शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

गुळगुळीत रस्त्यांवरच डांबराचा थर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 22:23 IST

तालुक्यातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली असताना मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून चांगल्या स्थितीतीलच रस्त्यांच्या दुरूस्तीचे काम केले जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा प्रताप : चंदनखेडी फाटा ते चंदनखेडी पर्यंतचा रस्ता चांगला असतानाही दुरूस्ती केली

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : तालुक्यातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली असताना मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून चांगल्या स्थितीतीलच रस्त्यांच्या दुरूस्तीचे काम केले जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.चामोर्शी- आष्टी मार्गावरील अनखोडा गावाच्या अलिकडे चंदनखेडी फाटा येते. चंदनखेडीपर्यंतचा दोन किमीचा रस्ता अतिशय सुस्थितीत होता. अगदी काही ठिकाणीच थोडेफार खड्डे पडले आहेत. त्यामुळे किमान दोन वर्ष या रस्त्याची दुरूस्ती झाली नसती तरी चालले असते. मात्र मुख्यमंत्री सडक योजनेतून या रस्त्याची निवड करण्यात आली. त्यासाठी निधी मंजूर करून कामही पूर्ण करण्यात आले. अगोदरच चांगल्या स्थितीत असलेल्या मार्गावर केवळ थोडाफार मुलामा टाकून काम उरकण्यात आले आहे. अगोदरच मार्गाची चांगली स्थिती असतानाही सदर मार्ग कसा काय मंजूर करण्यात आला, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.तालुक्यातील अनेक मार्गांची अवस्था अंत्यंत वाईट आहे. काही मार्गांवर मागील दहा वर्षांपासून साधे मुरूमसुद्धा पडले नाही. दहा वर्षांत डांबर पूर्णपणे निघून गेल्याने केवळ माती व गिट्टी शिल्लक आहे. जागोजागी खड्डे पडले आहेत. अशा मार्गांची दुरूस्ती करण्यास प्राधान्य देणे आवश्यक असतानाही केवळ कमिशनपोटी मुख्यमंत्री सडक योजनेचे प्रशासन चांगल्या रस्त्यांवर डांबरचा मुलामा देण्याचे काम करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.तालुक्यातीलच चामोर्शी-भिवापूर-वालसरा हा मार्ग अतिशय खड्डेमय आहे. मात्र सदर मार्ग दुरूस्तीसाठी मंजुरी दिली नाही. या मार्गावरील गावांमधील वाहनधारक कमालीचे त्रस्त असतानाही सदर मार्ग प्रशासनाला दिसत नाही काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.मुख्यमंत्री सडक योजनेच्या नियमांची ऐसीतैशीज्या गावांमधील रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट आहे. अशा गावांमधील रस्ते दुरूस्तीला प्राधान्य मिळावे या मुख्य उद्देशाने प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री ग्राम सडक योजना मागील तीन वर्षांपासून राज्यात सुरू करण्यात आली आहे. मात्र ग्राम सडक योजनेच्या या मुख्य उद्देशालाच हरताळ फासून कमिशनपोटी ज्या रस्त्यांची स्थिती अतिशय चांगली आहे. असे मार्ग मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत नियोजनात घेतले जात आहेत. ही अतिशय गंभीर बाब आहे. चांगल्या रस्त्यावर डांबर अंथरले जात असेल तर इतर योजना व मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत फरक काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.एकीकडे मार्ग दुरूस्तीसाठी नागरिक शासनाकडे निवेदन पाठवितात. मात्र निधी नसल्याचे कारण सांगून रस्त्याची दुरूस्ती केली जात नाही. तर दुसरीकडे चांगला मार्ग दुरूस्त केला जातो. याचा अर्थ मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे अधिकारी व्यवस्थित नियोजन करीत नसल्याचे दिसून येते. जिल्हाधिकाºयांनी स्वत: लक्ष घालून रस्त्यांची निवड करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.