शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

एसटीचा विद्यार्थ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 23:45 IST

शाळकरी विद्यार्थ्यांना शाळा असलेल्या गावापर्यंत जाणे-येणे सोयीचे व्हावे, दरम्यान त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, या उदात्त हेतूने शासनाने मानव विकास मिशन अंतर्गत मोफत बससेवा सुरू केली.

ठळक मुद्देअडीच तास ताटकळत : राज्य परिवहन महामंडळाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : शाळकरी विद्यार्थ्यांना शाळा असलेल्या गावापर्यंत जाणे-येणे सोयीचे व्हावे, दरम्यान त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, या उदात्त हेतूने शासनाने मानव विकास मिशन अंतर्गत मोफत बससेवा सुरू केली. मात्र आरमोरीवरून सुटणारी बस तब्बल अडीच तास उशिरा आरमोरीच्या बसस्थानकावर आली, तेव्हापर्यंत विद्यार्थी बसस्थानक परिसरात बसची प्रतीक्षा करीत होते. सदर प्रकार २९ सप्टेंबर रोजी शुक्रवारी सायंकाळी ७.४५ वाजताच्या सुमारास उघडकीस आला.सदर प्रकारामुळे राज्य परिवहन महामंडळाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न यानिमित्त ऐरणीवर आला आहे. रवी, अरसोडा, मुल्लुरचक आदी गावातील विद्यार्थ्यांना आरमोरी तालुका मुख्यालयी शिक्षण घेता यावे, यासाठी मानव विकास मिशन अंतर्गत बससेवा सुरू करण्यात आली आहे. २९ सप्टेंबर रोजी शुक्रवारला सायंकाळी ५ वाजता शाळेची सुट्टी झाल्यानंतर ये-जा करणारे सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी आरमोरीच्या बसस्थानकावर आले. बसची प्रतीक्षा करू लागले, मात्र बस बसस्थानकावर आली नाही. त्यानंतर रात्री ७.४५ वाजतापर्यंत बस न पोहोचल्याने विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. याबाबतची माहिती काही नागरिकांनी शिक्षकांना दिली. तत्काळ शिक्षक बसस्थानकावर हजर झाले. त्यानंतर सामाजिक व भाजप कार्यकर्ते पंकज खरवडे व नंदू नाकतोडे बसस्थानकावर पोहोचले. त्यांनी गडचिरोलीच्या आगार प्रमुखांना संपर्क केला, मात्र फोन बंद होता. त्यानंतर खासगी बसची व्यवस्था करीत असताना महामंडळाची बस ७.५५ वाजता पोहोचली. यावेळी बसचालकाना विचारणा केली असता, गडचिरोलीवरून बस उशिरा सुटल्याने आरमोरीत बस पोहोचण्यास विलंब झाला, असे सांगितले. चुकीच्या व्यवस्थापनामुळे संबंधित अधिकाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी भाजयुमोचे अध्यक्ष पंकज खरवडे, नंदू नाकतोडे, शिक्षक मनोज मने, सतीश धाईत, हितकारिणी विद्यालयाचे मुख्याध्यापक शालिकराम राऊत, जितेंद्र ठाकरे, स्वप्नील धात्रक, सौरभ जक्कनवार, रोहित धकाते, युगल सामृतवार, गोलू वाघरे, संजय सोनटक्के आदींनी केली आहे. सदर प्रकाराबाबत विद्यार्थी व पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.बसस्थानकात पाणी, सुविधांचा अभावआरमोरी येथील बसस्थानकावर प्रवाशी तसेच विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. शुक्रवारी शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी या बसस्थानकावर बस पकडण्यासाठी आले. मात्र तब्बल अडीच तास बस बसस्थानकावर पोहोचली नाही. पाणी न पिता विद्यार्थ्यांना येथे ताटकळत राहावे लागले. विशेष म्हणजे यावेळी अर्धा किमी अंतरावरील हॉटेलमधून विद्यार्थ्यांसाठी पिण्याचे पाणी आणावे लागले. कोट्यवधी रूपये खर्च करून या बसस्थानक इमारतीत अनेक सुविधांचा अभाव आहे.