादळ रात्री ९ वाजेपर्यंत सुरू होते. सोसाट्याच्या वार्‍यामुळे आलापल्लीपासून ८ किमी अंतरावरील वीज खांबावर झाड कोसळल्याने सिरोंचा तालुक्यातील वीज पुरवठा रात्रभर बंद होता. गडचिरोली शहरातही वादळाने थैमान घातले. अनेक नागरिकांच्या घरावरील टिन, कवेलू उडून गेले. त्यामुळे काही काळ विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. मागील आठ दिवसापासून जिल्ह्यात दिवसा प्रचंड तापमान व सायंकाळी वादळ सुटत असल्याने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. वीजा पडण्याचे प्रमाणही वाढले आहे. दुर्गम व ग्रामीण भागात तेंदूपत्ता संकलनाचे काम सुरू झाले आहे. दुसर्‍या गावावरून आलेले तेंदूपत्ता मजूर जंगलामध्येच राहत आहेत. या मजुरांनी ताडपत्रीने बनविलेल्या झोपडीमध्ये आश्रय घेतला आहे. सोसाट्याच्या वार्‍यामुळे या झोपड्या उडून जात आहेत. (नगर प्रतिनिधी)