शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
4
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
5
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
6
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
7
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
8
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
9
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
10
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
11
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
12
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
13
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
14
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
15
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
16
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
17
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
18
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
19
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
20
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल

जिल्ह्यात आतापर्यंत ६५ काेटींची धान खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:33 IST

गडचिराेली : आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने खरीप पणन हंगाम २०२०-२१ मध्ये आधारभूत किंमत खरेदी याेजनेंतर्गत जिल्ह्यात धानाची खरेदी सुरू ...

गडचिराेली : आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने खरीप पणन हंगाम २०२०-२१ मध्ये आधारभूत किंमत खरेदी याेजनेंतर्गत जिल्ह्यात धानाची खरेदी सुरू आहे. महामंडळाच्या वतीने संपूर्ण जिल्हाभरात एकूण ९० केंद्र मंजूर करण्यात आले. यापैकी ७७ केंद्रांवर धानाची आवक झाली असून आतापर्यंत एकूण ६५ काेटी ९१ लाख ४ हजार रुपये किमतीच्या धानाची खरेदी करण्यात आली आहे. केंद्र सुरू झाल्यापासून १५ जानेवारीपर्यंत गडचिराेली व अहेरी परिसरातील ७७ केंद्रांवर एकूण ३ लाख ५२ हजार ८३९ क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. महामंडळाच्या वतीने यावर्षी साधारण धानाला प्रती क्विंटल १८६८ रुपये भाव दिला जात आहे. आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिराेली प्रादेशिक कार्यालयांतर्गत ५१ केंद्र मंजूर करण्यात आले. सर्वच केंद्रांवर धानाची आवक झाली असून आतापर्यंत १० हजार ४५७ शेतकऱ्यांनी २ लाख ९४ हजार ८३३ क्विंटल धानाची विक्री केली आहे.

महामंडळाच्या अहेरी उपप्रादेशिक कार्यालयाच्या हद्दीमध्ये ३९ केंद्र मंजूर करण्यात आले. यापैकी २६ केंद्रांवर धानाची आवक झाली असून आतापर्यंत या केंद्रांवर १ हजार ७२८ शेतकऱ्यांनी ५८ हजार क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. गडचिराेली परिसरातील ५१ केंद्रांवरून ५५ काेटी ७ लाख ४८ हजार रुपये तर अहेरी उपविभागात १० काेटी ८३ लाख ५५ हजार रुपये किमतीच्या धानाची खरेदी करण्यात आली आहे.

राज्य शासनाच्या वतीने यावर्षीसुद्धा आधारभूत केंद्रावर धान विकणाऱ्या शेतकऱ्यांना प्रती क्विंटल ७०० रुपये इतका बाेनस देण्यात येणार आहे. धानाचा हमीभाव व बाेनसची रक्कम मिळून शेतकऱ्यांना चांगला माेबदला मिळत असल्याने शेतकऱ्यांचा महामंडळाच्या आधारभूत केंद्रांवर धानाची विक्री करण्याचा कल वाढला आहे. गतवर्षीही महामंडळाच्या केंद्रांवर धानाची विक्रमी खरेदी झाली हाेती.

बाॅक्स

चुकारे मिळण्यास हाेतेय दिरंगाई

आदिवासी विकास महामंडळांतर्गत आविका संस्थेच्या वतीने धानाची खरेदी केली जात असून शेतकऱ्यांना थेट शासनाकडून चुकाऱ्याची रक्कम बँक खात्यात अदा केली जात आहे. मात्र ही रक्कम अदा करण्यासाठी बऱ्याच बाबींची पूर्तता व पडताळणी केली जाते. या प्रक्रियेत वेळ जात असल्यााने शेतकऱ्यांना धान विकूनही चुकाऱ्याची रक्कम लवकर मिळत नाही. गडचिराेली व अहेरी कार्यालय मिळून अजूनही २९ काेटी ९० लाख रुपयांचे चुकारे प्रलंबित आहे. परिणामी ५ हजार ४९० शेतकरी रकमेच्या प्रतीक्षेत आहेत.