शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

आतापर्यंत ४९ हजार लोक परतले जिल्ह्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 05:00 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर १ मे पासून परराज्यातील ६१२ मजुरांना त्यांच्या राज्यात पाठविण्यात आले, तर बाहेरून २२ हजार ६८८ नागरिक जिल्ह्यात परत आले आहेत. राज्यातील इतर जिल्हयातील गडचिरोलीत अडकलेल्या २३७४ नागरिकांना प्रशासनाने एसटी बस व खाजगी बसमधून त्यांच्या जिल्ह्यात पाठविले. अडकलेल्या नागरिकांना नेण्या-आणण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून रेल्वे आणि बसेसची व्यवस्था केली होती.

ठळक मुद्दे९५१७ लोक विलगीकरणात : ३९,६७८ लोकांनी पूर्ण केला विलगीकरण कालावधी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत तब्बल ४९ हजार लोकांनी आपला गृहजिल्हा गडचिरोली गाठला आहे. त्यातील २२ हजार ६८८ लोक १ मे नंतर आले आहेत. आतापर्यंत ३९ हजार ६७८ लोकांनी संस्थात्मक आणि गृह विलगीकरणाचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण केला आहे, तर अलिकडे जिल्ह्यात दाखल झालेले ९५१७ लोक अजूनही विलगीकरणात आहेत.जिल्ह्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असल्याने विलगिकरण कक्षातील लोकांची संख्याही वाढत आहे. यासोबतच आता रेड झोनमधून आलेल्या सर्वांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविल्या जात आहेत. आतापर्यंत १३५६ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविले. त्यापैकी २६ जण पॉझिटिव्ह तर ७९४ जण निगेटिव्ह आढळले. अजून ५३६ जणांचे अहवाल येणे बाकी आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर १ मे पासून परराज्यातील ६१२ मजुरांना त्यांच्या राज्यात पाठविण्यात आले, तर बाहेरून २२ हजार ६८८ नागरिक जिल्ह्यात परत आले आहेत. राज्यातील इतर जिल्हयातील गडचिरोलीत अडकलेल्या २३७४ नागरिकांना प्रशासनाने एसटी बस व खाजगी बसमधून त्यांच्या जिल्ह्यात पाठविले. अडकलेल्या नागरिकांना नेण्या-आणण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून रेल्वे आणि बसेसची व्यवस्था केली होती. जिल्हा प्रशासनाकडून इतर राज्यातील प्रवाशांना चंद्रपूर, नागपूर व शेजारील राज्यांच्या सीमावर्ती भागात सोडण्यात आले. तर आपल्याकडे परत येणाऱ्यांना सुखरूप बसेसने आणण्यात आले. बाहेर जाणाऱ्यांमध्ये उत्तरप्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल, बिहार, मध्यप्रदेश व राजस्थान या राजांचा समावेश होता. यातील मध्यप्रदेश शिवणी येथे राज्य सीमेवर जिल्हा प्रशासनाकडून बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. उर्वरीत सर्व नागपूर येथून बस व रेल्वेने स्वराज्यात परतले.शेजारील तेलंगणा, आंध्रप्रदेश राज्यासह मुंबई, पुणे, नागपूर व इतर जिल्हयातून २२ हजार ६८८ नागरिक १ मे नंतर जिल्ह्यात पोहोचले आहेत. गडचिरोली जिल्हयात अडकून पडलेल्या २३७४ लोकांना प्रशासनाकडून स्वजिल्हयात जाण्यास परवानगी देण्यात आली.प्रत्येकाने खासगी नोंदवही ठेवावीकोरोना हा संसर्ग बाधिताच्या संपर्कात आल्याने होतो. टाळेबंदी असल्याने इतर लोकांशी कमीत कमी संपर्क ठेवणे आवश्यक आहे. यातूनही नकळत कोणा बाधित व्यक्तीशी संपर्क आला तर त्यामध्ये पुढील संसर्ग साखळी तोडण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने ‘पर्सनल डायरी’ म्हणजेच खाजगी नोंदीवही ठेवणे आवश्यक असल्याचे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे.जिल्ह्यात कोरोनाबाधित आढळून आल्याने आता प्रशासन बाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेत आहे. यातूनच ही संकल्पना आवश्यक असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले. बाधित रूग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीचे नाव दिले तर पुन्हा त्याच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध तात्काळ घेऊन ही संसर्ग साखळी वेळेत रोखता येईल.आणखी एका पॉझिटिव्हची भरजिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मंगळवारी आणखी एकाची भर पडली. त्यामुळे रुग्णसंख्या २६ झाली आहे. सदर रुग्ण मुलचेरा तालुक्यातील विलगिकरण कक्षात होता. यापूर्वीच्या रुग्णांप्रमाणे तोसुद्धा मुंबईवरून आलेला होता आणि तेव्हापासून विलगिकरणात होता. त्याचा नमुना पॉझिटिव्ह आल्यानंतर इतरही रुग्णांचे स्वॅब नमुने घेतले जात आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या