शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
7
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
8
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
9
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
10
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
11
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
12
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
13
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
14
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
15
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
16
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
19
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
20
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?

ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडवा

By admin | Updated: May 29, 2016 01:42 IST

ज्येष्ठ नागरिकांच्या अनेक समस्या आहेत. सदर समस्यांसह शेतकऱ्यांच्याही समस्या मार्गी लावाव्या,

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : मुख्यमंत्र्यांकडे मागणी; शेतकऱ्यांच्या समस्यांवर लक्ष वेधलेगडचिरोली : ज्येष्ठ नागरिकांच्या अनेक समस्या आहेत. सदर समस्यांसह शेतकऱ्यांच्याही समस्या मार्गी लावाव्या, अशी मागणी ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांनी दिलेल्या निवेदनात, ज्येष्ठांचे वय ६५ ऐवजी ६० वर्ष करण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. १ एप्रिल २०१६ पासून अंमलबजावणी करण्याची मागणी केली. परंतु अंमलबजावणी अद्यापही झाली नाही. सदर अंमलबजावणी करावी, एस. टी. महामंडळाची २ हजार ८०० कोटी रूपयांची थकबाकी महामंडळाला अदा करावी, ६० वर्षावरील अल्प, अत्यल्प भूधारक शेतकरी, शेतमजूर व कामगारांना १ हजार ५०० रूपये मासिक पेंशनही मंजूर करावी, ज्येष्ठ नागरिकांना, आर्थिक दुर्बल व्यक्तींना शासकीय रूग्णालयातून, मेडिकल स्टोअर्समधून अत्यल्प दराने जेनेरिक औषधांचा पुरवठा करावा, अधिकाधिक जेनेरिक मेडिकल स्टोअर्स उघडण्यास मंजुरी द्यावी, बँक व पोस्ट आॅफिसमध्ये ज्येष्ठांसाठी स्वतंत्र खिडकी असावी, दारिद्र्य रेषेची मर्यादा २१ हजारावरून ४० हजार करावी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या, राजीव गांधी आरोग्यदायी योजना उत्पन्नाची अट न ठेवता सर्वांना लागू करावी, ज्येष्ठ नागरिकांसाठी जिल्हा व तालुकास्तरावर समाजभवन व विरंगुळा केंद्रासाठी निधीची तरतूद करावी, ज्येष्ठ नागरिक भवनासाठी न. प. व ग्रा. पं. ने मोकळी जागा उपलब्ध करावी, ओबीसींचे आरक्षण पूर्ववत २७ टक्के करावे. ज्या गावात ओबीसी ५१ टक्केपेक्षा जास्त आहेत अशा गावातील पेसा रद्द करावा, स्वतंत्र विदर्भाची निर्मिती करावी, शेतकऱ्यांना विनामूल्य सिंचनाची सोय करावी आदी मागण्यांचा समावेश होता. निवेदन देताना संस्थाध्यक्ष दत्तात्रेय बर्लावार, पांडुरंग घोटेकर, देवाजी सोनटक्के, बापुजी होकम, ब्राह्मणवाडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)