शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

सिरोंचाच्या खंडीत वीज पुरवठ्यावर निघणार तोडगा

By admin | Updated: October 6, 2015 01:57 IST

आलापल्लीवरून सिरोंचाचा वीज पुरवठा हा संपूर्ण जंगलातून होतो. पावसाळ्यात तसेच इतर काळातही लहानसहान

गडचिरोली : आलापल्लीवरून सिरोंचाचा वीज पुरवठा हा संपूर्ण जंगलातून होतो. पावसाळ्यात तसेच इतर काळातही लहानसहान कारणाने हा वीज पुरवठा खंडीत होत असतो. अनेकदा वीज तारा जंगलात तुटल्याने अडचण येऊन पाच-पाच दिवस वीज पुरवठा सुरू होत नाही. या अडचणीवर आता तोडगा निघणार आहे. अहेरी तालुक्याच्या जिमलगट्टा येथे नवे ३३ केव्ही वीज उपकेंद्र निर्माण केले जाणार आहे. त्यामुळे आलापल्ली ते सिरोंचा जाणारा वीज प्रवाहाच्या विद्युत वाहिनीला आता जिमलगट्टा येथे ब्रेक मिळून सिरोंचाला येथून वीज पुरवठा होईल. जिमलगट्टासह पुराडा व अडपल्ली येथेही नवे ३३ केव्हीचे तीन उपकेंद्र निर्माण होणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ३३ केव्हीचे तीन उपकेंद्र कुरखेडा तालुक्याच्या पुराडा, मुलचेरा तालुक्याच्या अडपल्ली तर अहेरी तालुक्याच्या जिमलगट्टा येथे पूर्ण करण्यात येणार आहे. आलापल्ली-सिरोंचा या मार्गावरून जंगलातून वीज तारा जातात. अनेकदा या तारा लोंबकळल्यामुळे येथील वीज पुरवठा बंद पडून जातो. पावसाळ्यात या घटना वारंवार घडतात व हा वीज पुरवठा बंद झाल्याने या भागात चार ते पाच दिवस तो खंडीतच राहतो. याबाबत सातत्याने तक्रारी होत्या. त्यानंतर आता या मार्गावर जिमलगट्टा येथे वीज उपकेंद्र होऊ घातल्या आहेत. तसेच कुरखेडा, कोरची या भागासाठी पुराडा येथे वीज उपकेंद्र दिले जाणार आहे. कोरची तालुक्याला वीज पुरवठा करण्यासाठी याची मदत होणार आहे. तर मुलचेरा तालुक्यातील अडपल्ली या दुर्गम गावामध्ये वीज उपकेंद्र निर्माण झाल्यास त्याचा फायदा एटापल्ली, मुलचेरा या दोन्ही तालुक्यांना होईल. या उपकेंद्रासाठी ४ कोटी ४४ लाख रूपयांची निधीची तरतूद करण्यात आली आहे. उपकेंद्र रोहित्र क्षमता वाढीचे दोन काम ९० लाख रूपये निधीतून केले जाणार असून ४९.७७ किमीची ११ केव्ही उच्चदाब वाहिनी निर्माण करण्यात येणार आहे. यासाठी ७ कोटी ७३ लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.६२.२० किमी लांबीच्या लघुदाब वाहिनीसाठी १ कोटी रूपयांच्या निधीची तरतूद करण्यात येणार आहे. वाहिन्यांचे विलगीकरणाचे सात कामे असून घरगुती वीज जोडणीचे २६ हजार ११३ कामे जिल्ह्यात प्रस्तावित करण्यात आले.दुसऱ्या टप्प्यात ७ कोटी ७९ लाखांची पाच विद्युत उपकेंद्र निर्माण करण्यात येणार आहे. ३३५ किमीची ११ केव्ही उच्चदाब वाहिनी ३३ कोटी ४४ लाख रूपये खर्च करून उभारण्यात येणार आहे. दोन्ही टप्प्यामध्ये १६६ विद्युत वितरण रोहित्र ४ कोटी २४ लाख रूपये खर्च करून बसविण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात ११० किमी लघुदाब वाहिनी निर्माण करण्यात येणार आहे. या सर्व कामांमुळे जिल्ह्यातील वीज नसलेल्या जवळजवळ १२२ गावांनाही वीज पुरवठा सुरू होण्याची शक्यता आहे. शासनाने दिनानाथ उपाध्याय ग्रामज्योती योजना लागू केली असल्यामुळे निधीची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर होईल, असे दिसून येत आहे. या संदर्भात खासदार अशोक नेते यांनी नुकताच आढावा घेतला. त्यामुळे या कामाला गती दिली जाणार आहे. या कामासाठी निधीचीही तरतूद झाली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)