शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

साग वृक्षांची कत्तल वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 23:21 IST

पळसगाव उपक्षेत्रातील सावलखेडा बिटात मौल्यवान साग वृक्षाची दिवसाढवळ्या अवैध वृक्षतोड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. वनविभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे.

ठळक मुद्देसावलखेडा बिटमधील प्रकार : वनविभागाच्या दुर्लक्षामुळे तस्करी

लोकमत न्यूज नेटवर्कजोगीसाखरा : पळसगाव उपक्षेत्रातील सावलखेडा बिटात मौल्यवान साग वृक्षाची दिवसाढवळ्या अवैध वृक्षतोड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. वनविभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे.आरमोरी वनपरिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या पळसगाव उपक्षेत्रातील सावलखेडा बिटात कक्ष क्र.३० व ३१ च्या शेकडो हेक्टर वनजमिनीवर २० ते २५ वर्षांपूर्वी साग लागण्यात आले होते. आज या साग वृक्षाची गोलाई ६० ते ८० से.मी. आहे. उंची ५० फुटापेक्षा अधिक आहे. सावलखेडा बिटातून सर्वाधिक उत्पन्न प्राप्त होते. सावलखेडा बिटातील शेकडो हेक्टरवरील साग लक्ष वेधून घेते. या सागवानाने संपूर्ण आरमोरी तालुक्यात आपली ओळख निर्माण केली आहे. मात्र सोन्याच्या किंमतीने विकल्या जाणाऱ्या सागवानाची वनतस्करांकडून अवैध तोड होत आहे. ३० व ३१ क्रमांकाच्या कम्पार्टमेंटमध्ये शेकडो झाडे करवतीच्या सहाय्याने कापली जात आहेत. या जंगलात नेहमीच चौकीदार वनरक्षक फिरत असल्याचे सांगितले जाते. मात्र हे वनरक्षक व चौकीदार केवळ रस्त्यानेच फिरतात. जंगलात मात्र शिरत नाही. ही बाब वनतस्करांना माहित असल्याने जंगलाच्या अगदी मध्यभागी जाऊन वृक्षतोड केली जात आहे. एक झाड २० हजार रूपये किमतीपेक्षा अधिक महत्त्वाचे आहे. शेकडो झाडे तोडण्यामुळे वनविभागाचे लाखो रूपयांचे नुकसान होत आहे.या सागवान झाडांचे संरक्षण करण्याची जबाबदारी वनकर्मचाºयांवर आहे. मात्र सदर वनकर्मचारी आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने सागवानाची तोड वाढली आहे.एकीकडे शासन १३ कोटी वृक्ष लावण्याची तयारी करीत आहे. यावर शेकडो कोटी रूपये खर्च केले जाणार आहेत. तर दुसरीकडे जीवंत असलेले व पूर्ण वाढ झालेली वृक्ष तोडली जात आहेत. याकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत आहे. वृक्षतोडीची चौकशी करण्याची मागणी आहे.वनकर्मचारी खुटही करतात नष्टवनतस्कर थोड्या उंचीवरून झाडाची तोड करतात. खुट राहिल्यास त्याची चौकशी होऊन वनकर्मचाºयावर कारवाई होऊ शकते. त्यामुळे वनकर्मचारी राहिलेले खुटही पूर्णपणे तोडून नष्ट करून टाकतात. त्यामुळे खुट मापण्यासाठी आलेल्या वरिष्ठ अधिकाºयाला याचा पत्ता लागत नाही. याचा सर्वाधिक तोटा म्हणजे तोडलेले झाड पुन्हा पालत नाही.