शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
2
"दुबईच्या शेखला सेक्स पार्टनर हवा," बाबा चैतन्यानंदाची विद्यार्थीनींकडे अश्लील मागणी; चॅटमध्ये नेमके काय?
3
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
4
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
5
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या
6
चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी
7
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
8
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
9
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
10
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
11
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
12
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
13
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
14
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
15
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
16
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
17
हत्ती आणि हरीण; पूरग्रस्तांना फक्त आर्थिक नव्हे, मानसिक आधाराची गरज!
18
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
19
राहुल गांधी यांचे 'नागरिकत्व' आणि 'ईडी'; या एन्ट्रीमुळे प्रकरणाला अनपेक्षित वळण
20
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला

२२० गावांवर घोंघावतेय जलसंकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 23:19 IST

यावर्षी जिल्ह्यात पाऊस सरासरीपेक्षा कमी झाल्यामुळे अनेक गावांवर पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवणार आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास विभागाने नुकत्याच दिलेल्या अहवालानुसार ......

ठळक मुद्देभूजल सर्व्हेक्षण विभागाचा अंदाज : उन्हाळी धानपिकांनाही बसणार फटका

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : यावर्षी जिल्ह्यात पाऊस सरासरीपेक्षा कमी झाल्यामुळे अनेक गावांवर पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवणार आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास विभागाने नुकत्याच दिलेल्या अहवालानुसार एप्रिल ते जून या कालावधीत जिल्ह्यातील जवळपास २२० गावांमधील नागरिकांना जलसंकटाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.गेल्यावर्षीच्या तुलतने यावर्षीच्या पावसाळ्यात (वर्ष २०१७) कमी पाऊस झाला. जिल्ह्यात वार्षिक सरासरी १३५४.७८ मिमी पाऊस होतो. परंतू यावर्षी जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या कालावधीत १०११.३३ मिमी पाऊस बरसला. पावसाचे हे प्रमाण सरासरीपेक्षा ३४३.४५ मिमी कमी झाले आहे. म्हणजेच सरासरीच्या तुलनेत ७४.६५ टक्केच पाऊस झाला आहे. परिणामी जलाशयांमध्ये पुरेशा प्रमाणात जलसाठा राहू शकला नाही. पाण्याचे स्त्रोतही आता आटण्याच्या मार्गावर आहेत. नदी, नाल्यांपासून अनेक विहिरींचीही पाणी पातळी खालावली आहे.गडचिरोली शहरवासियांची तहान भागविणाºया वैनगंगा नदीतील पाण्याची पातळीही खालावली आहे. काही दिवसांपूर्वी नगर पालिकेच्या वतीने नदीत रेतीचा बांध तयार करून पाणी रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला.गडचिरोलीतील भूजल सर्वेक्षण और विकास यंत्रणेच्या वरिष्ठ भूवैज्ञानिकांकडून जानेवारी महिन्यात भुजल पातळीचे सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यात भूजल पातळी खालावल्याचे आणि येणाºया दिवसात ती आणखी खालावणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यातच एप्रिल ते जून या कालावधीत जिल्ह्यातील २२० गावांमध्ये जलसंकट निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामुळे त्या गावांच्या परिसरातील ९८ हजार १११.६१ हेक्टर क्षेत्र प्रभावित होणार आहे. परिणामी उन्हाळी धान किंवा इतर पिकांना पाणी देण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागणार आहे.भूजल यंत्रणेच्या सर्व्हेक्षणानुसार केवळ मुलचेरा तहसीलमधील भूजल पातळी ०.२८ मीटरने वाढली आहे. मात्र इतर ११ तालुक्यातील भूजल पातळीत खाली गेली आहे. त्यात गडचिरोली जिल्ह्यात ०.१२ मीटर, आरमोरी ०.३९ मीटर, धानोरा ०.४७ मीटर, देसाईगंज ०.४३ मीटर, चामोर्शी ०.३८ मीटर, कोरची ०.९१ मीटर, अहेरी ०.३८ मीटर, एटापल्ली ०.३० मीटर, भामरागड ०.५१ मीटर आणि सिरोंचा ०.०६ मीटर एवढी भूजल पातळी खालावली आहे.धानोरा तालुक्यात ६५ गावे होणार बाधितअहवालानुसार छत्तीसगड सीमेलगत धानोरा तालुक्यातील जवळपास ६५ गावांमध्ये येणाºया दिवसात जलसंकट तीव्र होण्याची शक्यता आहे. आरमोरी आणि मुलचेरा तालुक्यातील सर्वात कमी गावांना याचा फटका बसणार आहे.हातपंप दुरूस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्षहातपंप दुरूस्त करणे पंचायत समितीच्या यांत्रिक विभागाची जबाबदारी आहे. मात्र हातपंप दुरूस्त केले जात नाही. परिणामी दुर्गम भागात पाणी टंचाईची समस्या गंभीर होते. मात्र या भागातील नागरिक तक्रारी करीत नसल्याने सदर समस्या लक्षात येत नाही. हातपंप वेळीच दुरूस्त करणे गरजेचे आहे.