शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

आतापर्यंत ४९ हजार लोक परतले जिल्ह्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 05:00 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर १ मे पासून परराज्यातील ६१२ मजुरांना त्यांच्या राज्यात पाठविण्यात आले, तर बाहेरून २२ हजार ६८८ नागरिक जिल्ह्यात परत आले आहेत. राज्यातील इतर जिल्हयातील गडचिरोलीत अडकलेल्या २३७४ नागरिकांना प्रशासनाने एसटी बस व खाजगी बसमधून त्यांच्या जिल्ह्यात पाठविले. अडकलेल्या नागरिकांना नेण्या-आणण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून रेल्वे आणि बसेसची व्यवस्था केली होती.

ठळक मुद्दे९५१७ लोक विलगीकरणात : ३९,६७८ लोकांनी पूर्ण केला विलगीकरण कालावधी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत तब्बल ४९ हजार लोकांनी आपला गृहजिल्हा गडचिरोली गाठला आहे. त्यातील २२ हजार ६८८ लोक १ मे नंतर आले आहेत. आतापर्यंत ३९ हजार ६७८ लोकांनी संस्थात्मक आणि गृह विलगीकरणाचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण केला आहे, तर अलिकडे जिल्ह्यात दाखल झालेले ९५१७ लोक अजूनही विलगीकरणात आहेत.जिल्ह्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असल्याने विलगिकरण कक्षातील लोकांची संख्याही वाढत आहे. यासोबतच आता रेड झोनमधून आलेल्या सर्वांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविल्या जात आहेत. आतापर्यंत १३५६ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविले. त्यापैकी २६ जण पॉझिटिव्ह तर ७९४ जण निगेटिव्ह आढळले. अजून ५३६ जणांचे अहवाल येणे बाकी आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर १ मे पासून परराज्यातील ६१२ मजुरांना त्यांच्या राज्यात पाठविण्यात आले, तर बाहेरून २२ हजार ६८८ नागरिक जिल्ह्यात परत आले आहेत. राज्यातील इतर जिल्हयातील गडचिरोलीत अडकलेल्या २३७४ नागरिकांना प्रशासनाने एसटी बस व खाजगी बसमधून त्यांच्या जिल्ह्यात पाठविले. अडकलेल्या नागरिकांना नेण्या-आणण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून रेल्वे आणि बसेसची व्यवस्था केली होती. जिल्हा प्रशासनाकडून इतर राज्यातील प्रवाशांना चंद्रपूर, नागपूर व शेजारील राज्यांच्या सीमावर्ती भागात सोडण्यात आले. तर आपल्याकडे परत येणाऱ्यांना सुखरूप बसेसने आणण्यात आले. बाहेर जाणाऱ्यांमध्ये उत्तरप्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल, बिहार, मध्यप्रदेश व राजस्थान या राजांचा समावेश होता. यातील मध्यप्रदेश शिवणी येथे राज्य सीमेवर जिल्हा प्रशासनाकडून बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. उर्वरीत सर्व नागपूर येथून बस व रेल्वेने स्वराज्यात परतले.शेजारील तेलंगणा, आंध्रप्रदेश राज्यासह मुंबई, पुणे, नागपूर व इतर जिल्हयातून २२ हजार ६८८ नागरिक १ मे नंतर जिल्ह्यात पोहोचले आहेत. गडचिरोली जिल्हयात अडकून पडलेल्या २३७४ लोकांना प्रशासनाकडून स्वजिल्हयात जाण्यास परवानगी देण्यात आली.प्रत्येकाने खासगी नोंदवही ठेवावीकोरोना हा संसर्ग बाधिताच्या संपर्कात आल्याने होतो. टाळेबंदी असल्याने इतर लोकांशी कमीत कमी संपर्क ठेवणे आवश्यक आहे. यातूनही नकळत कोणा बाधित व्यक्तीशी संपर्क आला तर त्यामध्ये पुढील संसर्ग साखळी तोडण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने ‘पर्सनल डायरी’ म्हणजेच खाजगी नोंदीवही ठेवणे आवश्यक असल्याचे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे.जिल्ह्यात कोरोनाबाधित आढळून आल्याने आता प्रशासन बाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेत आहे. यातूनच ही संकल्पना आवश्यक असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले. बाधित रूग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीचे नाव दिले तर पुन्हा त्याच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध तात्काळ घेऊन ही संसर्ग साखळी वेळेत रोखता येईल.आणखी एका पॉझिटिव्हची भरजिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मंगळवारी आणखी एकाची भर पडली. त्यामुळे रुग्णसंख्या २६ झाली आहे. सदर रुग्ण मुलचेरा तालुक्यातील विलगिकरण कक्षात होता. यापूर्वीच्या रुग्णांप्रमाणे तोसुद्धा मुंबईवरून आलेला होता आणि तेव्हापासून विलगिकरणात होता. त्याचा नमुना पॉझिटिव्ह आल्यानंतर इतरही रुग्णांचे स्वॅब नमुने घेतले जात आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या