शहरं
Join us  
Trending Stories
1
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
2
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
3
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
4
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
5
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
6
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
7
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
8
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
9
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
10
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
11
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
12
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
13
आव्हाड घुसले पोलिस कारखाली, ओढून काढावे लागले बाहेर
14
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
15
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
16
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई
17
भारतीय महिला संघ लॉर्ड्स वनडे जिंकण्यास सज्ज; इंग्लंडविरुद्ध दुसरा सामना आज
18
मुंबईची सारा जामसुतकर ठरली ‘चॅम्पियन’
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

अहेरीत वादळाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू

By admin | Updated: May 20, 2016 01:14 IST

अहेरी, आलापल्ली भागात बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

पालकमंत्र्यांकडून नुकसानीची चौकशी : यंत्रणा कामाला लागलीअहेरी : अहेरी, आलापल्ली भागात बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम तलाठ्यांनी सुरू केले आहे. गुरूवारी अहेरी येथे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तलाठी व सामाजिक कार्यकर्ते दिवसभर करीत होते. अहेरी तालुक्यातील पेरमिली, आलापल्ली, अहेरी, महागाव, देवलमरी, वेलगुर, बोरी, कमलापूर, उमानूर, गोविंदपूर, जिमलगट्टा, देचली, रामय्यापेठा आदी भागात मोठ्या प्रमाणावर वादळामुळे नुकसान झाले आहे. आलापल्लीत वन नाक्यासमोरील झाड कोसळल्याने नऊ जण जखमी झाले. तर आलापल्ली वन वसाहतीतील ३५ निवासस्थानावरील छत उडाले. १६ विद्युत खांब उन्मळून पडले. या सर्व बाबीचा पंचनामा तलाठ्यांच्या मार्फत सुरू करण्यात आला आहे. पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी प्रशासनाकडून या नुकसानीबाबतची माहिती जाणून घेऊन प्रत्येक नुकसानग्रस्ताला आर्थिक मदत देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहे. त्यांनी आदेश दिल्यानंतरच प्रशासनाने तत्काळ पंचनामे करण्याचे काम हाती घेतले, अशी माहिती मिळाली आहे. (शहर प्रतिनिधी)