शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

रोहयोची कामे तातडीने सुरू करा

By admin | Updated: February 10, 2016 01:33 IST

संपूर्ण कोरची तालुक्यात पिकांची अंतिम पैसेवारी ५० पैसेपेक्षा कमी आहे. दुष्काळग्रस्त परिस्थिती गंभीर असल्याने येथील गरीब नागरिक,

कोरचीत आढावा बैठक : खासदारांचे प्रशासनाला निर्देशकोरची : संपूर्ण कोरची तालुक्यात पिकांची अंतिम पैसेवारी ५० पैसेपेक्षा कमी आहे. दुष्काळग्रस्त परिस्थिती गंभीर असल्याने येथील गरीब नागरिक, शेतकरी, शेतमजुरांना दिलासा देण्यासाठी तातडीने रोजगार हमी योजनेची कामे सुरू करा, असे निर्देश खासदार अशोक नेते यांनी अधिकाऱ्यांना दिले. येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी आमदार क्रिष्णा गजबे, सत्यनारायण खंडेलवाल, नाना नाकाडे, डॉ. भारत खटी, पं.स. सदस्य चांगदेव फाये, आनंदराव चौबे, डॉ. शैलेंद्रकुमार बिसेन, रवींद्र ओल्लालवार, तहसीलदार विजय बोरूडे, संवर्ग विकास अधिकारी वैरागडे आदी उपस्थित होते. याप्रसंगी खासदार अशोक नेते यांच्या हस्ते सामूहिक वनहक्काच्या ३५ दाव्यांचे वितरण करण्यात आले. शेतकऱ्यांना शेतीला जोड धंदा म्हणून कुक्कुटपालन, बकरीपालन, मत्स्य व्यवसाय, मधमाशी पालन, गोपालन आदीसह पाले भाज्या पिकविणे तसेच विविध प्रकारच्या फळांचे झाडे लावण्यासाठी कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना मदत करावी, अशी सूचना खा. नेते यांनी केली. (तालुका प्रतिनिधी)