शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

गुळगुळीत रस्त्यांवरच डांबराचा थर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 22:23 IST

तालुक्यातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली असताना मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून चांगल्या स्थितीतीलच रस्त्यांच्या दुरूस्तीचे काम केले जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा प्रताप : चंदनखेडी फाटा ते चंदनखेडी पर्यंतचा रस्ता चांगला असतानाही दुरूस्ती केली

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : तालुक्यातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली असताना मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून चांगल्या स्थितीतीलच रस्त्यांच्या दुरूस्तीचे काम केले जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.चामोर्शी- आष्टी मार्गावरील अनखोडा गावाच्या अलिकडे चंदनखेडी फाटा येते. चंदनखेडीपर्यंतचा दोन किमीचा रस्ता अतिशय सुस्थितीत होता. अगदी काही ठिकाणीच थोडेफार खड्डे पडले आहेत. त्यामुळे किमान दोन वर्ष या रस्त्याची दुरूस्ती झाली नसती तरी चालले असते. मात्र मुख्यमंत्री सडक योजनेतून या रस्त्याची निवड करण्यात आली. त्यासाठी निधी मंजूर करून कामही पूर्ण करण्यात आले. अगोदरच चांगल्या स्थितीत असलेल्या मार्गावर केवळ थोडाफार मुलामा टाकून काम उरकण्यात आले आहे. अगोदरच मार्गाची चांगली स्थिती असतानाही सदर मार्ग कसा काय मंजूर करण्यात आला, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.तालुक्यातील अनेक मार्गांची अवस्था अंत्यंत वाईट आहे. काही मार्गांवर मागील दहा वर्षांपासून साधे मुरूमसुद्धा पडले नाही. दहा वर्षांत डांबर पूर्णपणे निघून गेल्याने केवळ माती व गिट्टी शिल्लक आहे. जागोजागी खड्डे पडले आहेत. अशा मार्गांची दुरूस्ती करण्यास प्राधान्य देणे आवश्यक असतानाही केवळ कमिशनपोटी मुख्यमंत्री सडक योजनेचे प्रशासन चांगल्या रस्त्यांवर डांबरचा मुलामा देण्याचे काम करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.तालुक्यातीलच चामोर्शी-भिवापूर-वालसरा हा मार्ग अतिशय खड्डेमय आहे. मात्र सदर मार्ग दुरूस्तीसाठी मंजुरी दिली नाही. या मार्गावरील गावांमधील वाहनधारक कमालीचे त्रस्त असतानाही सदर मार्ग प्रशासनाला दिसत नाही काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.मुख्यमंत्री सडक योजनेच्या नियमांची ऐसीतैशीज्या गावांमधील रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट आहे. अशा गावांमधील रस्ते दुरूस्तीला प्राधान्य मिळावे या मुख्य उद्देशाने प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री ग्राम सडक योजना मागील तीन वर्षांपासून राज्यात सुरू करण्यात आली आहे. मात्र ग्राम सडक योजनेच्या या मुख्य उद्देशालाच हरताळ फासून कमिशनपोटी ज्या रस्त्यांची स्थिती अतिशय चांगली आहे. असे मार्ग मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत नियोजनात घेतले जात आहेत. ही अतिशय गंभीर बाब आहे. चांगल्या रस्त्यावर डांबर अंथरले जात असेल तर इतर योजना व मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत फरक काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.एकीकडे मार्ग दुरूस्तीसाठी नागरिक शासनाकडे निवेदन पाठवितात. मात्र निधी नसल्याचे कारण सांगून रस्त्याची दुरूस्ती केली जात नाही. तर दुसरीकडे चांगला मार्ग दुरूस्त केला जातो. याचा अर्थ मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे अधिकारी व्यवस्थित नियोजन करीत नसल्याचे दिसून येते. जिल्हाधिकाºयांनी स्वत: लक्ष घालून रस्त्यांची निवड करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.