शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

धानावरची निर्यात बंदी उठवा

By admin | Updated: December 13, 2014 01:54 IST

जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या नानाविध समस्या व प्रश्नासंदर्भात गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी ...

गडचिरोली : जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या नानाविध समस्या व प्रश्नासंदर्भात गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी केंद्रीय खाद्य व अन्न पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांची दिल्ली येथे भेट घेवून त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली व धानावरील निर्यात बंदी उठविण्यात यावी, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांचे निवेदन सादर केले.याप्रसंगी पासवान यांनी सदर मागण्यांवर योग्य तो निर्णय घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. यावेळी दिल्ली भाजपाचे रोजगार आघाडीचे अध्यक्ष तुषार रावल, रवींद्र भांडेकर, सतिश चिचघरे उपस्थित होते. गडचिरोली जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्यावतीने गडचिरोली व अहेरी या दोन प्रादेशिक कार्यालयांतर्गत पाच उपप्रादेशिक कार्यालयाच्या देखरेखीखाली ५६ विविध सहकारी संस्थांच्यावतीने जिल्ह्यात धान्य खरेदी केंद्रामार्फत शेतकऱ्यांकडून धानाची खरेदी केल्या जाते.मात्र सदर धान्याची साठवणूक करण्यासाठी जिल्ह्यात पाहिजे त्या प्रमाणात गोदामाचे बांधकाम झालेले नसल्याने महामंडळाला धान्य बाहेर उघड्यावरच ठेवावे लागतात. या धान्याची उचल वेळेवर होत नसल्याने कोट्यवधी रूपयांच्या धानाची पावसामुळे नासाडी होते. जिल्ह्याच्या या मूलभूत प्रश्नावर तोडगा काढून धानाची उचल वेळीस होण्यासाठी खासदार अशोक नेते यांनी दिल्ली येथे केंद्रीय खाद्य व अन्न पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांची भेट घेऊन धान्यावरील निर्यात बंदी उठवून धानाची त्वरित उचल करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा केली. तसेच गडचिरोली जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादनाच्या तुलनेत योग्य हमीभाव देऊन जिल्ह्यातील धान खरेदी केंद्र त्वरित सुरू करण्याची विनंती केली व सदर माण्यांचे निवेदन केंद्रीय मंत्र्यांना सादर केले.सद्यस्थितीत धानावर निर्यात बंदी असल्याने कोट्यवधीचे धान्य पावसाने सडतात. या बाबींची दखल घेऊन धान्यावरील निर्यात बंदी उठविण्यात यावी, उत्पादन खर्चाच्या तुलनेत धानाची हमीभाव ठरवून धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल २०० रूपये बोनस जाहीर करण्यात यावा, यावर्षी अत्यल्प व अवेळी पाऊस झाल्याने धानपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, त्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करून त्यांना नुकसानीच्या प्रमाणात नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत देण्यात यावी, तसेच जिल्ह्यातील धान खरेदी केंद्र त्वरित सुरू करण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन खासदार अशोक नेते यांनी केंद्रीय मंत्र्यांना सादर केले. (जिल्हा प्रतिनिधी)