शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
3
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
4
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
5
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
6
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
7
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
8
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
9
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
10
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
11
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
13
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
14
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
15
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
16
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
17
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
18
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
19
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
20
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली

सोलर कृषी पंपांनी फुलले दुर्गम भागातील माळरान

By admin | Updated: March 15, 2015 01:09 IST

एटापल्ली व भामरागड या दुर्गम भागातील गावांपर्यंत वीज पोहोचली नाही. अशा २२ गावांमधील शेकडो शेतकऱ्यांना सोलर कृषी पंपांचा पुरवठा करण्यात आला आहे.

गडचिरोली : एटापल्ली व भामरागड या दुर्गम भागातील गावांपर्यंत वीज पोहोचली नाही. अशा २२ गावांमधील शेकडो शेतकऱ्यांना सोलर कृषी पंपांचा पुरवठा करण्यात आला आहे. या कृषी पंपांनी शेकडो हेक्टर शेतीला पाणी दिले जात असून आजपर्यंत ओसाड असलेले माळरान आता हिरवेगार दिसायला लागले आहे.गडचिरोली तालुक्यातील एटापल्ली व भामरागड हे दोन तालुके जंगलाने व्यापलेले व अतिशय दुर्गम आहेत. यातील अनेक गावांपर्यंत वीज पोहोचली नाही. या गावांमधील अनेक शेतकरी दुबार पीक घेण्यासाठी ईच्छुक होते. त्याचबरोबर कृषी विभाग अनुदानावर कृषी पंप उपलब्ध करून देण्यास तयारही होता. मात्र वीज नसल्याने हे सर्व काम ठप्प पडले होते. वीज विभाग वीज उपलब्ध करून देण्यास तयारी दर्शवित असला तरी झाडे तोडून विद्युत खांब उभारू देण्यास वनविभाग तयार झाला नाही. परिणामी या गावांपर्यंत विजेचा पुरवठा करणे अशक्य बनले होते. यावर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने पर्याय शोधत २२ गावांमधील आदिवासी शेतकरी गटांना मागील वर्षी सोलर कृषी पंपाचे वाटप केले. याचा लाभ घेत शेतकऱ्यांनी दुबार पीक घेणे सुरू केले आहे. सद्य:स्थितीत या दोन तालुक्यातील शेकडो हेक्टर जमीन सोलर कृषी पंपाच्या माध्यमातून ओलीताखाली आली आहे. एका पाण्याने मरणारे धानाचे पिकही आता पूर्णपणे होऊ लागले आहे. सोलर कृषी पंपामुळे वीज बिल देण्याची गरज शेतकऱ्यांना राहिली नाही. सोलर कृषी पंप सर्वसाधारण वीज पंपापेक्षा महाग असल्याने सदर पंप अनुदानाशिवाय खरेदी करणे अशक्य आहे. त्यामुळे इतर शेतकऱ्यांनाही अशा प्रकारचे कृषी पंप देण्याची मागणी आहे. (नगर प्रतिनिधी)