शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

आतापर्यंत ४९ हजार लोक परतले जिल्ह्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 05:00 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर १ मे पासून परराज्यातील ६१२ मजुरांना त्यांच्या राज्यात पाठविण्यात आले, तर बाहेरून २२ हजार ६८८ नागरिक जिल्ह्यात परत आले आहेत. राज्यातील इतर जिल्हयातील गडचिरोलीत अडकलेल्या २३७४ नागरिकांना प्रशासनाने एसटी बस व खाजगी बसमधून त्यांच्या जिल्ह्यात पाठविले. अडकलेल्या नागरिकांना नेण्या-आणण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून रेल्वे आणि बसेसची व्यवस्था केली होती.

ठळक मुद्दे९५१७ लोक विलगीकरणात : ३९,६७८ लोकांनी पूर्ण केला विलगीकरण कालावधी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत तब्बल ४९ हजार लोकांनी आपला गृहजिल्हा गडचिरोली गाठला आहे. त्यातील २२ हजार ६८८ लोक १ मे नंतर आले आहेत. आतापर्यंत ३९ हजार ६७८ लोकांनी संस्थात्मक आणि गृह विलगीकरणाचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण केला आहे, तर अलिकडे जिल्ह्यात दाखल झालेले ९५१७ लोक अजूनही विलगीकरणात आहेत.जिल्ह्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असल्याने विलगिकरण कक्षातील लोकांची संख्याही वाढत आहे. यासोबतच आता रेड झोनमधून आलेल्या सर्वांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविल्या जात आहेत. आतापर्यंत १३५६ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविले. त्यापैकी २६ जण पॉझिटिव्ह तर ७९४ जण निगेटिव्ह आढळले. अजून ५३६ जणांचे अहवाल येणे बाकी आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर १ मे पासून परराज्यातील ६१२ मजुरांना त्यांच्या राज्यात पाठविण्यात आले, तर बाहेरून २२ हजार ६८८ नागरिक जिल्ह्यात परत आले आहेत. राज्यातील इतर जिल्हयातील गडचिरोलीत अडकलेल्या २३७४ नागरिकांना प्रशासनाने एसटी बस व खाजगी बसमधून त्यांच्या जिल्ह्यात पाठविले. अडकलेल्या नागरिकांना नेण्या-आणण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून रेल्वे आणि बसेसची व्यवस्था केली होती. जिल्हा प्रशासनाकडून इतर राज्यातील प्रवाशांना चंद्रपूर, नागपूर व शेजारील राज्यांच्या सीमावर्ती भागात सोडण्यात आले. तर आपल्याकडे परत येणाऱ्यांना सुखरूप बसेसने आणण्यात आले. बाहेर जाणाऱ्यांमध्ये उत्तरप्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल, बिहार, मध्यप्रदेश व राजस्थान या राजांचा समावेश होता. यातील मध्यप्रदेश शिवणी येथे राज्य सीमेवर जिल्हा प्रशासनाकडून बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. उर्वरीत सर्व नागपूर येथून बस व रेल्वेने स्वराज्यात परतले.शेजारील तेलंगणा, आंध्रप्रदेश राज्यासह मुंबई, पुणे, नागपूर व इतर जिल्हयातून २२ हजार ६८८ नागरिक १ मे नंतर जिल्ह्यात पोहोचले आहेत. गडचिरोली जिल्हयात अडकून पडलेल्या २३७४ लोकांना प्रशासनाकडून स्वजिल्हयात जाण्यास परवानगी देण्यात आली.प्रत्येकाने खासगी नोंदवही ठेवावीकोरोना हा संसर्ग बाधिताच्या संपर्कात आल्याने होतो. टाळेबंदी असल्याने इतर लोकांशी कमीत कमी संपर्क ठेवणे आवश्यक आहे. यातूनही नकळत कोणा बाधित व्यक्तीशी संपर्क आला तर त्यामध्ये पुढील संसर्ग साखळी तोडण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने ‘पर्सनल डायरी’ म्हणजेच खाजगी नोंदीवही ठेवणे आवश्यक असल्याचे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे.जिल्ह्यात कोरोनाबाधित आढळून आल्याने आता प्रशासन बाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेत आहे. यातूनच ही संकल्पना आवश्यक असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले. बाधित रूग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीचे नाव दिले तर पुन्हा त्याच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध तात्काळ घेऊन ही संसर्ग साखळी वेळेत रोखता येईल.आणखी एका पॉझिटिव्हची भरजिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मंगळवारी आणखी एकाची भर पडली. त्यामुळे रुग्णसंख्या २६ झाली आहे. सदर रुग्ण मुलचेरा तालुक्यातील विलगिकरण कक्षात होता. यापूर्वीच्या रुग्णांप्रमाणे तोसुद्धा मुंबईवरून आलेला होता आणि तेव्हापासून विलगिकरणात होता. त्याचा नमुना पॉझिटिव्ह आल्यानंतर इतरही रुग्णांचे स्वॅब नमुने घेतले जात आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या