शहरं
Join us  
Trending Stories
1
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
2
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
3
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
4
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
5
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
6
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
7
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
8
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
9
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
10
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
11
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
12
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
13
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
14
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
15
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
16
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
17
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
18
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
19
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
20
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'

बांबू तोड प्रक्रिया तत्काळ सुरू करा

By admin | Updated: March 12, 2015 02:08 IST

वन विभागाकडून बांबू उपलब्ध होत नसल्याने पेपर मिल कंपनीकडून कामगार कपात व उद्योग बंद होण्याची शक्यता आहे. परिणामी शेकडो कुटुंबावर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. त्

अहेरी : वन विभागाकडून बांबू उपलब्ध होत नसल्याने पेपर मिल कंपनीकडून कामगार कपात व उद्योग बंद होण्याची शक्यता आहे. परिणामी शेकडो कुटुंबावर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. त्यामुळे हजारो नागरिकांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी वन विभागाने तत्काळ बांबू तोड प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी पेपर मील कामगार, मजूर व अहेरी तालुका काँग्रेसच्या वतीने राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे करण्यात आली आहे. यासंदर्भात भामरागडचे उपवनसंरक्षक संजय हलमारे यांच्या मार्फत वनमंत्री मुनगंटीवार यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात पेपर मिल उद्योग आहे. तसेच गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी येथेही बिल्ट कंपनीचा कागद कारखाना आहे. या दोनही पेपर मिलमध्ये नियमित, कंत्राटी व रोजंदारी तत्त्वावर १५ हजार पेक्षा अधिक कामगार काम करीत आहेत. पेपर मिल उद्योगामुळे इतर शेकडो नागरिकांनादेखील मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत आहे. मात्र वन विभागाकडून बांबू तोड प्रक्रिया बंद असल्यामुळे या पेपर मिलला बांबू मिळणे कठिण झाले आहे. त्यामुळे कागद उद्योग बंद होण्याची भीती निर्माण झाली आहे, विहीत कालावधीत बांबू न तोडल्यास बांबू निकामी होतो, असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदन देताना कामगार युनियनेच सदस्य सुरेश उराडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेबुब अली, युका विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष बालाजी गावडे, एम. एम. देशमुख, एम. के. गुडधे, एस. एस. मोटे आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)