शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

एसटीचा विद्यार्थ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 23:45 IST

शाळकरी विद्यार्थ्यांना शाळा असलेल्या गावापर्यंत जाणे-येणे सोयीचे व्हावे, दरम्यान त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, या उदात्त हेतूने शासनाने मानव विकास मिशन अंतर्गत मोफत बससेवा सुरू केली.

ठळक मुद्देअडीच तास ताटकळत : राज्य परिवहन महामंडळाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : शाळकरी विद्यार्थ्यांना शाळा असलेल्या गावापर्यंत जाणे-येणे सोयीचे व्हावे, दरम्यान त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, या उदात्त हेतूने शासनाने मानव विकास मिशन अंतर्गत मोफत बससेवा सुरू केली. मात्र आरमोरीवरून सुटणारी बस तब्बल अडीच तास उशिरा आरमोरीच्या बसस्थानकावर आली, तेव्हापर्यंत विद्यार्थी बसस्थानक परिसरात बसची प्रतीक्षा करीत होते. सदर प्रकार २९ सप्टेंबर रोजी शुक्रवारी सायंकाळी ७.४५ वाजताच्या सुमारास उघडकीस आला.सदर प्रकारामुळे राज्य परिवहन महामंडळाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न यानिमित्त ऐरणीवर आला आहे. रवी, अरसोडा, मुल्लुरचक आदी गावातील विद्यार्थ्यांना आरमोरी तालुका मुख्यालयी शिक्षण घेता यावे, यासाठी मानव विकास मिशन अंतर्गत बससेवा सुरू करण्यात आली आहे. २९ सप्टेंबर रोजी शुक्रवारला सायंकाळी ५ वाजता शाळेची सुट्टी झाल्यानंतर ये-जा करणारे सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी आरमोरीच्या बसस्थानकावर आले. बसची प्रतीक्षा करू लागले, मात्र बस बसस्थानकावर आली नाही. त्यानंतर रात्री ७.४५ वाजतापर्यंत बस न पोहोचल्याने विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. याबाबतची माहिती काही नागरिकांनी शिक्षकांना दिली. तत्काळ शिक्षक बसस्थानकावर हजर झाले. त्यानंतर सामाजिक व भाजप कार्यकर्ते पंकज खरवडे व नंदू नाकतोडे बसस्थानकावर पोहोचले. त्यांनी गडचिरोलीच्या आगार प्रमुखांना संपर्क केला, मात्र फोन बंद होता. त्यानंतर खासगी बसची व्यवस्था करीत असताना महामंडळाची बस ७.५५ वाजता पोहोचली. यावेळी बसचालकाना विचारणा केली असता, गडचिरोलीवरून बस उशिरा सुटल्याने आरमोरीत बस पोहोचण्यास विलंब झाला, असे सांगितले. चुकीच्या व्यवस्थापनामुळे संबंधित अधिकाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी भाजयुमोचे अध्यक्ष पंकज खरवडे, नंदू नाकतोडे, शिक्षक मनोज मने, सतीश धाईत, हितकारिणी विद्यालयाचे मुख्याध्यापक शालिकराम राऊत, जितेंद्र ठाकरे, स्वप्नील धात्रक, सौरभ जक्कनवार, रोहित धकाते, युगल सामृतवार, गोलू वाघरे, संजय सोनटक्के आदींनी केली आहे. सदर प्रकाराबाबत विद्यार्थी व पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.बसस्थानकात पाणी, सुविधांचा अभावआरमोरी येथील बसस्थानकावर प्रवाशी तसेच विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. शुक्रवारी शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी या बसस्थानकावर बस पकडण्यासाठी आले. मात्र तब्बल अडीच तास बस बसस्थानकावर पोहोचली नाही. पाणी न पिता विद्यार्थ्यांना येथे ताटकळत राहावे लागले. विशेष म्हणजे यावेळी अर्धा किमी अंतरावरील हॉटेलमधून विद्यार्थ्यांसाठी पिण्याचे पाणी आणावे लागले. कोट्यवधी रूपये खर्च करून या बसस्थानक इमारतीत अनेक सुविधांचा अभाव आहे.