शहरं
Join us  
Trending Stories
1
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
4
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
5
धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
6
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट
7
मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी २५० परप्रांतीय मजूर मुंबईत दाखल; काहींना विमानाने मुंबईत आणले
8
ही तर सोनमपेक्षा एक पाऊल पुढे! बॉयफ्रेंडसाठी पतीला विष दिलं अन् कुणालाही कळण्याआधी केला खेळ खल्लास!
9
Stock Market Today: ७६ अंकांनी घसरून उघडला सेन्सेक्स; ३ सेक्टर्समध्ये तेजी, का अस्थिर आहे मार्केट?
10
भारत बंद होण्याआधीच इंडिया आघाडीचा चक्का जाम; बिहारमध्ये निवडणूक आयोगाविरोधात रस्ते बंद, रेल्वे रोखल्या
11
Pension Scheme: वृद्धापकाळात दरमहा ₹२०,५०० चं पेन्शन देईल ही स्कीम; पाहा याचे जबरदस्त ५ फायदे
12
Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भटच्या माजी पर्सनल असिस्टंटला अटक; ७६ लाखांच्या फसवणुकीचा गंभीर आरोप
13
"मृणालची इमेज खराब होणार नाही अशी आशा", अजय देवगणसोबतचा डान्स पाहून केलं ट्रोल
14
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
15
लग्नाच्या पहिल्या रात्रीच पती नपुंसक असल्याचे समजले, तिने मोठ्या जावेला सांगितले, मग दीर आला...
16
Sanjay Gaikwad : आमदार संजय गायकवाडांचा राडा, आमदार निवास कँटिनमधील कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण
17
स्मृती ईराणींचा राजकारणातून अभिनयाकडे युटर्न, १७ वर्षांनंतरच्या कमबॅकवर म्हणाल्या- 'पार्ट टाइम अ‍ॅक्ट्रेस'
18
लग्नाच्या ३ वर्षांतच पायल रोहतगीचा होणार घटस्फोट? ७ वर्ष लहान कुस्तीपटूशी थाटलेला संसार
19
"माझ्यासाठीच नाही, तर १४० कोटी भारतीयांसाठीही..."; ब्राझीलचा सर्वोच्च सन्मान मिळाल्यावर काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
20
अरे देवा! ज्या सावत्र आईचा आशीर्वाद घ्यायचा, तिच्यासोबत पळाला अल्पवयीन मुलगा; केलं लग्न

बंधनकारक फेऱ्यांमुळे एसटी अडचणीत

By admin | Updated: December 4, 2014 23:07 IST

एसटीला येणारा खर्च भरून निघत नसतानाही जनतेच्या सेवेसाठी गडचिरोली आगाराच्यावतीने सुमारे २१९ बसफेऱ्या चालविल्या जात असून या बसफेऱ्यांमुळ प्रती किलोमीटर एसटीला २३ रूपयांचा

