शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्येही सरकारी बांधकामांना गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 05:00 IST

लॉकडाऊनमुळे काही दिवस कामे पूर्णपणे ठप्प होती. नंतर शारीरिक अंतराचा नियम पाळत कामे आटोपण्याच्या सूचना मिळाल्याने पुन्हा कामे सुरू झाली. पण यावर्षी सरकारी बांधकामांसाठी रेतीच उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक कामांना फटका बसला. काही कंत्राटदारांनी सिरोंचा परिसरातील रेती आणून काम भागविले. पावसाळ्यापूर्वी अनेक कामे पूर्ण करण्याचे नियोजन होते.

ठळक मुद्देरेतीसाठी कसरत : वनविभागाचाही अडथळा, दोन बेली ब्रिज पावसाळ्याआधी पूर्ण होणार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : उन्हाळ्यात वेगाने होणाऱ्या रस्ते, पूल आदी कामांमध्ये यावर्षी कोरोनामुळे सुरू असलेल्या सततच्या लॉकडाऊनमुळे मोठा अडथळा निर्माण झाला आहे. पण तरीही या कामांना गती देण्याचा प्रयत्न केला जात आहे. पावसाला सुरूवात होण्यापूर्वी शक्य तेवढी कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या गडचिरोली कार्यालयामार्फत केला जात आहे.लॉकडाऊनमुळे काही दिवस कामे पूर्णपणे ठप्प होती. नंतर शारीरिक अंतराचा नियम पाळत कामे आटोपण्याच्या सूचना मिळाल्याने पुन्हा कामे सुरू झाली. पण यावर्षी सरकारी बांधकामांसाठी रेतीच उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक कामांना फटका बसला. काही कंत्राटदारांनी सिरोंचा परिसरातील रेती आणून काम भागविले. पावसाळ्यापूर्वी अनेक कामे पूर्ण करण्याचे नियोजन होते. ती सर्व कामे पूर्ण होणे आता शक्य नसली तरी बहुतांश कामांनी सध्या वेग घेतला आहे.सध्या सा.बां.विभाग क्र.२ अंतर्गत धानोरा तालुक्यात ६ कामे, गडचिरोली तालुक्यात ३ आणि चामोर्शी ५ कामे, विशेष प्रकल्प विभाग सिरोंचा अंतर्गत सिरोचा येथे ३ कामे, सा.बां.विभाग क्र.१ अंतर्गत गडचिरोलीत १४ कामे, आरमोरी येथे ७, वडसा ६, कुरखेडा ५, कोरची ५, तसेच सा.बां.विभाग आलापल्ली अंतर्गत अहेरी येथे २१ तर एटापल्ली येथे ६ कामे सुरू आहेत. या ८१ कामांवर एकूण ७०२ मजूर कार्यरत असल्याचे अधीक्षक अभियंता राजीव गायकवाड यांनी सांगितले. काही कामे अंतिम टप्प्यात असून ती पूर्णत्वाकडे जात आहेत.नक्षलवाद्यांचा अडथळाजिल्ह्यात मंजूर असलेल्या ७ बेली ब्रिजपैकी ५ पुलांचे काम सुरू झाले होते. हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन होते. मात्र काही दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांनी तिथे पत्रके टाकून कामात अडथळा आणला. त्यामुळे काही दिवस काम बंद होते. तरीही पावसाला सुरूवात होण्यापूर्वी दोन बेली ब्रिजची कामे पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.वनविभागाचे नियमांवर बोटमंजूर असलेली अनेक रस्ते व पुलांची कामे वनविभागाच्या अडथळ्यामुळेही अडली आहेत. नियमांवर बोट ठेवत वनविभागाकडून ती कामे थांबविली जात आहेत. विशेष म्हणजे एक नियम पूर्ण केला की पुन्हा दुसरा काही नियम पुढे केला जात असल्यामुळे ही कामे वेळेत पूर्ण कशी करणार? असा प्रश्न बांधकाम विभागाच्या यंत्रणेसमोर निर्माण झाला आहे. विकासात्मक कामांसाठी नियमात शिथिलता देऊन कामे पूर्ण करण्यासाठी वनविभागाने सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा, अशी अपेक्षा नागरिक करत आहेत.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभाग