शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: कलांमध्ये भाजपाची 'एक नंबर' कामगिरी; NDA ची सत्ता राखण्याच्या दिशेनं घोडदौड
2
Bihar Election 2025 Result: प्रशांत किशोर यांचे ३ उमेदवार आघाडीवर; एक्झिट पोल खरे ठरणार?
3
IND vs SA 1st Test : गिल पुन्हा अनलकी; अखेर बावुमानं संपवली दक्षिण आफ्रिकेची 'साडेसाती'
4
Bihar Election 2025 Result: सुरुवातीचे कल हाती; BJP-RJD मध्ये काँटे की टक्कर, NDA आघाडीवर
5
Stock Market Today: सुरुवातीच्या व्यवहारात १०० अंकांपेक्षा अधिक घसरला बाजार, २५,८०० च्या खाली निफ्टी
6
Bihar Election: सरकार स्थापन करण्यासाठी किती जागा आवश्यक? समजून घ्या बहुमताचं गणित!
7
बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावं आल्यानं खळबळ
8
ICUमध्ये धर्मेंद्र आणि देओल कुटुंबाचा गुपचूप व्हिडीओ बनवणं पडलं महागात, हॉस्पिटलचा कर्मचारी अटकेत
9
"माझे काही फोटो अश्लील पद्धतीने...", अचानक व्हायरल झाल्यावर गिरीजा ओकने व्यक्त केली चिंता
10
बंडखोरीवर उपाय: अर्ज भरल्यावर भाजप जाहीर करणार उमेदवारांची यादी; ८०% नावे निश्चित
11
जबरदस्त रिटर्न देईल 'ही' स्कीम, केवळ ₹५,००० ची गुंतवणूक देईल ₹२६ लाखांपेक्षा जास्त फंड; पाहा कॅलक्युलेशन
12
दिल्लीत स्फोट घडवणाऱ्यांना कडक इशारा; मास्टरमाईंड डॉ. उमरचे पुलवामातील घर IED स्फोटकांनी उडवले!
13
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
14
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
15
“अजित पवार सत्तेसाठी लाचार असल्याने ते सत्तेतून बाहेर पडण्याचा प्रश्नच नाही”; काँग्रेसची टीका
16
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
17
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
18
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
19
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
20
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शिळे अन्न जनावरांसाठी घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 23:40 IST

लग्न समारंभात शिल्लक राहिलेले अन्न जनावरांना खाऊ घातले जाते. मात्र सदर अन्न जनावरांसाठी अतिशय धोकादायक असून शिळे अन्न खाल्ल्यामुळे शिवणी खुर्द येथील तीन जनावरे नुकतीच दगावली आहेत.

ठळक मुद्देप्लास्टिकमुळे जनावरांना धोका : शिवणी खुर्द येथील तीन जनावरे दगावली

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : लग्न समारंभात शिल्लक राहिलेले अन्न जनावरांना खाऊ घातले जाते. मात्र सदर अन्न जनावरांसाठी अतिशय धोकादायक असून शिळे अन्न खाल्ल्यामुळे शिवणी खुर्द येथील तीन जनावरे नुकतीच दगावली आहेत.लग्न समारंभात हजारो नागरिकांचा स्वयंपाक केला जातो. बऱ्याचवेळा यातील काही अन्न शिल्लक राहते. सदर अन्न दुसºया दिवशी किंवा तिसºया दिवशी जनावरांना खाऊ घातले जाते. लग्नकार्य दुपारी राहत असल्याने पहाटेलाच स्वयंपाक केला जातो. उन्हाळ्यामध्ये प्रचंड गरमी राहत असल्याने सदर अन्न सायंकाळपर्यंतच टिकू शकते. सायंकाळी गावातील नागरिकांना जेवन दिले जाते. त्यानंतर शिल्लक राहिलेले अन्न दुसºया दिवशी सकाळी किंवा सायंकाळी फेकून देण्याऐवजी जनावरांना खाऊ घातले जाते. मात्र सदर अन्न जनावरांसाठी धोकादायक ठरते.जनावरांची पचनसंस्था ही मानवी पंचनसंस्थेच्या तुलनेत अतिशय वेगळी राहते. त्यांना गवत जरी व्यवस्थित पचत असले तरी शिजलेले अन्न, तेलकट अन्न पचत नाही. ही बाब काही पशुपालकांना माहीत राहत नाही. त्यामुळे ते जनावरांना पोटभर अन्न खाऊ घालतात. परिणामी अन्न न पचल्याने पोट फुगणे यासारखी लक्षण जनावरांमध्ये दिसून येतात.बºयाचवेळा प्लास्टिकचे पात्र, द्रोण रस्त्याच्या बाजुला फेकून दिले जातात. जनावरे अन्न खातेवेळी प्लास्टिकचे द्रोण व पात्र सुध्दा खातात. त्यामुळेही जनावरांची प्रकृती बिघडत असल्याचे दिसून आले आहे. आरमोरी तालुक्यातील वैरागड पशुवैद्यकीय दवाखान्याच्या अंतर्गत येणाºया शिवणी खुर्द येथील तीन जनावरे आठ दिवसांपूर्वी दगावली. ही जनावरे एकटांग्या रोगाने दगावली असावी, असा तेथील शेतकºयांचा अंदाज होता. मात्र पशुवैद्यकीय अधिकाºयांनी या जनावरांची तपासणी केली असता, तिन्ही जनावरे शिळे अन्न खाल्याने मृत्यू पावली असल्याचे दिसून आले. या जनावरांमध्ये एकटांग्या रोगाची लक्षणे दिसून आली नाही. मात्र भविष्यातील धोका लक्षात घेऊन १२५ जनावरांना घटसर्प व एकटांग्या रोगाच्या लसी देण्यात आल्या.लग्नकार्यात शिल्लक राहिलेले अन्न जनावरांना खाऊ घातले जाते. मात्र शिजलेले अन्न जनावरांसाठी धोकादायक राहते. कार्यक्रम आटोपल्यानंतर प्लास्टिकचे पात्र व द्रोण रस्त्याच्या बाजुला फेकले जातात. जनावरे अन्न खाताना प्लास्टिकचे द्रोण व पात्र सुध्दा खातात. यामुळे जनावरांच्या पोटात प्लास्टिकचा गोळा तयार होते. यामुळे जनावरांना धोका राहतो. त्यामुळे प्लास्टिकचे पात्र व द्रोण यांची व्यवस्थित विल्हेवाट लावावी, जेणे करून सदर प्लास्टिक जनावरे खाणार नाही. याबाबत शेतकरी व पशुपालकांनी विशेष खबदारी घ्यावी.- डॉ. किशोर भदाणे, पशुधन विकास अधिकारी, वैरागड