शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वन खात्याकडून कामे सुरू करा

By admin | Updated: February 13, 2015 01:44 IST

शेतकरी व शेतमजुरांच्या विविध मागण्यांकडे वन विभागाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आज गुरूवारी शेकडो शेतकऱ्यांनी तालुक्यातील बामणी येथील वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

बामणी : शेतकरी व शेतमजुरांच्या विविध मागण्यांकडे वन विभागाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आज गुरूवारी शेकडो शेतकऱ्यांनी तालुक्यातील बामणी येथील वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चाचे नेतृत्त्व सिरोंचाचे माजी पं. स. सदस्य समय्या कुळमेथे, राकाँचे सिरोंचा तालुकाध्यक्ष मल्लीकार्जुन आकुला, युवा अध्यक्ष सतिश भोगे, सामाजिक कार्यकर्ते रंजीत ओल्लालवार, तीरूपती चिट्याला, अशोक दुर्गम यांनी केले. शेकडो शेतकरी व शेतमजुरांचा मोर्चा दुपारी १२ वाजता बामणी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या परिसरातून वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयावर पोहोचला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांशी मागण्यांबाबत चर्चा केली. त्यानंतर वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांना निवेदन दिले. या निवेदनात शेतकऱ्यांसाठी मजगीच्या निर्मितीचे व मजगी दुरूस्तीचे कामे सुरू करण्यात यावे, रोजगार निर्मितीसाठी नाल्यावर सिमेंट बंधाऱ्याचे काम सुरू करावे, वन तलाव व वनोत्तर तलावाच्या दुरूस्तीचे काम सुरू करावे, जेणे करून महिला बचतगटांना मत्स्य व्यवसाय उपलब्ध होईल व जंगलातील प्राण्यांना पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत निर्माण होईल. पीआयए कामाचा परत गेलेला निधी पुन्हा मिळवून काम सुरू करण्यात यावे, आयपी अंतर्गत महिला बचतगटांना उद्योगासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, नव्या पीएलएची नियुक्ती करण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश आहे.सन २०१३ ला आलेल्या मुसळधार पावसामुळे बामणीजवळील नाल्याला पूर आल्याने नाल्याच्या दोन्ही बाजुला असलेल्या १०० एकरातील धान पिकाची रोवणी पुरात वाहून गेली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या भागात एकात्मिक पाणलोट विकास योजना कार्यान्वित करून मजगीचे कामे करावीत, तसेच शेतात साचलेला रेतीचा उपसा करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशीही मागणी चर्चेदरम्यान शेतकऱ्यांनी केली. या आंदोलनात सिरोंचा तालुक्यातील बामणी परिसरातील पाच ते सहा गावातील शेतकरी, शेतमजूर सहभागी झाले होते. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी न्याय देण्याचे आश्वासन दिले. (वार्ताहर)