गडचिरोली आगार : प्रति किलोमीटर २३ रूपये व प्रतिदिवस अडीच लाखांचा तोटागडचिरोली : एसटीला येणारा खर्च भरून निघत नसतानाही जनतेच्या सेवेसाठी गडचिरोली आगाराच्यावतीने सुमारे २१९ बसफेऱ्या चालविल्या जात असून या बसफेऱ्यांमुळ प्रती किलोमीटर एसटीला २३ रूपयांचा तर दर दिवशी अडीच लाख रूपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. हीच परिस्थिती राज्याच्या इतर आगारांमध्ये असल्याचे दिसून येते. गाव तिथे एसटी ही बिद्रवाक्य घेऊन राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस ग्रामीण तसेच दुर्गम भागातील प्रवाशांची वाहतूक करतात. त्यामुळेच एसटीला राज्याची लोकवाहिणी म्हणून ओळखल्या जाते. नफ्यापेक्षाही लोकसेवेचा विचार पुढे करून रस्तयांवरील खाचखडगे पार करीत एसटी धावत असल्याने एसटी विषयी नागरिकांच्या मनात एक आपुलकीची भावना निर्माण झाली आहे. या सर्व कसरती करीत असताना एसटीला स्वत:ला मात्र तोट्याचा सामना करावा लागत आहे. गडचिरोली एसटी आगारसुध्दा यापासून अपवाद नाही. गडचिरोली आगारात एकूण ११० बसेस आहेत. या संपूर्ण बसेसच्या दिवसाच्या एकूण ५७६ बसफेऱ्या होतात. या बसफेऱ्यांमधून गडचिरोली आगाराला दिवसाकाटी ८.५ ते ९ लाख रूपयांचे उत्पन्न प्राप्त होते. मात्र एसटीचा प्रत्यक्ष खर्च मात्र यापेक्षाही जास्त असल्याने महिन्याच्या शेवटी हिशेब काढल्यानंतर एसटीला तोटा झाल्याचे लक्षात येते. एकूण बसफेऱ्यांपैकी सुमारे २१९ बसफेऱ्या बंधनकारक आहेत. यामध्ये १३७ बसफेऱ्या मानवविकास मिशनच्या बसगाड्यांच्या तर एसटीच्या स्वत:च्या बसेसच्या ८२ बसफेऱ्यांचा समावेश आहे. बंधनकारक बसफेऱ्यांमध्ये अपवाद वगळता नेहमीच तोटा सहन करावा लागतो. मात्र जनतेची सेवा करण्याच्या उद्देशाने या बसफेऱ्या चालविल्या जातात. या मार्गावर धावणाऱ्या बसेस बऱ्याचवेळा प्रवाशी घेऊन गेल्या तर आगारात येतेवेळी रिकाम्या येतात. आगारात येतेवेळी प्रवाशी घेऊन आल्या तर जातेवेळी रिकाम्या जातात. एसटीचा प्रतीकिमीचा खर्च सरासरी ३५ रूपये आहे. मात्र या मार्गावर बऱ्याचवेळा एसटी बिनाप्रवाशी धावत असल्याने सरासरी १२ रूपये प्रती किमी उत्पन्न प्राप्त होते. परिणामी एसटीला प्रती किमीमागे २३ रूपयांचे नुकसान सहन करावे लागते. गडचिरोली आगारातील मानव विकास मिशनच्या बसेस दर दिवशी ६ हजार किमी तर इतर बसेस ४ हजार ५०० किमी बंधनकारक मार्गांवर धावतात. एसटीचा पूर्ण खर्च भरून निघण्यासाठी ३५ रूपये किमीप्रमाणे या बसफेऱ्यांमधून दरदिवशी ३ लाख ६७ हजार ५०० रूपयांचे उत्पन्न प्राप्त होणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात मात्र १ लाख २६ हजार रूपयांचेच उत्पन्न प्राप्त होते. त्यामुळे दरदिवशी २ लाख ४१ हजार रूपयांचा तोटा एसटीला सहन करावा लागतो. बंधनकारक बसफेऱ्यांमुळे होणारा तोटा लक्षात घेऊन एसटीने व्यवहारीकतेचे धोरण अवलंबण्यास सुरूवात केली तर या सर्व बसफेऱ्या बंद कराव्या लागतील. मात्र या बंद झाल्यास ग्रामीण भागातील नागरिक व विद्यार्थ्यांची फार मोठी अडचण निर्माण होईल. त्यामुळे लोकप्रतिनिधींचा दबाव वाढतो. एसटी महामंडळ हे राज्य सरकारच्या अखत्यारित असलेले महामंडळ आहे. त्यामुळे व्यवहारिकता व लोकसेवा या दोघांचाही ताळमेळ एसटीला जोडावा लागतो. हे सर्व करीत असताना एसटी मात्र नेहमीच तोट्याचा सामना करीत आलेली आहे. (नगर प्रतिनिधी)