शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

एसटीने विद्यार्थ्यांना सोडले वाऱ्यावर

By admin | Updated: September 11, 2015 01:46 IST

आरमोरी तालुक्यातील मांगदा, अंगारासाख्या दुर्गम भागातून मानव विकास मिशनच्या बसने जवळपास ५० शाळकरी मुले-मुली शिक्षणासाठी आरमोरी येथे दररोज प्रवास करतात.

आरमोरीतील प्रकार : ठाणेदारांनी सुखरूप पोहोचविले गावीचुरमुरा : आरमोरी तालुक्यातील मांगदा, अंगारासाख्या दुर्गम भागातून मानव विकास मिशनच्या बसने जवळपास ५० शाळकरी मुले-मुली शिक्षणासाठी आरमोरी येथे दररोज प्रवास करतात. शाळेची सुटी झाल्यानंतर नेहमीप्रमाणे बुधवारला ३५ विद्यार्थी आरमोरीच्या बसस्थानकावर आले. मात्र मानव विकास मिशनची बसच आली नाही. अखेर अंधार पडल्यावर रात्री ९ वाजताच्या सुमारास आरमोरीचे ठाणेदार ढवळे यांनी पुढाकार घेऊन सर्वच ३५ विद्यार्थ्यांना दोन वाहनाने त्यांच्या गावी सुखरूप पोहोचविले.आरमोरी-वैरागड-अंगारा मार्गे मालेवाडा अशी बसफेरी मानव विकास मिशनच्या माध्यमातून परिवहन महामंडळाने विद्यार्थ्यांसाठी सुरू केली. मात्र बसच्या अनियमिततेचा फटका विद्यार्थ्यांना नेहमीच बसत असतो. वैरागड, मोहझरी, मांगदा, अंगारा व परिसरातील विद्यार्थी आरमोरी येथे शाळा, महाविद्यालय व कॉन्व्हेंटमध्ये शिक्षणासाठी दररोज ये-जा करतात. विद्यार्थ्यांच्या ये-जा करण्याची वेळ निश्चित करून महामंडळातर्फे बस सुरू करण्यात आली. नेहमीप्रमाणे बुधवारी विद्यार्थी याच बसने शिक्षणासाठी सकाळी आरमोरीला आले. सायंकाळी शाळेची सुटी झाल्यानंतर सर्वच विद्यार्थी आरमोरीच्या जुन्या बसस्थानकावर बसची प्रतीक्षा करीत होते. परंतु सायंकाळी ५.३० पासून रात्री ९ वाजेपर्यंत बस आली नाही. त्यामुळे सर्वच विद्यार्थी भयभित झाले. सदर बाब आरमोरी येथील विनोद निकुरे व काही युवकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी गडचिरोली आगारात दूरध्वनी केला. परंतु आगार प्रशासनाकडू समाधानकारक उत्तर मिळाले नाही. या युवकांनी सदर बाब पत्रकारांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर पत्रकारांनी आरमोरीचे ठाणेदार सुभाष ढवळे यांच्या निदर्शनास ही गंभीर बाब आणून दिली. त्यानंतर लगेच ठाणेदार ढवळे यांनी पोलीस ठाण्यातील वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांना बसस्थानकावर पाठवून माहिती घेतली. दोन पर्यायी वाहनांची व्यवस्था करून रात्री ९ वाजता सर्व मुलांना त्यांच्या गावी सुखरूप सोडून देण्यात आले. विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या चालक, वाहकावर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे. (वार्ताहर)