शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

वाहन अधिग्रहणाला गती

By admin | Updated: September 29, 2014 00:43 IST

१५ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनाने जोमात तयारी सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी तीनही मतदार संघात परिवहन महामंडळाच्या बसेस,

१३८ खासगी वाहने निवडणुकीसाठी लागणारगडचिरोली : १५ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनाने जोमात तयारी सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी तीनही मतदार संघात परिवहन महामंडळाच्या बसेस, काळी-पिवळी टॅक्सी, खासगी वाहने व शासकीय वाहने मिळून एकूण ३७२ वाहने लागणार आहेत. या वाहनांच्या अधिग्रहणाच्या कार्यवाहीला गती आली आहे.भारतीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषीत केल्याच्या दिनांकापासून सदर निवडणूक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे. विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी तसेच एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये याबाबतची सर्व खबरदारी प्रशासन घेत आहे. याकरीता जिल्हा निवडणूक विभागाने सुनियोजन केले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक विभागाला गडचिरोली व अहेरी या दोन्ही आगाराच्या मिळून एकूण ८६ बसेस लागणार आहेत. तसेच पोलीस विभागाला १०० बसेस लागणार आहे. प्रशासनाने निवडणुकीच्या कामासाठी गडचिरोली आगाराकडे ९० बसेसची तर अहेरी आगाराकडे ९६ बसेसची मागणी केल्याची माहिती आहे. याशिवाय निवडणूक विभागाला तिनही मतदार संघासाठी जीप व काळी-पिवळी टॅक्सी यासारखी १३८ वाहने लागणार आहेत. या उपरही ५८ शासकीय वाहने निवडणुकीच्या कामासाठी वापरण्यात येणार आहे. सदर वाहने अधिग्रहीत करण्यात आली आहे. यात विद्युत महामंडळ, वन व आरोग्य विभागाचे वगळून अन्य सर्व विभागाच्या शासकीय वाहनांचा समावेश आहे. पोलीस विभागासाठी मतदान केंद्रांवर जवान पोहोचविण्यासाठी एकूण २५० वाहने लागणार आहेत. यात जीप ५०, मिनीट्रक १०० व महामंडळाच्या १०० बसेसचा समावेश राहणार आहे. याशिवाय पोलीस विभागाकडून दोन हेलिकॉप्टरही वापरण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान गडचिरोली मतदार संघासाठी ३२९, अहेरीसाठी २८६ व आरमोरी मतदार संघासाठी २७८ अशा एकूण ८९३ इव्हीएम मशीन लागणार आहेत. कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी १९५ इव्हीएम मशीनचे नियोजन करण्यात आले आहे. अचानक एखाद्या इव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्यास तत्काळ संबंधीत मतदान केंद्रावर इव्हीएम मशीनची व्यवस्था व्हावी यासाठी जिल्हा प्रशासन प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस काही इव्हीएम मशीन राखीव ठेवते. या विधानसभा निवडणुकीसाठी गडचिरोली मतदार संघासाठी १७२, अहेरीसाठी १६८ व आरमोरी मतदार संघासाठी १६७ अशा एकूण ५०७ इव्हीएम मशीन राखीव ठेवण्यात आल्या आहेत. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रशासनाच्या वतीने मतदार जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.