शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
2
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
3
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
4
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
5
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
6
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
7
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
9
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
10
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
11
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
12
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
13
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
14
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
15
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
16
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
17
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
18
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
19
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
20
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!

सिरोंचा तालुक्यात सिंचन योजनेचा पुरता बट्ट्याबोळ

By admin | Updated: December 28, 2015 01:37 IST

तालुक्यालगतच्या सीमावर्ती तेलंगणा व छत्तीसगड राज्यातील शेवटची गावे सिंचन सुविधेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होत आहेत.

शेतकरी संकटातच : बारमाही वाहणाऱ्या नद्यांचा उपयोग नाही; प्रशासनाच्या नियोजनशून्यतेचा फटकासिरोंचा : तालुक्यालगतच्या सीमावर्ती तेलंगणा व छत्तीसगड राज्यातील शेवटची गावे सिंचन सुविधेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होत आहेत. मात्र शासन व प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे सिरोंचा तालुक्यातील सिंचन योजनेचा बट्ट्याबोळ झाला. परिणामी बारमाही वाहणाऱ्या नद्या असूनही सिरोंचा तालुका सिंचनाच्या बाबतीत कोरडाच असल्याचे दिसून येत आहे. प्राणहिता, गोदावरी व इंद्रावती या बारमाही वाहणाऱ्या नद्या असूनही काठावरील रेगुंठा, मुयाबिनपेठा, नरसिंहपल्ली, कोरला, किष्टय्यापल्ली, रामेशगुड्डम, झिंगानूर, मंगीगुड्डम, वडदेल्ली भागातील असंख्य गावे अद्यापही सिंचन सुविधेच्या प्रतीक्षेत आहे. ९० च्या दशकात जिल्हा परिषद यंत्रणेमार्फत दोन कोटी रूपये खर्च करून तालुक्यात उच्च क्षमतेच्या १२९ कुपनलिका खोदण्यात आल्या. यापैकी केवळ ४९ कुपनलिका सुरू झाल्या. उर्वरित ८० कुपनलिका सुरू होण्यापूर्वीच आदी सुरू झालेल्या ४९ कुपनलिका बंद पडल्या. सद्य:स्थिती १२९ कुपनलिकेचे अस्तित्वच राहिले नाही. पाणी वाटप सहकारी संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जमिनी सिंचनाखाली आणण्याच्या उदात हेतुला हरताळ फासला गेला. अनेक संस्थांनी विद्युत मंडळाकडे डिमांडचा भरणा करूनही विद्युत जोडणी करण्यात आली नाही. याशिवाय जिल्हा परिषदेच्या अखत्यारित सिरोंचा तालुक्यातील सात कोल्हापुरी बंधारे व दोन तलाव आहेत. मात्र दुरावस्थेमुळे या बंधारे व तलावाचाही या भागातील शेतकऱ्यांना फारसा उपयोग होत नाही. अमरादी कोल्हापुरी बंधारा अंकिसा चक, असरअल्ली, गोलागुड्डम, सुंकरल्ली, मुयाबिनपेठा, नरसिंहपल्ली येथील बंधारेही दुरावस्थेत आहे. कारसपल्ली व सिरकोंडा येथे नवीन सिंचन तलाव आहेत. सिरोंचालगतची धर्मपुरी उपसा सिंचन योजना मागील ३० वर्षांपासून रखडली आहे. रेगुंठा सिंचन योजना ही अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. सीमावर्तीय तेलंगणा व छत्तीसगड राज्याकडून प्राणहिता, गोदावरी व इंद्रावती या नद्यांचा पुरेपूर उपयोग केला जात आहे. (तालुका प्रतिनिधी)लाखो रूपयांचा खर्च व्यर्थसिरोंचा तालुक्यातील सात कोल्हापुरी बंधाऱ्याच्या बांधकामासाठी २५ लाख ७४ हजार ८०४ रूपयांचा खर्च झाला. त्यानंतर २० लाख १७ हजार ३९१ रूपये दुरूस्तीवर खर्च करण्यात आले. सिरकोंडा तलावाच्या बांधकामासाठी ६ लाख ८५ हजार रूपयांचा खर्च आला. याशिवाय दुरूस्तीवर ३ लाख २० हजार रूपयांचा खर्च करण्यात आला. कारसपल्ली तलावासाठी सात लाखांचा खर्च करण्यात आला असून दुरूस्तीवर ३ लाख ७० हजार रूपयांचा खर्च प्रशासनाने केला. या तलाव व बंधाऱ्याची दरवर्षी दुरूस्ती केली जाते. मात्र शेतकऱ्यांना प्रत्यक्षात सिंचन सुविधा मिळत नाही. परिणामी या भागातील शेतकरी दरवर्षी दुष्काळाच्या संकटात सापडतात.