शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

सौरऊर्जेवरील योजनेने पाणीटंचाईतून मुक्तता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 23:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : भामरागड नगर पंचायतीच्या हद्दीत बेजूर वस्ती आहे. या वस्तीपर्यंत तत्कालीन भामरागड ग्रामपंचायतीची नळ योजना पोहोचली नव्हती. शिवाय बेजूर भागात सार्वजनिक विहिरी व हातपंपाची संख्या अत्यल्प आहे. तसेच दरवर्षीच्या उन्हाळ्यात या भागात पाण्याची पातळी खालावत असल्याने पाणीटंचाईची भीषण समस्या निर्माण होत होती. या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन ...

ठळक मुद्देबेजुरवासीयांना दिलासा : नगर पंचायतीतर्फे दुहेरी पंप नळ योजना कार्यान्वित

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : भामरागड नगर पंचायतीच्या हद्दीत बेजूर वस्ती आहे. या वस्तीपर्यंत तत्कालीन भामरागड ग्रामपंचायतीची नळ योजना पोहोचली नव्हती. शिवाय बेजूर भागात सार्वजनिक विहिरी व हातपंपाची संख्या अत्यल्प आहे. तसेच दरवर्षीच्या उन्हाळ्यात या भागात पाण्याची पातळी खालावत असल्याने पाणीटंचाईची भीषण समस्या निर्माण होत होती. या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन भामरागड नगर पंचायत प्रशासनाने बेजूर भागात सौरऊर्जेवर आधारित दुहेरी पंप नळ योजना कार्यान्वित केली. त्यामुळे आता येथील नळांना दिवसभर पाणी येत आहे. परिणामी बेजूर भागातील नागरिकांची पाणीटंचाईतून मुक्तता झाली आहे.गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा परिषद प्रशासनामार्फत सन २०१०-११ पासून अनेक दुर्गम व लहान गावांमध्ये पाणी सुविधेसाठी सौरऊर्जेवर चालणारी दुहेरी पंप नळ योजना कार्यान्वित करण्यात सुरुवात झाली. मोठ्या नळ योजनेच्या तुलनेत सदर दुहेरी पंप योजना कार्यान्वित करण्यास अत्यल्प खर्च येतो. तसेच देखभालीचा खर्चही अत्यल्प असतो. वीज बिलाचा प्रश्न उद्भवत नाही. त्यामुळे दुर्गम व छोट्या गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या गावांमधून अशा प्रकारच्या सौरऊर्जेवरील दुहेरी पंप नळ योजना कार्यान्वित करणे अत्यंत सोयीचे ठरते. भामरागड नगर पंचायतीचे नगराध्यक्ष राजू वड्डे व बांधकाम सभापतीच्या पुढाकाराने बेजूर भागात सौरऊर्जेवरील दुहेरी पंप नळ योजना कार्यान्वित करण्यात आली. नगर पंचायतीच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातर्फे राष्टÑीय पेयजल कार्यक्रमाअंतर्गत बेजूर भागात सौरऊर्जेवर चालणारी ही नळ पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली असून आता या भागातील महिलांना नळाचे पाणी दिवसभर उपलब्ध होत आहे. परिणामी उन्हाळ्यात जाणवणारी हातपंपावरील गर्दीचे दृश्य आता दिसणार नाही.नेलगुंडा, बोटनफुंडीतही पाणी सुविधा४भामरागड पंचायत समितीअंतर्गत नेलगुंडा, बोटनफुंडी या लहान गावांमध्ये सौरऊर्जेवर चालणारी दुहेरी पंप नळ योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला असतानाही या योजनेच्या माध्यमातून ग्रामस्थांना पाणी उपलब्ध होत आहे. इतर ग्रामपंचायतींनी अशा योजना कार्यान्वित करण्याची गरज आहे.