शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

सोलर कृषी पंपांनी फुलले दुर्गम भागातील माळरान

By admin | Updated: March 15, 2015 01:09 IST

एटापल्ली व भामरागड या दुर्गम भागातील गावांपर्यंत वीज पोहोचली नाही. अशा २२ गावांमधील शेकडो शेतकऱ्यांना सोलर कृषी पंपांचा पुरवठा करण्यात आला आहे.

गडचिरोली : एटापल्ली व भामरागड या दुर्गम भागातील गावांपर्यंत वीज पोहोचली नाही. अशा २२ गावांमधील शेकडो शेतकऱ्यांना सोलर कृषी पंपांचा पुरवठा करण्यात आला आहे. या कृषी पंपांनी शेकडो हेक्टर शेतीला पाणी दिले जात असून आजपर्यंत ओसाड असलेले माळरान आता हिरवेगार दिसायला लागले आहे.गडचिरोली तालुक्यातील एटापल्ली व भामरागड हे दोन तालुके जंगलाने व्यापलेले व अतिशय दुर्गम आहेत. यातील अनेक गावांपर्यंत वीज पोहोचली नाही. या गावांमधील अनेक शेतकरी दुबार पीक घेण्यासाठी ईच्छुक होते. त्याचबरोबर कृषी विभाग अनुदानावर कृषी पंप उपलब्ध करून देण्यास तयारही होता. मात्र वीज नसल्याने हे सर्व काम ठप्प पडले होते. वीज विभाग वीज उपलब्ध करून देण्यास तयारी दर्शवित असला तरी झाडे तोडून विद्युत खांब उभारू देण्यास वनविभाग तयार झाला नाही. परिणामी या गावांपर्यंत विजेचा पुरवठा करणे अशक्य बनले होते. यावर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने पर्याय शोधत २२ गावांमधील आदिवासी शेतकरी गटांना मागील वर्षी सोलर कृषी पंपाचे वाटप केले. याचा लाभ घेत शेतकऱ्यांनी दुबार पीक घेणे सुरू केले आहे. सद्य:स्थितीत या दोन तालुक्यातील शेकडो हेक्टर जमीन सोलर कृषी पंपाच्या माध्यमातून ओलीताखाली आली आहे. एका पाण्याने मरणारे धानाचे पिकही आता पूर्णपणे होऊ लागले आहे. सोलर कृषी पंपामुळे वीज बिल देण्याची गरज शेतकऱ्यांना राहिली नाही. सोलर कृषी पंप सर्वसाधारण वीज पंपापेक्षा महाग असल्याने सदर पंप अनुदानाशिवाय खरेदी करणे अशक्य आहे. त्यामुळे इतर शेतकऱ्यांनाही अशा प्रकारचे कृषी पंप देण्याची मागणी आहे. (नगर प्रतिनिधी)