शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

गुळगुळीत रस्त्यांवरच डांबराचा थर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 22:23 IST

तालुक्यातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली असताना मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून चांगल्या स्थितीतीलच रस्त्यांच्या दुरूस्तीचे काम केले जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा प्रताप : चंदनखेडी फाटा ते चंदनखेडी पर्यंतचा रस्ता चांगला असतानाही दुरूस्ती केली

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : तालुक्यातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली असताना मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून चांगल्या स्थितीतीलच रस्त्यांच्या दुरूस्तीचे काम केले जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.चामोर्शी- आष्टी मार्गावरील अनखोडा गावाच्या अलिकडे चंदनखेडी फाटा येते. चंदनखेडीपर्यंतचा दोन किमीचा रस्ता अतिशय सुस्थितीत होता. अगदी काही ठिकाणीच थोडेफार खड्डे पडले आहेत. त्यामुळे किमान दोन वर्ष या रस्त्याची दुरूस्ती झाली नसती तरी चालले असते. मात्र मुख्यमंत्री सडक योजनेतून या रस्त्याची निवड करण्यात आली. त्यासाठी निधी मंजूर करून कामही पूर्ण करण्यात आले. अगोदरच चांगल्या स्थितीत असलेल्या मार्गावर केवळ थोडाफार मुलामा टाकून काम उरकण्यात आले आहे. अगोदरच मार्गाची चांगली स्थिती असतानाही सदर मार्ग कसा काय मंजूर करण्यात आला, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.तालुक्यातील अनेक मार्गांची अवस्था अंत्यंत वाईट आहे. काही मार्गांवर मागील दहा वर्षांपासून साधे मुरूमसुद्धा पडले नाही. दहा वर्षांत डांबर पूर्णपणे निघून गेल्याने केवळ माती व गिट्टी शिल्लक आहे. जागोजागी खड्डे पडले आहेत. अशा मार्गांची दुरूस्ती करण्यास प्राधान्य देणे आवश्यक असतानाही केवळ कमिशनपोटी मुख्यमंत्री सडक योजनेचे प्रशासन चांगल्या रस्त्यांवर डांबरचा मुलामा देण्याचे काम करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.तालुक्यातीलच चामोर्शी-भिवापूर-वालसरा हा मार्ग अतिशय खड्डेमय आहे. मात्र सदर मार्ग दुरूस्तीसाठी मंजुरी दिली नाही. या मार्गावरील गावांमधील वाहनधारक कमालीचे त्रस्त असतानाही सदर मार्ग प्रशासनाला दिसत नाही काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.मुख्यमंत्री सडक योजनेच्या नियमांची ऐसीतैशीज्या गावांमधील रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट आहे. अशा गावांमधील रस्ते दुरूस्तीला प्राधान्य मिळावे या मुख्य उद्देशाने प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री ग्राम सडक योजना मागील तीन वर्षांपासून राज्यात सुरू करण्यात आली आहे. मात्र ग्राम सडक योजनेच्या या मुख्य उद्देशालाच हरताळ फासून कमिशनपोटी ज्या रस्त्यांची स्थिती अतिशय चांगली आहे. असे मार्ग मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत नियोजनात घेतले जात आहेत. ही अतिशय गंभीर बाब आहे. चांगल्या रस्त्यावर डांबर अंथरले जात असेल तर इतर योजना व मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत फरक काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.एकीकडे मार्ग दुरूस्तीसाठी नागरिक शासनाकडे निवेदन पाठवितात. मात्र निधी नसल्याचे कारण सांगून रस्त्याची दुरूस्ती केली जात नाही. तर दुसरीकडे चांगला मार्ग दुरूस्त केला जातो. याचा अर्थ मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे अधिकारी व्यवस्थित नियोजन करीत नसल्याचे दिसून येते. जिल्हाधिकाºयांनी स्वत: लक्ष घालून रस्त्यांची निवड करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.