शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
3
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
4
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
5
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
6
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
7
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
8
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
9
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
10
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
11
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
12
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
13
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
15
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
16
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
17
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
18
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
19
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
20
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'

धानाेरातील आयटीआयची प्रशस्त इमारत अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:32 IST

घनश्याम मशाखेत्री धानाेरा : सुमारे दीड काेटी रूपये खर्चून धानाेरा येथे प्रशस्त इमारत बांधण्यात आली आहे. १३ ऑगस्ट २०१९ ...

घनश्याम मशाखेत्री

धानाेरा : सुमारे दीड काेटी रूपये खर्चून धानाेरा येथे प्रशस्त इमारत बांधण्यात आली आहे. १३ ऑगस्ट २०१९ राेजी बांडिया नदीच्या पुराचे पाणी या इमारतीत पावसाचे पाणी शिरले हाेते. त्यामुळे इमारतीमधील वीज उपकरणांचे नुकसान झाले. तेव्हापासून या ठिकाणचा वीजपुरवठा बंद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

युवकांना व्यवसायाचे प्रशिक्षण देता यावे यासाठी प्रत्येक तालुक्यात आयटीआयची निर्मिती करण्यात आली आहे. सुरुवातीच्या कालावधीत येथील आयटीआय भाड्याच्या खाेलीत भरविली जात हाेती. कालांतराने गडचिराेली मार्गावर राधेश्यामबाबा मंदिराजवळ सर्व सुविधांनीयुक्त प्रशस्त इमारत बांधण्यात आली. सन २०११ पासून या ठिकाणी प्रत्यक्ष प्रशिक्षणाला सुरुवात झाली. इलेक्ट्राॅनिक्स, पेंटर, प्लंबर, डिझेल मेकॅनिक, कटिंग, ड्रेस मेकिंग हे सहा ट्रेड शिकविले जातात. वसतिगृहात २५ प्रशिक्षणार्थ्यांच्या राहण्याची साेय आहे. सर्व सुरळीत सुरू असताना १३ ऑगस्ट २०१९ रोजी बांडिया नदीच्या पुराचे पाणी शेतात शिरले. या पाण्यामुळे आयटीआयचा रस्ता, बाहेर उभे असलेले प्रशिक्षणाचे वाहन, सुरक्षाभिंत, स्ट्रीट लाइटचे खांब, शासकीय दस्ताऐवज व इलेक्ट्रॉनिक उपकरणे तसेच विद्युतचे फिटिंग पूर्ण जळाली. वीजमीटर बोर्ड खराब झाले. तेव्हापासून येथील वीज आजतागायत दीड वर्ष लोटूनही बंद आहे. कोरोना काळात प्रशिक्षण बंद होते १ जानेवारीपासून प्रशिक्षण सुरू झाले आहे.परंतु लाइट नसल्याने वर्कशॉपमधील बंद आहेत. त्यांच्या कृतीयुक्त शिक्षणाला आळा बसत आहे. वर्गात शिकवताना विद्यार्थी व शिक्षकांना त्रास होत आहे. वीजपुरवठा तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी हाेत आहे.

बाॅक्स

उन्हाळ्यात प्रशिक्षण घेणे हाेणार कठीण

आयटीआयचे प्रशिक्षण उन्हाळ्यातही सुरू राहते. मात्र वीजपुरवठा बंद असल्याने या ठिकाणी राहणे कठीण हाेणार आहे. तसेच वसतिगृहातही लाइट नसल्याने विद्यार्थ्यांना तेथे राहता येत नाही. त्यामुळे त्यांना धानोरा येथे भाड्याची खाेली करून राहावे लागत असल्याने त्यांना आर्थिक फटका बसत आहे.

काेट

आयटीआयमधील विद्युत दुरुस्तीचे अंदाजपत्रक तयार करून डीपीसीकडे मंजुरीसाठी पाठविले आहे, ते मंजूर होताच निविदा काढून दुरुस्तीचे काम केले जाईल.

-एल. सी. हेरोडे, अभियंता (इले.) बांधकाम विभाग, गडचिरोली

काेट

याबाबत बांधकाम विभाग गडचिरोली यांच्याकडे अनेकदा पाठपुरावा करण्यात आला आहे, परंतु अजूनही विद्युत दुरुस्तीचे काम करण्यात आले नाही. यामुळे प्रशिक्षण घेणाऱ्यांना व शिक्षकांना त्रास होत आहे.

- एस. एस चौधरी, प्रिन्सिपल आयटीआय, धानोरा