शहरं
Join us  
Trending Stories
1
गोंधळात गोंधळ: ससूनमधील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी SIT, मात्र अध्यक्षावरच आहेत भ्रष्टाचाराचे आरोप!
2
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
3
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
4
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
5
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
6
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
7
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
8
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
9
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
12
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
13
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
14
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
15
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
16
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
17
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
18
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
19
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
20
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 

राज्यातील १३४० शासकीय पाळणाघरे अधांतरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 12:12 PM

राज्याच्या ग्रामीण आणि दुर्गम भागात अनेक वर्षांपासून कार्यरत असलेली राजीव गांधी राष्ट्रीय पाळणाघर योजना सध्या कोमात गेली आहे.

ठळक मुद्देदीड वर्षापासून वालीच नाहीकेंद्राने अंग काढले, राज्याने हात वर केले

मनोज ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्याच्या ग्रामीण आणि दुर्गम भागात अनेक वर्षांपासून कार्यरत असलेली राजीव गांधी राष्ट्रीय पाळणाघर योजना सध्या कोमात गेली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या टोलवाटोलवीमुळे १३४० पाळणाघरे दीड वर्षांपासून अधांतरी आहेत. पोषक आहार नाही, की कर्मचाऱ्यांचा पगार नाही. परिणामी हजारो बालकांची आबाळ होत असून ते कुपोषणाच्या खाईत ढकलले जात आहेत.केंद्र सरकारच्या समाजकल्याण बोर्डमार्फत अनेक वर्षांपासून राजीव गांधी राष्ट्रीय पाळणाघर योजना चालविली जात होती. सहा वर्षापर्यंतच्या बालकांना पोषक आहार देण्यापासून तर त्यांचा सांभाळ करून प्राथमिक स्वरुपाचे शिक्षण देण्यापर्यंतची कामे या पाळणाघरांमधून केली जात होती. डिसेंबर २०१६ पर्यंत ही योजना सुरूळीत सुरू होती. पण जानेवारी २०१७ पासून ही योजना सर्व राज्यांच्या समाजकल्याण बोर्डांकडे सुपूर्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला.महाराष्ट्राच्या महिला व बालकल्याण मंत्रालयाने ही योजना चालविण्यास असमर्थता दर्शवून जिल्हा परिषदांकडे जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न केला. पण कोणीही त्या योजनेची जबाबदारी घेतली नाही. परिणामी जानेवारी २०१७ पासून राज्यातील सर्व पाळणाघरांचे काम पुढील आदेशापर्यंत थांबविण्याचे आदेश पाळणाघरे चालविणाऱ्या संबंधित संस्थांना देण्यात आले. यासंदर्भात राज्याच्या समाजकल्याण बोर्डकडे विचारणा केली असता त्या योजनेवर अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचे सांगण्यात आले.प्रत्येक पाळणाघरावर एक शिक्षिका आणि एक सेविका अशी दोन पदे मंजूर होती. यातील शिक्षिका तर डीएड् झालेल्या आहेत. पण दीड वर्षांपासून हे २६८० कर्मचारी पाळणाघर पुन्हा सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आर्थिक हालअपेष्टा सहन करीत दिवस काढत आहेत.

बालकांची कुपोषणाकडे वाटचालग्रामीण भागात बालकांचे आई-वडील मोलमजुरीला जातात. दिवसभर त्यांच्या मुलांचा सांभाळ या पाळणाघरांमध्ये होत होता. मात्र सध्या पाळणाघरच सुरू नसल्याने पोषक आहार बंद होऊन हजारो मुले कुपोषित होत आहेत. याशिवाय दिवसभर त्यांचा सांभाळ करण्यासाठी घरी कोणी राहात नसल्यामुळे त्या बालकांची आबाळ होत आहे.

३० टक्के निधीसाठीही राज्य सरकार अनुत्सुकजानेवारी २०१७ पासून केंद्राने ही योजना राज्याकडे सोपविताना ६० टक्के निधी केंद्राकडून देण्यात येईल असे सांगितले होते. उर्वरित निधीपैकी ३० टक्के निधी राज्याने द्यावा तर १० टक्के निधी संबंधित संस्थांनी स्वत: उभारावा असे सुचविले. मात्र या योजनेसाठी ३० टक्के निधी खर्च करण्याचीही राज्य सरकारची तयारी नसल्यामुळे गोरगरीब बालकांबाबत महिला व बालकल्याण विभाग एवढा निष्ठूर कसा झाला? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :Governmentसरकार