शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
2
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
3
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
4
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
5
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
6
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
7
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
8
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
9
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
10
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
11
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
12
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
13
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
14
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
15
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
16
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
17
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
18
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
19
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
20
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं

लोकशाहीचे सामाजीकरण आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 23:19 IST

दिवसेंदिवस निवडणुकीतील उमेदवाराची जात बघून त्याला मतदान करण्याची वृत्ती मतदारांमध्ये वाढत आहे. त्यामुळे चारित्र्य संपन्न व्यक्ती निवडून येत नाही. समाजाच्या प्रत्येक घटकातील व्यक्ती निवडून आल्यास लोकशाहीचे सामाजीकरण होण्यास मदत होईल. लोकशाहीचे सामाजीकरण झाल्यास राज्यघटना बदलविण्याचा विचार करेल, असा व्यक्ती तयारच होणार नाही, असे प्रतिपादन भारीप बहुजन महासंघाचे अध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश (बाळासाहेब) आंबेडकर यांनी केले.

ठळक मुद्देगडचिरोली येथे संवाद यात्रा : अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दिवसेंदिवस निवडणुकीतील उमेदवाराची जात बघून त्याला मतदान करण्याची वृत्ती मतदारांमध्ये वाढत आहे. त्यामुळे चारित्र्य संपन्न व्यक्ती निवडून येत नाही. समाजाच्या प्रत्येक घटकातील व्यक्ती निवडून आल्यास लोकशाहीचे सामाजीकरण होण्यास मदत होईल. लोकशाहीचे सामाजीकरण झाल्यास राज्यघटना बदलविण्याचा विचार करेल, असा व्यक्ती तयारच होणार नाही, असे प्रतिपादन भारीप बहुजन महासंघाचे अध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश (बाळासाहेब) आंबेडकर यांनी केले.चामोर्शी मार्गावरील कात्रटवार कॉम्प्लेक्स येथे रविवारी वंचित बहुजन आघाडीतर्फे संवाद यात्रा आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर मार्गदर्शन करीत होते. सभेला साहित्यिक लक्ष्मण माने, ेभारीप बहुजन महासंघाचे प्रदेश निरिक्षक रोहिदास राऊत, अ‍ॅड. विजय मोरे, माजी आ. हरीभाऊ बद्दे, एल. के. मडावी, अशोक खोब्रागडे, प्रा. प्रकाश दुधे, हंसराज बडोले, संदीप रहाटे, गोपाल मोगरे, डॉ. सुशील कोहाड आदी मार्गदर्शक उपस्थित होते.पुढे बोलताना अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, मराठा समाजाचा विकास झाला असता तर त्यांना आरक्षण मागण्याची गरज पडली नसती. जागा कमी व माणसं अधिक अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. कमी असलेल्या जागा आपल्यालाच मिळाव्या, यासाठी भांडण, तंटे सुरू झाले आहेत. सत्ता उपभोगणाऱ्या मराठा नेत्यांनी आजपर्यंत मराठा समाजाच्या विकासासाठी प्रयत्न केले नाहीत. आता मात्र मराठा समाजाची त्यांच्याकडूनच दिशाभूल केली जात आहे. शासन केवळ आकडेवारी सादर करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे. याची अनेक उदाहरणे देता येतात. राज्य शासनाने राज्यभरात १३ कोटी वृक्षांची लागवड केली. मात्र एकाही बोडक्या डोंगरावर किंवा मोकळ्या जागेत झाडे दिसत नाही. तर जेथे आधीच जंगल आहे, त्याच ठिकाणी झाडे लावण्याचा उपक्रम सुरू असल्याचे दिसून येते. त्यामुळे शासनाचा पैसा खर्च होत आहे. प्रसिध्दी मिळत आहे. मात्र प्रत्यक्षात काहीच फायदा नाही. दरवर्षी १८ लाख विद्यार्थी डिग्री घेऊन बाहेर पडतात. मात्र केवळ ६ लाख युवकांना नोकरी दिली जात आहे. काँग्रेस हा खरा विरोधी पक्ष नसून प्रादेशिक पक्ष हेच खरे विरोधी पक्ष आहेत. आधार कार्डच्या माध्यमातून केंद्र शासन नागरिकांची वैयक्तिक माहिती विदेशी कंपन्यांच्या हातात देत आहे. याचे गंभीर परिणाम देशाला भोगावे लागणार आहेत. समाजात विकृती वाढत चालली आहे.देशातील वंचित घटाकाला सत्तेत प्रतिनिधीत्व मिळावे तसेच जात व धर्म यांच्या पलिकडे जाऊन प्रत्येक नागरिकाचा विकास व्हावा, या उद्देशाने वंचित बहुजन आघाडीची स्थापना करण्यात आली आहे, असे मार्गदर्शन अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.उपराकार साहित्यिक लक्ष्मण माने मार्गदर्शन करताना आदिवासींना पट्टे देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, मात्र याची अंमलबजावणी होत नाही. आदिवासींच्या विकासासाठी शेकडो कोटींच्या योजना आणल्या जातात. मात्र आदिवासींची परिस्थिती आजही १० वर्षांपूर्वी जशी होती, तशीच आहे. त्यामुळे निधी गेला कुठे, असा प्रश्न उपस्थित केला.सभेला माजी आमदार हरीभाऊ भद्दे, अ‍ॅड. विजय मोरे, एल. के. मडावी, रोहिदास राऊत, गोपाल मगरे, डॉ. सुशील कोहाड यांनी मार्गदर्शन केले. सभेला जिल्हाभरातील हजारो नागरिक उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व संचालन बाळू टेंभुर्णे यांनी केले. उपस्थितांचे आभार भावना भजगवळी यांनी मानले.वंचितांना सत्तेकडे घेऊन जाण्यासाठी बहुजन आघाडीची स्थापनास्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही ओबीसी, भटके, विमुक्त, धनगर समाजासह बहुजनांचा विकास झाला नाही. कारण बहुजनांचा सत्ताकारणात प्रत्यक्ष सहभाग नव्हता. अशा सर्व वंचितांना सत्तेकडे घेऊन जाण्यासाठीच वंचित बहुजन आघाडीची स्थापना करण्यात आली आहे.. जेणेकरून लोकशाहीचे सामाजिकरण होऊन वंचितांना न्याय मिळेल, असे मत भारीप-बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडीचे समन्वयक अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले.वंचित बहुजन आघाडीच्या संवाद यात्रेनिमित्त ते रविवारी गडचिरोलीत आले होते. महाराष्टÑ विधानसभेच्या २८८ जागांपैकी किमान ५० जागा लहान ओबीसी व भटक्या विमुक्त समाजाला बहुजन आघाडीतर्फे दिल्या जातील.लोकसभेच्या ४८ जागांपैकी आपण आघाडीतर्फे १२ जागा काँग्रेसला मागितल्या असून तसा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या अटीवर आम्ही काँग्रेससोबत समझोता करायला तयार आहोत, असेही अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रपरिषदेत स्पष्ट केले.