शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

एसटीने विद्यार्थ्यांना सोडले वाऱ्यावर

By admin | Updated: September 11, 2015 01:46 IST

आरमोरी तालुक्यातील मांगदा, अंगारासाख्या दुर्गम भागातून मानव विकास मिशनच्या बसने जवळपास ५० शाळकरी मुले-मुली शिक्षणासाठी आरमोरी येथे दररोज प्रवास करतात.

आरमोरीतील प्रकार : ठाणेदारांनी सुखरूप पोहोचविले गावीचुरमुरा : आरमोरी तालुक्यातील मांगदा, अंगारासाख्या दुर्गम भागातून मानव विकास मिशनच्या बसने जवळपास ५० शाळकरी मुले-मुली शिक्षणासाठी आरमोरी येथे दररोज प्रवास करतात. शाळेची सुटी झाल्यानंतर नेहमीप्रमाणे बुधवारला ३५ विद्यार्थी आरमोरीच्या बसस्थानकावर आले. मात्र मानव विकास मिशनची बसच आली नाही. अखेर अंधार पडल्यावर रात्री ९ वाजताच्या सुमारास आरमोरीचे ठाणेदार ढवळे यांनी पुढाकार घेऊन सर्वच ३५ विद्यार्थ्यांना दोन वाहनाने त्यांच्या गावी सुखरूप पोहोचविले.आरमोरी-वैरागड-अंगारा मार्गे मालेवाडा अशी बसफेरी मानव विकास मिशनच्या माध्यमातून परिवहन महामंडळाने विद्यार्थ्यांसाठी सुरू केली. मात्र बसच्या अनियमिततेचा फटका विद्यार्थ्यांना नेहमीच बसत असतो. वैरागड, मोहझरी, मांगदा, अंगारा व परिसरातील विद्यार्थी आरमोरी येथे शाळा, महाविद्यालय व कॉन्व्हेंटमध्ये शिक्षणासाठी दररोज ये-जा करतात. विद्यार्थ्यांच्या ये-जा करण्याची वेळ निश्चित करून महामंडळातर्फे बस सुरू करण्यात आली. नेहमीप्रमाणे बुधवारी विद्यार्थी याच बसने शिक्षणासाठी सकाळी आरमोरीला आले. सायंकाळी शाळेची सुटी झाल्यानंतर सर्वच विद्यार्थी आरमोरीच्या जुन्या बसस्थानकावर बसची प्रतीक्षा करीत होते. परंतु सायंकाळी ५.३० पासून रात्री ९ वाजेपर्यंत बस आली नाही. त्यामुळे सर्वच विद्यार्थी भयभित झाले. सदर बाब आरमोरी येथील विनोद निकुरे व काही युवकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी गडचिरोली आगारात दूरध्वनी केला. परंतु आगार प्रशासनाकडू समाधानकारक उत्तर मिळाले नाही. या युवकांनी सदर बाब पत्रकारांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर पत्रकारांनी आरमोरीचे ठाणेदार सुभाष ढवळे यांच्या निदर्शनास ही गंभीर बाब आणून दिली. त्यानंतर लगेच ठाणेदार ढवळे यांनी पोलीस ठाण्यातील वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांना बसस्थानकावर पाठवून माहिती घेतली. दोन पर्यायी वाहनांची व्यवस्था करून रात्री ९ वाजता सर्व मुलांना त्यांच्या गावी सुखरूप सोडून देण्यात आले. विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या चालक, वाहकावर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे. (वार्ताहर)