शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
2
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
3
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
4
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
5
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
6
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
7
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
8
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
9
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
10
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
11
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
12
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
13
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
14
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
15
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
16
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
17
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
18
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
19
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
20
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा

विकास कामे करण्यास गती द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 22:51 IST

पावसाळा संपला असल्याने आता विकासकामे करण्यास गती द्या. प्रत्येक विभागाला ठरवून दिलेले उद्दिष्ट मार्च अखेर पूर्ण करण्यासाठी प्रत्येक कर्मचारी, अधिकारी व विभाग प्रमुखांनी प्रयत्न करावे, ....

ठळक मुद्देदेवराव होळी यांचे निर्देश : गडचिरोली तालुक्याची आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पावसाळा संपला असल्याने आता विकासकामे करण्यास गती द्या. प्रत्येक विभागाला ठरवून दिलेले उद्दिष्ट मार्च अखेर पूर्ण करण्यासाठी प्रत्येक कर्मचारी, अधिकारी व विभाग प्रमुखांनी प्रयत्न करावे, असे निर्देश आमदार डॉ. देवराव होळी यांनी केले.गडचिरोली येथील जिल्हा परिषद हायस्कूल येथे सोमवारी गडचिरोली पंचायत समितीच्या वार्षिक आमसभेची आढावा बैठक सोमवारी आयोजित करण्यात आली. या बैठकीदरम्यान आमदार डॉ. देवराव होळी यांनी निर्देश दिले. सदर बैठकीला पंचायत समिती सभापती दुर्लभा बांबोळे, उपसभापती विलास दशमुखे, जिल्हा परिषद सदस्य निता साखरे, संवर्ग विकास अधिकारी पचारे, पं.स. सदस्य गोहणे, चिंचोळकर, गडचिरोलीचे नायब तहसीलदार आदी उपस्थित होते. आढावा बैठकीत आमदारांनी सर्व विभागांचा आढावा घेतला.रोलेक्स कंपनीचे मीटरमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे सदर मीटर कंपनीकडे परत करावे. गडचिरोली तालुक्याला ३ हजार ६२ शौचालये बांधण्याचे उद्दिष्ट दिले आहे. मार्च महिन्यापूर्वी सर्व शौचालयांचे बांधकाम करण्याचे निर्देश दिले. काही पाणी पुरवठा योजना बंद असून या योजना सुरू करण्याचे निर्देशही दिले आहे.ग्रामसेवकाला इतरांचे सहकार्य गरजेचेशौचालयाचे बांधकाम करवून घेऊन त्यांचा वापर नागरिकांनी करावा, यासाठी जनजागृती करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणा व इतरही विभागांची आहे. मात्र हे काम केवळ ग्रामसेवकावर लादून इतर यंत्रणा मोकळ्या झाल्या आहेत. हागणदारीमुक्तीमध्ये संबंधित नागरिकाला शौचालय बांधण्याच्या कामासाठी प्रवृत्त करणे एवढेच काम ग्रामसेवकाचे आहे. मात्र शौचालयाचे बांधकाम झाले नाही, निधी रखडला किंवा शौचालय बांधूनही हागणदारीमुक्त गाव झाले नाही तर संबंधित ग्रामसेवकालाच जबाबदार धरले जाते. ही चुकीचे असून इतरही यंत्रणांना त्यांच्या कामाची जाणीव करून द्यावी, अशी मागणी आ. डॉ. देवराव होळी यांच्याकडे ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष कविश्वर बनपुरकर यांनी आढावा बैठकीदरम्यान केली.जलयुक्त शिवार अभियान कामाचा लागणार फलकसिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी राज्य शासनाने कोट्यवधी जलयुक्त शिवार अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत ग्रामीण भागात कोट्यवधी रूपयांची कामे केली जात आहेत. प्रत्येक गावात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत किती कामे झाली. त्यासाठी किती निधी खर्च झाला. याबाबतचे फलक गावाच्या दर्शनी भागावर लावून सदर फलकाचे पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच किंवा गावातील प्रतिष्ठीत नागरिक यांच्या मार्फत लोकार्पण करण्याचे निर्देश दिले.