शहरं
Join us  
Trending Stories
1
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
2
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
3
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले...
4
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
5
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
6
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
7
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
8
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
9
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
10
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
11
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
12
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी
13
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
14
शाळेच्या गेटमधून आत शिरली, अचानक चक्कर येऊन कोसळली; सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू
15
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
16
दुसरा श्रावण गुरुवार: १० मिनिटांत होणारे प्रभावी ‘गुरुस्तोत्र’ म्हणा; दत्तगुरूंची कृपा मिळवा
17
डोळ्यांवर काकडी ठेवल्याने खरंच रिलॅक्स वाटतं की फक्त ब्यूटी ट्रेंड? सत्य समजल्यावर वाटेल आश्चर्य
18
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
19
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
20
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?

अजूनही रेतीघाटांचा लिलाव अधांतरीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 22:49 IST

जिल्हा प्रशासनाने रेती घाटांना पर्यावरण विषयक परवानगी मिळण्यासाठी प्रस्ताव राज्यस्तरीय समितीकडे सादर केला आहे. दोन पैकी एका समितीने परवानगी दिली आहे. दुसऱ्या समितीची परवानगी अजूनपर्यंत मिळाली नाही. ती कधी दिली जाईल, हे सुद्धा अनिश्चित आहे. त्यामुळे रेतीघाट कधी सुरू होतील, याबाबत अधिकारीही अनभिज्ञ आहेत.

ठळक मुद्देप्रस्ताव राज्यस्तरावर पडून : एका समितीने दिली मान्यता

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हा प्रशासनाने रेती घाटांना पर्यावरण विषयक परवानगी मिळण्यासाठी प्रस्ताव राज्यस्तरीय समितीकडे सादर केला आहे. दोन पैकी एका समितीने परवानगी दिली आहे. दुसऱ्या समितीची परवानगी अजूनपर्यंत मिळाली नाही. ती कधी दिली जाईल, हे सुद्धा अनिश्चित आहे. त्यामुळे रेतीघाट कधी सुरू होतील, याबाबत अधिकारीही अनभिज्ञ आहेत.मागील वर्षीपर्यंत रेतीघाटांना जिल्हास्तरीय समिती परवानगी देत होती. यावर्षी मात्र राज्यस्तरीय समितीकडून परवानगी घेणे आवश्यक केले आहे. जिल्हा प्रशासनाने एक महिन्यापूर्वी राज्यस्तरीय समितीकडे प्रस्ताव सादर केला होता. तब्बल एक महिन्याच्या कालावधीनंतर १३ फेब्रुवारी रोजी पहिल्या समितीने सुनावणी घेऊन गडचिरोली जिल्ह्यातील रेतीघाटांना परवानगी दिली आहे. आता हा प्रस्ताव दुसºया समितीकडे पाठविण्यात आला आहे. सदर समिती कधी निर्णय घेणार आहे, हे अनिश्चित आहे. विशेष म्हणजे यावर्षी रेतीघाटांना परवानगी देण्यास प्रचंड उशीर होत आहे. राज्यशासनाच्या या कार्यप्रणालीबाबत नागरिकांकडून तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे.राज्यस्तरीय समितीकडे प्रस्ताव असल्याने जिल्हास्तरावरील अधिकारी काहीच करू शकत नाही. केवळ प्रस्ताव सादर करणे एवढेच त्यांच्या हातात आहे. रेती मिळत नसल्याने बांधकामे ठप्प पडली आहेत. मजूर, मिस्त्री बेरोजगारीचा सामना करीत आहेत. काही शासकीय कामे निकृष्ट दर्जाच्या रेतीने सुरू आहेत. लवकर मान्यता मिळण्यासाठी आमदार, खासदार, पालकमंत्री यांनी पाठपुरावा करण्याची गरज आहे. मात्र अजूनपर्यंत एकाही लोकप्रतिनिधीने याबाबत पाठपुरावा केला नसल्याचे दिसून येत आहे. मान्यता देण्याची प्रक्रिया तत्काळ आटोपावी, अशी मागणी आहे.राज्यस्तरीय समितीच्या परवानगीनंतर लिलाव प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष रेतीघाट सुरू होण्यास पुन्हा एक महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.घरकुलाची कामे ठप्पचगडचिरोली शहरासह जिल्हाभरात घरकूल बांधकामांना परवानगी देण्यात आली आहे. घरकूल लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून देण्याबाबतचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र अजूनपर्यंत पर्यावरणविषयक परवानगी मिळाली नसल्याने घरकुल लाभार्थ्यांसाठी घाट आरक्षित ठेवणेही अशक्य झाले आहे. त्यामुळे घरकुलाची कामे सुद्धा ठप्प पडली आहेत.रेती मिळेना, बांधकामे ठप्पसर्वसाधारणपणे नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यात रेतीघाट सुरू होत होते. मात्र यावर्षी फेब्रुवारी महिन्याला सुरुवात झाली तरी अजूनपर्यंत रेतीघाट सुरू झाले नाही. पावसाळा संपताच बांधकामांना सुरुवात होते. दरवर्षी डिसेंबर महिन्यातच रेतीघाट सुरू होत असल्याने बांधकामासाठी रेती उपलब्ध होत होती. यावर्षी मात्र रेती मिळणे कठीण झाले आहे. विशेष म्हणजे एखादे वर्षी रेतीघाटांचा लिलाव होण्यास उशीर झाला तर चोरट्या मार्गाने रेती उपलब्ध करून दिली जात होती. मात्र मागील वर्षीपासून सुमारे १ लाख १२ हजार रूपयांचा दंड ठोकण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतल्याने रेतीची चोरी कायमची बंद झाली आहे. रेतीच मिळत नसल्याने अनेक बांधकामे ठप्प पडली आहेत. मजूरही बेरोजगार झाले आहेत.