शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

धानावरची निर्यात बंदी उठवा

By admin | Updated: December 13, 2014 01:54 IST

जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या नानाविध समस्या व प्रश्नासंदर्भात गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी ...

गडचिरोली : जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या नानाविध समस्या व प्रश्नासंदर्भात गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी केंद्रीय खाद्य व अन्न पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांची दिल्ली येथे भेट घेवून त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली व धानावरील निर्यात बंदी उठविण्यात यावी, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांचे निवेदन सादर केले.याप्रसंगी पासवान यांनी सदर मागण्यांवर योग्य तो निर्णय घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. यावेळी दिल्ली भाजपाचे रोजगार आघाडीचे अध्यक्ष तुषार रावल, रवींद्र भांडेकर, सतिश चिचघरे उपस्थित होते. गडचिरोली जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्यावतीने गडचिरोली व अहेरी या दोन प्रादेशिक कार्यालयांतर्गत पाच उपप्रादेशिक कार्यालयाच्या देखरेखीखाली ५६ विविध सहकारी संस्थांच्यावतीने जिल्ह्यात धान्य खरेदी केंद्रामार्फत शेतकऱ्यांकडून धानाची खरेदी केल्या जाते.मात्र सदर धान्याची साठवणूक करण्यासाठी जिल्ह्यात पाहिजे त्या प्रमाणात गोदामाचे बांधकाम झालेले नसल्याने महामंडळाला धान्य बाहेर उघड्यावरच ठेवावे लागतात. या धान्याची उचल वेळेवर होत नसल्याने कोट्यवधी रूपयांच्या धानाची पावसामुळे नासाडी होते. जिल्ह्याच्या या मूलभूत प्रश्नावर तोडगा काढून धानाची उचल वेळीस होण्यासाठी खासदार अशोक नेते यांनी दिल्ली येथे केंद्रीय खाद्य व अन्न पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांची भेट घेऊन धान्यावरील निर्यात बंदी उठवून धानाची त्वरित उचल करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा केली. तसेच गडचिरोली जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादनाच्या तुलनेत योग्य हमीभाव देऊन जिल्ह्यातील धान खरेदी केंद्र त्वरित सुरू करण्याची विनंती केली व सदर माण्यांचे निवेदन केंद्रीय मंत्र्यांना सादर केले.सद्यस्थितीत धानावर निर्यात बंदी असल्याने कोट्यवधीचे धान्य पावसाने सडतात. या बाबींची दखल घेऊन धान्यावरील निर्यात बंदी उठविण्यात यावी, उत्पादन खर्चाच्या तुलनेत धानाची हमीभाव ठरवून धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल २०० रूपये बोनस जाहीर करण्यात यावा, यावर्षी अत्यल्प व अवेळी पाऊस झाल्याने धानपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, त्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करून त्यांना नुकसानीच्या प्रमाणात नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत देण्यात यावी, तसेच जिल्ह्यातील धान खरेदी केंद्र त्वरित सुरू करण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन खासदार अशोक नेते यांनी केंद्रीय मंत्र्यांना सादर केले. (जिल्हा प्रतिनिधी)