शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

आतापर्यंत १३ हजार नागरिकांनी काेराेनाला हरवून दाखवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 05:00 IST

मागील वर्षभराच्या कालावधीत सुमारे १८ हजार ४ नागरिकांना काेराेनाची बाधा झाली. सरकारमार्फत विविध उपाय याेजले जात असले तरी मागील १५ दिवसांपासून काेराेना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे, तसेच काेराेनामुळे ३११ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. काेराेनाशी संबंधित चर्चा करताना नागरिक प्रामुख्याने नकारात्मक असलेल्या बाबींवरच जास्त बाेलतात. त्यामुळे ऐकणाऱ्याला काेराेना हा महाभयंकर राेग आहे.

ठळक मुद्देसकारात्मक विचारातून मात करणे शक्य

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. त्यामुळे काही नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असले तरी सुमारे १३ हजार ३७५ नागरिक काेराेनाला हरवून काेराेनामुक्त झाले आहेत. विशेष म्हणजे एकूण बाधितांच्या प्रमाणात हे प्रमाण सुमारे ७४.२९ टक्के एवढे आहे. या आकड्यांकडे लक्ष घातल्यास काेराेनाला हरविणे सहज शक्य असल्याचे दिसून येते. मागील वर्षभराच्या कालावधीत सुमारे १८ हजार ४ नागरिकांना काेराेनाची बाधा झाली. सरकारमार्फत विविध उपाय याेजले जात असले तरी मागील १५ दिवसांपासून काेराेना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे, तसेच काेराेनामुळे ३११ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. काेराेनाशी संबंधित चर्चा करताना नागरिक प्रामुख्याने नकारात्मक असलेल्या बाबींवरच जास्त बाेलतात. त्यामुळे ऐकणाऱ्याला काेराेना हा महाभयंकर राेग आहे. ताे झाल्यास मृत्यू अटळ आहे, असा गैरसमज निर्माण हाेऊन अनावश्यक भीती निर्माण हाेते. मात्र, काेराेनामुळे मृत्यू झालेल्यांचे हे प्रमाण बाधितांच्या तुलनेत केवळ १.७३ टक्का एवढे आहे. म्हणजेच जवळपास ९८ टक्के नागरिकांनी काेराेनावर मात केली आहे. ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे. मृत्यू झालेल्यांपैकी काही रुग्णांनी सुरुवातीलाच उपचार केला नाही. अगदी शेवटच्या स्टेजवर त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आल्याने डाॅक्टरांनी शर्तीचे प्रयत्न केल्यावरही त्याला वाचविता आले नाही किंवा इतर गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्यांचाच मृत्यू झाल्याचे दिसून येते. 

घाबरू नका, काेराेनाला आम्हीही हरविले

काेराेना हाेणार नाही, याची खबरदारी प्रत्येक नागरिकाने घेणे आवश्यक आहे. तरीही काेराेनाची लागण झाल्यास वेळीच तपासणी करून रुग्णालयात दाखल हाेणे आवश्यक आहे. लवकर उपचार सुरू झाल्यास काेराेनाचा काहीच त्रास हाेत नाही. कृत्रिम ऑक्सिजनचीही गरज पडत नाही. -एकनाथ गेडाम, ज्येष्ठ नागरिक 

समाजात काेराेनाविषयी नकारात्मक विचार पसरविले जात आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये या राेगाविषयी अनावश्यक भीती निर्माण झाली आहे. मी स्वत: ६१ वर्षांचा आहे. मात्र, उपचारादरम्यान मला ऑक्सिजनची गरजच भासली नाही. डाॅक्टरांनी दिलेल्या औषधांमुळे मी काेराेनातून पूर्णपणे बरा झालाे आहे. -देवाजी चापले, ज्येष्ठ नागरिक

काेराेनामुळे सर्वच रुग्ण गंभीर राहत नाहीत. मी स्वत: घरीच राहून उपचार घेतला आहे. डाॅक्टरांच्या सल्ल्यानंतर मी उपचार घेत हाेताे. मला थाेडा सर्दी, खाेकला हाेता. काेराेनाची चाचणी केल्यावर अहवाल पाॅझिटिव्ह आला. चार दिवसांतच सर्दी, खाेकल्याचा त्रास कमी झाला. -शिवराम मांदाडे, काेराेनामुक्त नागरिक

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या