शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

सूरजागड जंगलातून रस्ता कामाला सुरुवात

By admin | Updated: March 17, 2016 01:53 IST

लॉयर्ड्स मेटल या कंपनीने कच्चा लोह दगड नेण्याकरिता सूरजागड जंगलातून कच्चा रस्ता बनविण्यास सुरुवात केली आहे.

एटापल्ली : लॉयर्ड्स मेटल या कंपनीने कच्चा लोह दगड नेण्याकरिता सूरजागड जंगलातून कच्चा रस्ता बनविण्यास सुरुवात केली आहे. शेडच्या कामासाठी प्रचंड गोपनीयता बाळगण्यात आली आहे. लॉयर्ड्स मेटल कंपनीने सूरजागड पहाडीवरील लोह दगड उचलण्यासाठी लिज घेतली असून मागील सात वर्षांपासून कच्चा माल नेण्याकरिता या कंपनीने अनेक प्रयत्न केले. परंतु सर्व प्रयत्न नक्षलाद्यांकडून हाणून पाडण्यात आले. नक्षल्यांकडून सुरुवातीला या कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांचे अपहरण करून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले होते. त्यानंतर वनाधिकारी व कर्मचाऱ्यांनाही मारहाण करण्यात आली. अनेक वाहने जाळले, दोन वर्षांपूर्वी कंपनीचे अधिकारी, कंत्राटदार, सूरजागडचे पोलीस पाटील या तिघांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या कंपनीच्या लोकांवर वेगवेगळे सात हल्ले झालेत. तिघांच्या हत्येनंतर कंपनीने या भागातून काम बंद करून माघार घेतली होती. दोन वर्षानंतर मागील आठवड्यात हेडरी गावापासून घनदाट जंगलातून रस्ता बनविण्याच्या कामास कंपनीने सुरुवात केली आहे. हेडरी ते बांडेपर्यंत ५.५० किमी अंतराचा मार्ग बनविण्याचे कंपनीचे नियोजन आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यावर बांडे-मलमपाडी रस्त्याला जोडून लोहखनिजापर्यंत मार्ग बनवून कच्चा लोहदगड उचल करण्याच्या हालचाली असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी सुद्धा कंपनीने काही गाड्या लोहखनिज नेले आहे. शुक्रवारी हेडरी येथे बाजारात नक्षल्यांनी एका पोलीस शिपायावर गोळी झाडली. या घटनेत ते शहीद झाले. दुसऱ्या दिवशी एका युवकाची हत्या केली. या घटनेनंतर कंपनीने सुरू केलेले रोडचे काम बंद केले आहे. मुख्यमंत्री बुर्गी येथे पोलीस ठाण्याच्या उद्घाटनासाठी आले असताना लोह प्रकल्पाबाबत अजूनपर्यंत कुठलाही निर्णय झालेला नाही, असे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर लॉयर्ड्स मेटल या कंपनीने रस्ता कामात सुरूवात केली. त्यामुळे शासनाने लोह प्रकल्पाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.सूरजागड लोह प्रकल्प निर्माण करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून जोरदार हालचाली सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांपासून केंद्रातील मंत्री हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. या प्रकल्पामुळे अनेकांना रोजगार मिळेल, अशी शासनाची भूमिका आहे. तालुक्यात मोठ्या पोलिसांचा ताफा तैनात करून प्रकल्प सुरू करायचा, असा मनसुबा दिसून येत आहे. मात्र या प्रकल्पातून तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील नागरिकांना येथे नोकऱ्या व रोजगार मिळाला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. - सुरेश बारसागडे, संस्थापक अध्यक्ष,जनहितवादी संघटना, एटापल्ली