शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
4
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! ब्रोकरेज फर्मकडून 'या' ५ शेअर्सना खरेदीचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
5
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
6
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
7
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
8
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
9
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
10
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
11
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
12
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
13
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
14
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
15
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
16
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
17
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
18
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
19
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा

२२० गावांवर घोंघावतेय जलसंकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 23:19 IST

यावर्षी जिल्ह्यात पाऊस सरासरीपेक्षा कमी झाल्यामुळे अनेक गावांवर पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवणार आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास विभागाने नुकत्याच दिलेल्या अहवालानुसार ......

ठळक मुद्देभूजल सर्व्हेक्षण विभागाचा अंदाज : उन्हाळी धानपिकांनाही बसणार फटका

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : यावर्षी जिल्ह्यात पाऊस सरासरीपेक्षा कमी झाल्यामुळे अनेक गावांवर पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवणार आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास विभागाने नुकत्याच दिलेल्या अहवालानुसार एप्रिल ते जून या कालावधीत जिल्ह्यातील जवळपास २२० गावांमधील नागरिकांना जलसंकटाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.गेल्यावर्षीच्या तुलतने यावर्षीच्या पावसाळ्यात (वर्ष २०१७) कमी पाऊस झाला. जिल्ह्यात वार्षिक सरासरी १३५४.७८ मिमी पाऊस होतो. परंतू यावर्षी जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या कालावधीत १०११.३३ मिमी पाऊस बरसला. पावसाचे हे प्रमाण सरासरीपेक्षा ३४३.४५ मिमी कमी झाले आहे. म्हणजेच सरासरीच्या तुलनेत ७४.६५ टक्केच पाऊस झाला आहे. परिणामी जलाशयांमध्ये पुरेशा प्रमाणात जलसाठा राहू शकला नाही. पाण्याचे स्त्रोतही आता आटण्याच्या मार्गावर आहेत. नदी, नाल्यांपासून अनेक विहिरींचीही पाणी पातळी खालावली आहे.गडचिरोली शहरवासियांची तहान भागविणाºया वैनगंगा नदीतील पाण्याची पातळीही खालावली आहे. काही दिवसांपूर्वी नगर पालिकेच्या वतीने नदीत रेतीचा बांध तयार करून पाणी रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला.गडचिरोलीतील भूजल सर्वेक्षण और विकास यंत्रणेच्या वरिष्ठ भूवैज्ञानिकांकडून जानेवारी महिन्यात भुजल पातळीचे सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यात भूजल पातळी खालावल्याचे आणि येणाºया दिवसात ती आणखी खालावणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यातच एप्रिल ते जून या कालावधीत जिल्ह्यातील २२० गावांमध्ये जलसंकट निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामुळे त्या गावांच्या परिसरातील ९८ हजार १११.६१ हेक्टर क्षेत्र प्रभावित होणार आहे. परिणामी उन्हाळी धान किंवा इतर पिकांना पाणी देण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागणार आहे.भूजल यंत्रणेच्या सर्व्हेक्षणानुसार केवळ मुलचेरा तहसीलमधील भूजल पातळी ०.२८ मीटरने वाढली आहे. मात्र इतर ११ तालुक्यातील भूजल पातळीत खाली गेली आहे. त्यात गडचिरोली जिल्ह्यात ०.१२ मीटर, आरमोरी ०.३९ मीटर, धानोरा ०.४७ मीटर, देसाईगंज ०.४३ मीटर, चामोर्शी ०.३८ मीटर, कोरची ०.९१ मीटर, अहेरी ०.३८ मीटर, एटापल्ली ०.३० मीटर, भामरागड ०.५१ मीटर आणि सिरोंचा ०.०६ मीटर एवढी भूजल पातळी खालावली आहे.धानोरा तालुक्यात ६५ गावे होणार बाधितअहवालानुसार छत्तीसगड सीमेलगत धानोरा तालुक्यातील जवळपास ६५ गावांमध्ये येणाºया दिवसात जलसंकट तीव्र होण्याची शक्यता आहे. आरमोरी आणि मुलचेरा तालुक्यातील सर्वात कमी गावांना याचा फटका बसणार आहे.हातपंप दुरूस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्षहातपंप दुरूस्त करणे पंचायत समितीच्या यांत्रिक विभागाची जबाबदारी आहे. मात्र हातपंप दुरूस्त केले जात नाही. परिणामी दुर्गम भागात पाणी टंचाईची समस्या गंभीर होते. मात्र या भागातील नागरिक तक्रारी करीत नसल्याने सदर समस्या लक्षात येत नाही. हातपंप वेळीच दुरूस्त करणे गरजेचे आहे.