शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

तीन महिन्यांत सहा हजार वृक्षांची तोड

By admin | Updated: November 27, 2014 23:34 IST

जानेवारी ते मार्च २०१४ या तीन महिन्यांच्या कालावधीत गडचिरोली वनवृत्तातील सुमारे ५ हजार ७९९ वृक्षांची तोड करण्यात आली आहे. यामुळे वनविभागाचे ६४ लाख रूपयांचे एकूण नुकसान झाले आहे.

गडचिरोली : जानेवारी ते मार्च २०१४ या तीन महिन्यांच्या कालावधीत गडचिरोली वनवृत्तातील सुमारे ५ हजार ७९९ वृक्षांची तोड करण्यात आली आहे. यामुळे वनविभागाचे ६४ लाख रूपयांचे एकूण नुकसान झाले आहे. गडचिरोली जिल्ह्याचा ७८ टक्के भाग जंगलाने व्यापला आहे. या जंगलाच्या संरक्षणाच्या दृष्टीकोणातून गडचिरोली या एका जिल्ह्यासाठी स्वतंत्र वनवृत्त कार्यालय स्थापन करण्यात आले आहे. या कार्यालयांतर्गत हजारो वनकर्मचारी व अधिकारी कार्यरत आहेत. वनतस्करी थांबविण्यासाठी वनविभागाने अनेक उपाययोजना योजल्या असल्या तरी वनतस्करी रोखण्यात वनविभागाला पाहिजे त्या प्रमाणात यश मिळाले नाही. जानेवारी ते मार्च २०१४ या तीन महिन्यांच्या कालावधीत सुमारे ५ हजार ७९९ वृक्षांची तोड करण्यात आली आहे. यामध्ये एकट्या सागवानाची ७४३ वृक्ष आहेत. या वृक्षतोडीमुळे वनविभागाचे एकूण ६४ लाख ५५ हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. तर सागवानाच्या वृक्षतोडीमुळे ४८ लाख ८२ हजार रूपयांचे नुकसान वनविभागाला सहन करावे लागले आहे. या तीन महिन्यांच्या कालावधीत वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुमारे १ कोटी ८४ लाख ३९ हजार रूपयांचा सागवान जप्त केला आहे. तर ११ लाख ९ हजार रूपये किंमतीच्या इतर वृक्षांचे लाकूड जप्त करण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सागवान संपूर्ण देशात प्रसिध्द आहे. हे सागवान वजनाने अत्यंत हलके व टिकावू असल्याने देशभरात या सागवानाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. विशेष करून सिरोंचा तालुक्यातील सागवान संपूर्ण देशात प्रसिध्द आहे. नेमका हाच भाग तेलंगणा राज्याच्या सीमेला लागून आहे. तेलंगणा राज्यातही सिरोंचाचा सागवान म्हणून प्रसिध्द आहे. यापासून बनविलेल्या वस्तुंना बाजारपेठेत ४ ते ५ पट अधिक किंमत मिळते. त्यामुळे तेलंगणा राज्यातील तस्करांकडून मोठ्या प्रमाणात वनतस्करी केली जाते. वनतस्करी रोखण्यासाठी वनविभागाकडून अनेक प्रयत्न केले जात असले तरी वनतस्करांपुढे हे प्रयत्न थिटे पडत असल्याचे दिसून येत आहे. (नगर प्रतिनिधी)