शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
2
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
3
युद्धबंदीनंतर पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
4
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
5
'युद्धबंदीचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
6
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
7
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
8
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
9
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
10
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
11
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
12
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धबंदीनंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
13
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
14
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
15
'आम्हाला तिसऱ्या पक्षाची...', ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केल्यावर प्रियंका चतुर्वेदींनी दिले उत्तर
16
पाकिस्तानचे अपयश उघड! बिकानेरमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र बूस्टर, नोज कॅप सापडले
17
तुमच्या मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपये जमवायचेत? गुंतवणुकीसाठी 'हे' आहेत ३ बेस्ट पर्याय
18
बोरीवलीच्या नँसी व सुकरवाडी एसटी डेपोसाठी ३ महिन्यांत निविदा काढणार; परिवहन मंत्री सरनाईकांची घोषणा
19
चौकारांच्या हॅटट्रिकसह स्मृती मानधनाने साजरी केली विक्रमी सेंच्युरी!
20
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले

बांबू तोड प्रक्रिया तत्काळ सुरू करा

By admin | Updated: March 12, 2015 02:08 IST

वन विभागाकडून बांबू उपलब्ध होत नसल्याने पेपर मिल कंपनीकडून कामगार कपात व उद्योग बंद होण्याची शक्यता आहे. परिणामी शेकडो कुटुंबावर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. त्

अहेरी : वन विभागाकडून बांबू उपलब्ध होत नसल्याने पेपर मिल कंपनीकडून कामगार कपात व उद्योग बंद होण्याची शक्यता आहे. परिणामी शेकडो कुटुंबावर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. त्यामुळे हजारो नागरिकांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी वन विभागाने तत्काळ बांबू तोड प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी पेपर मील कामगार, मजूर व अहेरी तालुका काँग्रेसच्या वतीने राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे करण्यात आली आहे. यासंदर्भात भामरागडचे उपवनसंरक्षक संजय हलमारे यांच्या मार्फत वनमंत्री मुनगंटीवार यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात पेपर मिल उद्योग आहे. तसेच गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी येथेही बिल्ट कंपनीचा कागद कारखाना आहे. या दोनही पेपर मिलमध्ये नियमित, कंत्राटी व रोजंदारी तत्त्वावर १५ हजार पेक्षा अधिक कामगार काम करीत आहेत. पेपर मिल उद्योगामुळे इतर शेकडो नागरिकांनादेखील मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत आहे. मात्र वन विभागाकडून बांबू तोड प्रक्रिया बंद असल्यामुळे या पेपर मिलला बांबू मिळणे कठिण झाले आहे. त्यामुळे कागद उद्योग बंद होण्याची भीती निर्माण झाली आहे, विहीत कालावधीत बांबू न तोडल्यास बांबू निकामी होतो, असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदन देताना कामगार युनियनेच सदस्य सुरेश उराडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेबुब अली, युका विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष बालाजी गावडे, एम. एम. देशमुख, एम. के. गुडधे, एस. एस. मोटे आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)