शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

बंधनकारक फेऱ्यांमुळे एसटी अडचणीत

By admin | Updated: December 4, 2014 23:07 IST

एसटीला येणारा खर्च भरून निघत नसतानाही जनतेच्या सेवेसाठी गडचिरोली आगाराच्यावतीने सुमारे २१९ बसफेऱ्या चालविल्या जात असून या बसफेऱ्यांमुळ प्रती किलोमीटर एसटीला २३ रूपयांचा

गडचिरोली आगार : प्रति किलोमीटर २३ रूपये व प्रतिदिवस अडीच लाखांचा तोटागडचिरोली : एसटीला येणारा खर्च भरून निघत नसतानाही जनतेच्या सेवेसाठी गडचिरोली आगाराच्यावतीने सुमारे २१९ बसफेऱ्या चालविल्या जात असून या बसफेऱ्यांमुळ प्रती किलोमीटर एसटीला २३ रूपयांचा तर दर दिवशी अडीच लाख रूपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. हीच परिस्थिती राज्याच्या इतर आगारांमध्ये असल्याचे दिसून येते. गाव तिथे एसटी ही बिद्रवाक्य घेऊन राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस ग्रामीण तसेच दुर्गम भागातील प्रवाशांची वाहतूक करतात. त्यामुळेच एसटीला राज्याची लोकवाहिणी म्हणून ओळखल्या जाते. नफ्यापेक्षाही लोकसेवेचा विचार पुढे करून रस्तयांवरील खाचखडगे पार करीत एसटी धावत असल्याने एसटी विषयी नागरिकांच्या मनात एक आपुलकीची भावना निर्माण झाली आहे. या सर्व कसरती करीत असताना एसटीला स्वत:ला मात्र तोट्याचा सामना करावा लागत आहे. गडचिरोली एसटी आगारसुध्दा यापासून अपवाद नाही. गडचिरोली आगारात एकूण ११० बसेस आहेत. या संपूर्ण बसेसच्या दिवसाच्या एकूण ५७६ बसफेऱ्या होतात. या बसफेऱ्यांमधून गडचिरोली आगाराला दिवसाकाटी ८.५ ते ९ लाख रूपयांचे उत्पन्न प्राप्त होते. मात्र एसटीचा प्रत्यक्ष खर्च मात्र यापेक्षाही जास्त असल्याने महिन्याच्या शेवटी हिशेब काढल्यानंतर एसटीला तोटा झाल्याचे लक्षात येते. एकूण बसफेऱ्यांपैकी सुमारे २१९ बसफेऱ्या बंधनकारक आहेत. यामध्ये १३७ बसफेऱ्या मानवविकास मिशनच्या बसगाड्यांच्या तर एसटीच्या स्वत:च्या बसेसच्या ८२ बसफेऱ्यांचा समावेश आहे. बंधनकारक बसफेऱ्यांमध्ये अपवाद वगळता नेहमीच तोटा सहन करावा लागतो. मात्र जनतेची सेवा करण्याच्या उद्देशाने या बसफेऱ्या चालविल्या जातात. या मार्गावर धावणाऱ्या बसेस बऱ्याचवेळा प्रवाशी घेऊन गेल्या तर आगारात येतेवेळी रिकाम्या येतात. आगारात येतेवेळी प्रवाशी घेऊन आल्या तर जातेवेळी रिकाम्या जातात. एसटीचा प्रतीकिमीचा खर्च सरासरी ३५ रूपये आहे. मात्र या मार्गावर बऱ्याचवेळा एसटी बिनाप्रवाशी धावत असल्याने सरासरी १२ रूपये प्रती किमी उत्पन्न प्राप्त होते. परिणामी एसटीला प्रती किमीमागे २३ रूपयांचे नुकसान सहन करावे लागते. गडचिरोली आगारातील मानव विकास मिशनच्या बसेस दर दिवशी ६ हजार किमी तर इतर बसेस ४ हजार ५०० किमी बंधनकारक मार्गांवर धावतात. एसटीचा पूर्ण खर्च भरून निघण्यासाठी ३५ रूपये किमीप्रमाणे या बसफेऱ्यांमधून दरदिवशी ३ लाख ६७ हजार ५०० रूपयांचे उत्पन्न प्राप्त होणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात मात्र १ लाख २६ हजार रूपयांचेच उत्पन्न प्राप्त होते. त्यामुळे दरदिवशी २ लाख ४१ हजार रूपयांचा तोटा एसटीला सहन करावा लागतो. बंधनकारक बसफेऱ्यांमुळे होणारा तोटा लक्षात घेऊन एसटीने व्यवहारीकतेचे धोरण अवलंबण्यास सुरूवात केली तर या सर्व बसफेऱ्या बंद कराव्या लागतील. मात्र या बंद झाल्यास ग्रामीण भागातील नागरिक व विद्यार्थ्यांची फार मोठी अडचण निर्माण होईल. त्यामुळे लोकप्रतिनिधींचा दबाव वाढतो. एसटी महामंडळ हे राज्य सरकारच्या अखत्यारित असलेले महामंडळ आहे. त्यामुळे व्यवहारिकता व लोकसेवा या दोघांचाही ताळमेळ एसटीला जोडावा लागतो. हे सर्व करीत असताना एसटी मात्र नेहमीच तोट्याचा सामना करीत आलेली आहे. (नगर प्रतिनिधी)