शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

शिळे अन्न जनावरांसाठी घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 23:40 IST

लग्न समारंभात शिल्लक राहिलेले अन्न जनावरांना खाऊ घातले जाते. मात्र सदर अन्न जनावरांसाठी अतिशय धोकादायक असून शिळे अन्न खाल्ल्यामुळे शिवणी खुर्द येथील तीन जनावरे नुकतीच दगावली आहेत.

ठळक मुद्देप्लास्टिकमुळे जनावरांना धोका : शिवणी खुर्द येथील तीन जनावरे दगावली

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : लग्न समारंभात शिल्लक राहिलेले अन्न जनावरांना खाऊ घातले जाते. मात्र सदर अन्न जनावरांसाठी अतिशय धोकादायक असून शिळे अन्न खाल्ल्यामुळे शिवणी खुर्द येथील तीन जनावरे नुकतीच दगावली आहेत.लग्न समारंभात हजारो नागरिकांचा स्वयंपाक केला जातो. बऱ्याचवेळा यातील काही अन्न शिल्लक राहते. सदर अन्न दुसºया दिवशी किंवा तिसºया दिवशी जनावरांना खाऊ घातले जाते. लग्नकार्य दुपारी राहत असल्याने पहाटेलाच स्वयंपाक केला जातो. उन्हाळ्यामध्ये प्रचंड गरमी राहत असल्याने सदर अन्न सायंकाळपर्यंतच टिकू शकते. सायंकाळी गावातील नागरिकांना जेवन दिले जाते. त्यानंतर शिल्लक राहिलेले अन्न दुसºया दिवशी सकाळी किंवा सायंकाळी फेकून देण्याऐवजी जनावरांना खाऊ घातले जाते. मात्र सदर अन्न जनावरांसाठी धोकादायक ठरते.जनावरांची पचनसंस्था ही मानवी पंचनसंस्थेच्या तुलनेत अतिशय वेगळी राहते. त्यांना गवत जरी व्यवस्थित पचत असले तरी शिजलेले अन्न, तेलकट अन्न पचत नाही. ही बाब काही पशुपालकांना माहीत राहत नाही. त्यामुळे ते जनावरांना पोटभर अन्न खाऊ घालतात. परिणामी अन्न न पचल्याने पोट फुगणे यासारखी लक्षण जनावरांमध्ये दिसून येतात.बºयाचवेळा प्लास्टिकचे पात्र, द्रोण रस्त्याच्या बाजुला फेकून दिले जातात. जनावरे अन्न खातेवेळी प्लास्टिकचे द्रोण व पात्र सुध्दा खातात. त्यामुळेही जनावरांची प्रकृती बिघडत असल्याचे दिसून आले आहे. आरमोरी तालुक्यातील वैरागड पशुवैद्यकीय दवाखान्याच्या अंतर्गत येणाºया शिवणी खुर्द येथील तीन जनावरे आठ दिवसांपूर्वी दगावली. ही जनावरे एकटांग्या रोगाने दगावली असावी, असा तेथील शेतकºयांचा अंदाज होता. मात्र पशुवैद्यकीय अधिकाºयांनी या जनावरांची तपासणी केली असता, तिन्ही जनावरे शिळे अन्न खाल्याने मृत्यू पावली असल्याचे दिसून आले. या जनावरांमध्ये एकटांग्या रोगाची लक्षणे दिसून आली नाही. मात्र भविष्यातील धोका लक्षात घेऊन १२५ जनावरांना घटसर्प व एकटांग्या रोगाच्या लसी देण्यात आल्या.लग्नकार्यात शिल्लक राहिलेले अन्न जनावरांना खाऊ घातले जाते. मात्र शिजलेले अन्न जनावरांसाठी धोकादायक राहते. कार्यक्रम आटोपल्यानंतर प्लास्टिकचे पात्र व द्रोण रस्त्याच्या बाजुला फेकले जातात. जनावरे अन्न खाताना प्लास्टिकचे द्रोण व पात्र सुध्दा खातात. यामुळे जनावरांच्या पोटात प्लास्टिकचा गोळा तयार होते. यामुळे जनावरांना धोका राहतो. त्यामुळे प्लास्टिकचे पात्र व द्रोण यांची व्यवस्थित विल्हेवाट लावावी, जेणे करून सदर प्लास्टिक जनावरे खाणार नाही. याबाबत शेतकरी व पशुपालकांनी विशेष खबदारी घ्यावी.- डॉ. किशोर भदाणे, पशुधन विकास अधिकारी, वैरागड