शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
2
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
3
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
4
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
5
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
6
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
7
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
8
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
9
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
10
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
11
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
12
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
13
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
14
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
15
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
16
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
17
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
18
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
19
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
20
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या

विकास कामे करण्यास गती द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 22:51 IST

पावसाळा संपला असल्याने आता विकासकामे करण्यास गती द्या. प्रत्येक विभागाला ठरवून दिलेले उद्दिष्ट मार्च अखेर पूर्ण करण्यासाठी प्रत्येक कर्मचारी, अधिकारी व विभाग प्रमुखांनी प्रयत्न करावे, ....

ठळक मुद्देदेवराव होळी यांचे निर्देश : गडचिरोली तालुक्याची आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पावसाळा संपला असल्याने आता विकासकामे करण्यास गती द्या. प्रत्येक विभागाला ठरवून दिलेले उद्दिष्ट मार्च अखेर पूर्ण करण्यासाठी प्रत्येक कर्मचारी, अधिकारी व विभाग प्रमुखांनी प्रयत्न करावे, असे निर्देश आमदार डॉ. देवराव होळी यांनी केले.गडचिरोली येथील जिल्हा परिषद हायस्कूल येथे सोमवारी गडचिरोली पंचायत समितीच्या वार्षिक आमसभेची आढावा बैठक सोमवारी आयोजित करण्यात आली. या बैठकीदरम्यान आमदार डॉ. देवराव होळी यांनी निर्देश दिले. सदर बैठकीला पंचायत समिती सभापती दुर्लभा बांबोळे, उपसभापती विलास दशमुखे, जिल्हा परिषद सदस्य निता साखरे, संवर्ग विकास अधिकारी पचारे, पं.स. सदस्य गोहणे, चिंचोळकर, गडचिरोलीचे नायब तहसीलदार आदी उपस्थित होते. आढावा बैठकीत आमदारांनी सर्व विभागांचा आढावा घेतला.रोलेक्स कंपनीचे मीटरमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे सदर मीटर कंपनीकडे परत करावे. गडचिरोली तालुक्याला ३ हजार ६२ शौचालये बांधण्याचे उद्दिष्ट दिले आहे. मार्च महिन्यापूर्वी सर्व शौचालयांचे बांधकाम करण्याचे निर्देश दिले. काही पाणी पुरवठा योजना बंद असून या योजना सुरू करण्याचे निर्देशही दिले आहे.ग्रामसेवकाला इतरांचे सहकार्य गरजेचेशौचालयाचे बांधकाम करवून घेऊन त्यांचा वापर नागरिकांनी करावा, यासाठी जनजागृती करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणा व इतरही विभागांची आहे. मात्र हे काम केवळ ग्रामसेवकावर लादून इतर यंत्रणा मोकळ्या झाल्या आहेत. हागणदारीमुक्तीमध्ये संबंधित नागरिकाला शौचालय बांधण्याच्या कामासाठी प्रवृत्त करणे एवढेच काम ग्रामसेवकाचे आहे. मात्र शौचालयाचे बांधकाम झाले नाही, निधी रखडला किंवा शौचालय बांधूनही हागणदारीमुक्त गाव झाले नाही तर संबंधित ग्रामसेवकालाच जबाबदार धरले जाते. ही चुकीचे असून इतरही यंत्रणांना त्यांच्या कामाची जाणीव करून द्यावी, अशी मागणी आ. डॉ. देवराव होळी यांच्याकडे ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष कविश्वर बनपुरकर यांनी आढावा बैठकीदरम्यान केली.जलयुक्त शिवार अभियान कामाचा लागणार फलकसिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी राज्य शासनाने कोट्यवधी जलयुक्त शिवार अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत ग्रामीण भागात कोट्यवधी रूपयांची कामे केली जात आहेत. प्रत्येक गावात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत किती कामे झाली. त्यासाठी किती निधी खर्च झाला. याबाबतचे फलक गावाच्या दर्शनी भागावर लावून सदर फलकाचे पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच किंवा गावातील प्रतिष्ठीत नागरिक यांच्या मार्फत लोकार्पण करण्याचे निर्देश दिले.