शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

बापूंच्या विचारांनी प्रेरित होऊन ५० वर्षांपूर्वी उभारला पुतळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 00:15 IST

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अहिंसेच्या विचारांनी प्रेरित झालेल्या आरमोरी तालुक्यातील कुलकुली येथील गावकऱ्यांनी सुमारे ५० वर्षांपूर्वी महात्मा गांधींच्या पुतळ्याची गावात उभारणी केली.

ठळक मुद्देइतिहासाची साक्ष : कुलकुली गाव अहिंसेच्या विचारांनी भारावले

प्रदीप बोडणे ।लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अहिंसेच्या विचारांनी प्रेरित झालेल्या आरमोरी तालुक्यातील कुलकुली येथील गावकऱ्यांनी सुमारे ५० वर्षांपूर्वी महात्मा गांधींच्या पुतळ्याची गावात उभारणी केली. हा पुतळा अजूनही गावकऱ्यांना अहिंसेच्या विचारांची प्रेरणा देत आहे.माझ्या देशबांधवांना अंगभर कपडे मिळत नाही. मग मी अंगभर कपडे कसे नेसू, असे विचार बाळगून स्वत: संपूर्ण जीवनभर पंचा घातला. देशवासीयांना मीठ मिळत नाही, त्यामुळे मी ते कसे खाऊ, असे म्हणून जेवनात मिठाचा त्याग केला. अहिंसेच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाºया या अहिंसेच्या पुजाºयाच्या नावाचा राज्यकर्त्यांनी सोयीनुसार वापर केला. मात्र या युग प्रवर्तकाचे विचार भावीपिढीला अहिंसेची प्रेरणा देत राहावे, याउद्देशाने आरमोरी तालुक्यातील कुलकुली या गावात सुमारे ५० वर्षांपूर्वी कोवे गुरूजींच्या पुढाकाराने महात्मा गांधींचा पुतळा उभारला गेला. गांधीजींच्या कर्तृत्व व विचाराने भारावलेल्या कुलकुलीवासीयांनी स्वत:कडे पैसे गोळा केले. ज्यांच्याकडे पैसे नव्हते, त्यांनी श्रमदान करण्याची तयारी दर्शविली. सर्व गावकºयांच्या सहकार्यातून महात्मा गांधीजींचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला. कुलकुली हे गाव आदिवासीबहुल आहे.५० वर्षांपूर्वी महात्मा गांधींचे विचार दुर्गम व आदिवासीबहुल गावांपर्यंत पोहोचले. यावरून महात्मा गांधींजींचे विचार किती महत्त्वाचे आहे, याची कल्पना येण्यास मदत होते.दरवर्षी २ आॅक्टोबरला या गावात कार्यक्रम आयोजित केला जातो. अहिंसेच्या या पुजाºयाला संपूर्ण गाव नतमस्तक होते. गांधींजींच्या एका हाकेला सकारात्मक प्रतिसाद देत या गावातील नागरिकांनी चिमुर स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला होता. स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेणारे देशभक्त आज हयात नसले तरी राष्टÑपिता महात्मा गांधींजींचा पुतळा त्यांच्या कार्याची आठवण करून देत आहे.अंगारा-मालेवाडा मार्गावर रस्त्यालगत असलेला गांधीजींचा पुतळा ये-जा करणाºयांचे लक्ष वेधून घेत असून अहिंसेच्या मार्गाने चालण्याचा संदेश देत आहे. इतिहासाची साक्ष देणाºया या पुतळ्याकडे मात्र काही प्रमाणात दुर्लक्ष झाले आहे. स्थानिक नागरिकांनी या जागेचा वापर आपले वाहन ठेवण्यासाठी केला आहे. त्यामुळे पुतळा अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे. स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने या पुतळ्याची देखभाल व दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे.कुलकुली गावातील महात्मा गांधीजींचा पुतळा इतिहासाची साक्ष देणारा आहे. त्यामुळे या पुतळ्याचे विशेष महत्त्व आहे. पुतळ्याच्या सभोवताल वाहने ठेवली जात असल्याची बाब ग्रामपंचायत पदाधिकारी व काही जागरूक नागरिकांच्या लक्षात आली आहे. या ठिकाणचे अतिक्रमण हटवून सभोवतालच्या परिसराचे सौंदर्यीकरण करण्याचे काम हाती घेतले जाईल, तसा ठराव गावकºयांनी घेतला आहे.- नीलेश जौंजाळकर, ग्रामसेवक, कुलकुली

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधी