शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
2
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
3
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
4
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
5
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
6
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
7
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
8
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
9
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
10
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
11
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
12
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
13
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
14
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
15
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
16
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
17
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
18
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
19
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
20
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू

ग्रामज्योती योजना सर्वत्र पोहोचवा

By admin | Updated: July 15, 2015 01:51 IST

केंद्र शासनाच्या पंडित दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेंतर्गत ग्रामीण व दुर्गम भागात विद्युतची कामे घेण्यात आली आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक : अशोक नेते यांचे आवाहनगडचिरोली : केंद्र शासनाच्या पंडित दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेंतर्गत ग्रामीण व दुर्गम भागात विद्युतची कामे घेण्यात आली आहेत. महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जिल्हाभरात योग्य विद्युत सेवा निर्माण होण्यासाठी ग्रामज्योती योजना गावागावांत पोहोचवावी, असे आवाहन खा. अशोक नेते यांनी केले. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पंडित दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेच्या कामासंदर्भात घेण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी बैठकीला जिल्हाधिकारी रणजीतकुमार, महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता किशोर मेश्राम, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील वरघंटे, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता हिरवकर, उपअभियंता सारवे, उपअभियंता हनमारे, चापले, गिरीपुंजे आदी उपस्थित होते. यावेळी महावितरणचे अधीक्षक अभियंता यांनी सांगितले की, पंडित दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रासाठी २ हजार ५०० रूपये कोटींची तरतूद विद्युतच्या कामासाठी करण्यात आली आहे. यापैकी गडचिरोली जिल्ह्यासाठी विद्युत कामांकरिता ५३ कोटी रूपये शासनाने मंजुर केले आहेत. या निधीतून ३३ केव्हीचे विद्युत केद्र उभारणे, जिल्ह्यातील विद्युत जनित्रांची विद्युत क्षमता वाढविणे, दुर्गम भागात विद्युत सेवा पोहोचविणे आदी कामे केली जाणार असल्याची माहिती मेश्राम यांनी दिली. जिल्ह्यात उद्योगधंदे उभारण्यासाठी विजेचा दर कमी आकारण्यात यावा, असा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा, असे निर्देश खा. अशोक नेते यांनी दिले. कुरखेडातील पुराडा, अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा, मुलचेरा तालुक्यातील अडपल्ली येथे नव्याने प्रस्तावित करण्यात आलेले ३३ केव्ही उपकेंद्राला मंजुरी देऊन काम सुरू करण्यात यावे, चामोर्शी तालुक्यातील येनापूर येथील विद्युत उपकेंद्राचे अर्धवट काम तातडीने पूर्ण करावेत. मीटर रिडींगमध्ये बिघाड असलेल्या वीज ग्राहकांना सरासरी विद्युत बिल देण्याच्या सूचना खा. नेते यांनी दिल्या. यावेळी महावितरणचे अधिकारी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)निधी मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवामहाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत ग्रामज्योती योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्याला कमी निधी मंजुर करण्यात आला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील १२२ गावांमध्ये अद्यापही वीज पोहोचलेली नाही. जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र मोठे असल्याने किमान १०० ते १५० कोटींचा निधी मंजुर करण्याबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात यावा, अशा सूचना खा. नेते यांनी अधीक्षक अभियंत्यांना बैठकीत केल्या.