शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
2
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
3
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
4
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
7
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
8
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
9
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
10
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
11
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
12
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
13
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
14
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
15
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
16
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
17
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
18
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
19
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
20
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल

सिरोंचाच्या खंडीत वीज पुरवठ्यावर निघणार तोडगा

By admin | Updated: October 6, 2015 01:57 IST

आलापल्लीवरून सिरोंचाचा वीज पुरवठा हा संपूर्ण जंगलातून होतो. पावसाळ्यात तसेच इतर काळातही लहानसहान

गडचिरोली : आलापल्लीवरून सिरोंचाचा वीज पुरवठा हा संपूर्ण जंगलातून होतो. पावसाळ्यात तसेच इतर काळातही लहानसहान कारणाने हा वीज पुरवठा खंडीत होत असतो. अनेकदा वीज तारा जंगलात तुटल्याने अडचण येऊन पाच-पाच दिवस वीज पुरवठा सुरू होत नाही. या अडचणीवर आता तोडगा निघणार आहे. अहेरी तालुक्याच्या जिमलगट्टा येथे नवे ३३ केव्ही वीज उपकेंद्र निर्माण केले जाणार आहे. त्यामुळे आलापल्ली ते सिरोंचा जाणारा वीज प्रवाहाच्या विद्युत वाहिनीला आता जिमलगट्टा येथे ब्रेक मिळून सिरोंचाला येथून वीज पुरवठा होईल. जिमलगट्टासह पुराडा व अडपल्ली येथेही नवे ३३ केव्हीचे तीन उपकेंद्र निर्माण होणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ३३ केव्हीचे तीन उपकेंद्र कुरखेडा तालुक्याच्या पुराडा, मुलचेरा तालुक्याच्या अडपल्ली तर अहेरी तालुक्याच्या जिमलगट्टा येथे पूर्ण करण्यात येणार आहे. आलापल्ली-सिरोंचा या मार्गावरून जंगलातून वीज तारा जातात. अनेकदा या तारा लोंबकळल्यामुळे येथील वीज पुरवठा बंद पडून जातो. पावसाळ्यात या घटना वारंवार घडतात व हा वीज पुरवठा बंद झाल्याने या भागात चार ते पाच दिवस तो खंडीतच राहतो. याबाबत सातत्याने तक्रारी होत्या. त्यानंतर आता या मार्गावर जिमलगट्टा येथे वीज उपकेंद्र होऊ घातल्या आहेत. तसेच कुरखेडा, कोरची या भागासाठी पुराडा येथे वीज उपकेंद्र दिले जाणार आहे. कोरची तालुक्याला वीज पुरवठा करण्यासाठी याची मदत होणार आहे. तर मुलचेरा तालुक्यातील अडपल्ली या दुर्गम गावामध्ये वीज उपकेंद्र निर्माण झाल्यास त्याचा फायदा एटापल्ली, मुलचेरा या दोन्ही तालुक्यांना होईल. या उपकेंद्रासाठी ४ कोटी ४४ लाख रूपयांची निधीची तरतूद करण्यात आली आहे. उपकेंद्र रोहित्र क्षमता वाढीचे दोन काम ९० लाख रूपये निधीतून केले जाणार असून ४९.७७ किमीची ११ केव्ही उच्चदाब वाहिनी निर्माण करण्यात येणार आहे. यासाठी ७ कोटी ७३ लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.६२.२० किमी लांबीच्या लघुदाब वाहिनीसाठी १ कोटी रूपयांच्या निधीची तरतूद करण्यात येणार आहे. वाहिन्यांचे विलगीकरणाचे सात कामे असून घरगुती वीज जोडणीचे २६ हजार ११३ कामे जिल्ह्यात प्रस्तावित करण्यात आले.दुसऱ्या टप्प्यात ७ कोटी ७९ लाखांची पाच विद्युत उपकेंद्र निर्माण करण्यात येणार आहे. ३३५ किमीची ११ केव्ही उच्चदाब वाहिनी ३३ कोटी ४४ लाख रूपये खर्च करून उभारण्यात येणार आहे. दोन्ही टप्प्यामध्ये १६६ विद्युत वितरण रोहित्र ४ कोटी २४ लाख रूपये खर्च करून बसविण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात ११० किमी लघुदाब वाहिनी निर्माण करण्यात येणार आहे. या सर्व कामांमुळे जिल्ह्यातील वीज नसलेल्या जवळजवळ १२२ गावांनाही वीज पुरवठा सुरू होण्याची शक्यता आहे. शासनाने दिनानाथ उपाध्याय ग्रामज्योती योजना लागू केली असल्यामुळे निधीची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर होईल, असे दिसून येत आहे. या संदर्भात खासदार अशोक नेते यांनी नुकताच आढावा घेतला. त्यामुळे या कामाला गती दिली जाणार आहे. या कामासाठी निधीचीही तरतूद झाली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)