शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

सूरजागड जंगलातून रस्ता कामाला सुरुवात

By admin | Updated: March 17, 2016 01:53 IST

लॉयर्ड्स मेटल या कंपनीने कच्चा लोह दगड नेण्याकरिता सूरजागड जंगलातून कच्चा रस्ता बनविण्यास सुरुवात केली आहे.

एटापल्ली : लॉयर्ड्स मेटल या कंपनीने कच्चा लोह दगड नेण्याकरिता सूरजागड जंगलातून कच्चा रस्ता बनविण्यास सुरुवात केली आहे. शेडच्या कामासाठी प्रचंड गोपनीयता बाळगण्यात आली आहे. लॉयर्ड्स मेटल कंपनीने सूरजागड पहाडीवरील लोह दगड उचलण्यासाठी लिज घेतली असून मागील सात वर्षांपासून कच्चा माल नेण्याकरिता या कंपनीने अनेक प्रयत्न केले. परंतु सर्व प्रयत्न नक्षलाद्यांकडून हाणून पाडण्यात आले. नक्षल्यांकडून सुरुवातीला या कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांचे अपहरण करून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले होते. त्यानंतर वनाधिकारी व कर्मचाऱ्यांनाही मारहाण करण्यात आली. अनेक वाहने जाळले, दोन वर्षांपूर्वी कंपनीचे अधिकारी, कंत्राटदार, सूरजागडचे पोलीस पाटील या तिघांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या कंपनीच्या लोकांवर वेगवेगळे सात हल्ले झालेत. तिघांच्या हत्येनंतर कंपनीने या भागातून काम बंद करून माघार घेतली होती. दोन वर्षानंतर मागील आठवड्यात हेडरी गावापासून घनदाट जंगलातून रस्ता बनविण्याच्या कामास कंपनीने सुरुवात केली आहे. हेडरी ते बांडेपर्यंत ५.५० किमी अंतराचा मार्ग बनविण्याचे कंपनीचे नियोजन आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यावर बांडे-मलमपाडी रस्त्याला जोडून लोहखनिजापर्यंत मार्ग बनवून कच्चा लोहदगड उचल करण्याच्या हालचाली असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी सुद्धा कंपनीने काही गाड्या लोहखनिज नेले आहे. शुक्रवारी हेडरी येथे बाजारात नक्षल्यांनी एका पोलीस शिपायावर गोळी झाडली. या घटनेत ते शहीद झाले. दुसऱ्या दिवशी एका युवकाची हत्या केली. या घटनेनंतर कंपनीने सुरू केलेले रोडचे काम बंद केले आहे. मुख्यमंत्री बुर्गी येथे पोलीस ठाण्याच्या उद्घाटनासाठी आले असताना लोह प्रकल्पाबाबत अजूनपर्यंत कुठलाही निर्णय झालेला नाही, असे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर लॉयर्ड्स मेटल या कंपनीने रस्ता कामात सुरूवात केली. त्यामुळे शासनाने लोह प्रकल्पाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.सूरजागड लोह प्रकल्प निर्माण करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून जोरदार हालचाली सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांपासून केंद्रातील मंत्री हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. या प्रकल्पामुळे अनेकांना रोजगार मिळेल, अशी शासनाची भूमिका आहे. तालुक्यात मोठ्या पोलिसांचा ताफा तैनात करून प्रकल्प सुरू करायचा, असा मनसुबा दिसून येत आहे. मात्र या प्रकल्पातून तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील नागरिकांना येथे नोकऱ्या व रोजगार मिळाला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. - सुरेश बारसागडे, संस्थापक अध्यक्ष,जनहितवादी संघटना, एटापल्ली