शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
4
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
5
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
6
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
7
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
8
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
9
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
10
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
11
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
12
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
13
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
14
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
15
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
16
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
17
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
18
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
19
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
20
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...

बंधनकारक फेऱ्यांमुळे एसटी अडचणीत

By admin | Updated: December 4, 2014 23:07 IST

एसटीला येणारा खर्च भरून निघत नसतानाही जनतेच्या सेवेसाठी गडचिरोली आगाराच्यावतीने सुमारे २१९ बसफेऱ्या चालविल्या जात असून या बसफेऱ्यांमुळ प्रती किलोमीटर एसटीला २३ रूपयांचा

गडचिरोली आगार : प्रति किलोमीटर २३ रूपये व प्रतिदिवस अडीच लाखांचा तोटागडचिरोली : एसटीला येणारा खर्च भरून निघत नसतानाही जनतेच्या सेवेसाठी गडचिरोली आगाराच्यावतीने सुमारे २१९ बसफेऱ्या चालविल्या जात असून या बसफेऱ्यांमुळ प्रती किलोमीटर एसटीला २३ रूपयांचा तर दर दिवशी अडीच लाख रूपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. हीच परिस्थिती राज्याच्या इतर आगारांमध्ये असल्याचे दिसून येते. गाव तिथे एसटी ही बिद्रवाक्य घेऊन राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस ग्रामीण तसेच दुर्गम भागातील प्रवाशांची वाहतूक करतात. त्यामुळेच एसटीला राज्याची लोकवाहिणी म्हणून ओळखल्या जाते. नफ्यापेक्षाही लोकसेवेचा विचार पुढे करून रस्तयांवरील खाचखडगे पार करीत एसटी धावत असल्याने एसटी विषयी नागरिकांच्या मनात एक आपुलकीची भावना निर्माण झाली आहे. या सर्व कसरती करीत असताना एसटीला स्वत:ला मात्र तोट्याचा सामना करावा लागत आहे. गडचिरोली एसटी आगारसुध्दा यापासून अपवाद नाही. गडचिरोली आगारात एकूण ११० बसेस आहेत. या संपूर्ण बसेसच्या दिवसाच्या एकूण ५७६ बसफेऱ्या होतात. या बसफेऱ्यांमधून गडचिरोली आगाराला दिवसाकाटी ८.५ ते ९ लाख रूपयांचे उत्पन्न प्राप्त होते. मात्र एसटीचा प्रत्यक्ष खर्च मात्र यापेक्षाही जास्त असल्याने महिन्याच्या शेवटी हिशेब काढल्यानंतर एसटीला तोटा झाल्याचे लक्षात येते. एकूण बसफेऱ्यांपैकी सुमारे २१९ बसफेऱ्या बंधनकारक आहेत. यामध्ये १३७ बसफेऱ्या मानवविकास मिशनच्या बसगाड्यांच्या तर एसटीच्या स्वत:च्या बसेसच्या ८२ बसफेऱ्यांचा समावेश आहे. बंधनकारक बसफेऱ्यांमध्ये अपवाद वगळता नेहमीच तोटा सहन करावा लागतो. मात्र जनतेची सेवा करण्याच्या उद्देशाने या बसफेऱ्या चालविल्या जातात. या मार्गावर धावणाऱ्या बसेस बऱ्याचवेळा प्रवाशी घेऊन गेल्या तर आगारात येतेवेळी रिकाम्या येतात. आगारात येतेवेळी प्रवाशी घेऊन आल्या तर जातेवेळी रिकाम्या जातात. एसटीचा प्रतीकिमीचा खर्च सरासरी ३५ रूपये आहे. मात्र या मार्गावर बऱ्याचवेळा एसटी बिनाप्रवाशी धावत असल्याने सरासरी १२ रूपये प्रती किमी उत्पन्न प्राप्त होते. परिणामी एसटीला प्रती किमीमागे २३ रूपयांचे नुकसान सहन करावे लागते. गडचिरोली आगारातील मानव विकास मिशनच्या बसेस दर दिवशी ६ हजार किमी तर इतर बसेस ४ हजार ५०० किमी बंधनकारक मार्गांवर धावतात. एसटीचा पूर्ण खर्च भरून निघण्यासाठी ३५ रूपये किमीप्रमाणे या बसफेऱ्यांमधून दरदिवशी ३ लाख ६७ हजार ५०० रूपयांचे उत्पन्न प्राप्त होणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात मात्र १ लाख २६ हजार रूपयांचेच उत्पन्न प्राप्त होते. त्यामुळे दरदिवशी २ लाख ४१ हजार रूपयांचा तोटा एसटीला सहन करावा लागतो. बंधनकारक बसफेऱ्यांमुळे होणारा तोटा लक्षात घेऊन एसटीने व्यवहारीकतेचे धोरण अवलंबण्यास सुरूवात केली तर या सर्व बसफेऱ्या बंद कराव्या लागतील. मात्र या बंद झाल्यास ग्रामीण भागातील नागरिक व विद्यार्थ्यांची फार मोठी अडचण निर्माण होईल. त्यामुळे लोकप्रतिनिधींचा दबाव वाढतो. एसटी महामंडळ हे राज्य सरकारच्या अखत्यारित असलेले महामंडळ आहे. त्यामुळे व्यवहारिकता व लोकसेवा या दोघांचाही ताळमेळ एसटीला जोडावा लागतो. हे सर्व करीत असताना एसटी मात्र नेहमीच तोट्याचा सामना करीत आलेली आहे. (नगर प्रतिनिधी)