शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

सिरोंचा तालुक्यात सिंचन योजनेचा पुरता बट्ट्याबोळ

By admin | Updated: December 28, 2015 01:37 IST

तालुक्यालगतच्या सीमावर्ती तेलंगणा व छत्तीसगड राज्यातील शेवटची गावे सिंचन सुविधेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होत आहेत.

शेतकरी संकटातच : बारमाही वाहणाऱ्या नद्यांचा उपयोग नाही; प्रशासनाच्या नियोजनशून्यतेचा फटकासिरोंचा : तालुक्यालगतच्या सीमावर्ती तेलंगणा व छत्तीसगड राज्यातील शेवटची गावे सिंचन सुविधेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होत आहेत. मात्र शासन व प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे सिरोंचा तालुक्यातील सिंचन योजनेचा बट्ट्याबोळ झाला. परिणामी बारमाही वाहणाऱ्या नद्या असूनही सिरोंचा तालुका सिंचनाच्या बाबतीत कोरडाच असल्याचे दिसून येत आहे. प्राणहिता, गोदावरी व इंद्रावती या बारमाही वाहणाऱ्या नद्या असूनही काठावरील रेगुंठा, मुयाबिनपेठा, नरसिंहपल्ली, कोरला, किष्टय्यापल्ली, रामेशगुड्डम, झिंगानूर, मंगीगुड्डम, वडदेल्ली भागातील असंख्य गावे अद्यापही सिंचन सुविधेच्या प्रतीक्षेत आहे. ९० च्या दशकात जिल्हा परिषद यंत्रणेमार्फत दोन कोटी रूपये खर्च करून तालुक्यात उच्च क्षमतेच्या १२९ कुपनलिका खोदण्यात आल्या. यापैकी केवळ ४९ कुपनलिका सुरू झाल्या. उर्वरित ८० कुपनलिका सुरू होण्यापूर्वीच आदी सुरू झालेल्या ४९ कुपनलिका बंद पडल्या. सद्य:स्थिती १२९ कुपनलिकेचे अस्तित्वच राहिले नाही. पाणी वाटप सहकारी संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जमिनी सिंचनाखाली आणण्याच्या उदात हेतुला हरताळ फासला गेला. अनेक संस्थांनी विद्युत मंडळाकडे डिमांडचा भरणा करूनही विद्युत जोडणी करण्यात आली नाही. याशिवाय जिल्हा परिषदेच्या अखत्यारित सिरोंचा तालुक्यातील सात कोल्हापुरी बंधारे व दोन तलाव आहेत. मात्र दुरावस्थेमुळे या बंधारे व तलावाचाही या भागातील शेतकऱ्यांना फारसा उपयोग होत नाही. अमरादी कोल्हापुरी बंधारा अंकिसा चक, असरअल्ली, गोलागुड्डम, सुंकरल्ली, मुयाबिनपेठा, नरसिंहपल्ली येथील बंधारेही दुरावस्थेत आहे. कारसपल्ली व सिरकोंडा येथे नवीन सिंचन तलाव आहेत. सिरोंचालगतची धर्मपुरी उपसा सिंचन योजना मागील ३० वर्षांपासून रखडली आहे. रेगुंठा सिंचन योजना ही अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. सीमावर्तीय तेलंगणा व छत्तीसगड राज्याकडून प्राणहिता, गोदावरी व इंद्रावती या नद्यांचा पुरेपूर उपयोग केला जात आहे. (तालुका प्रतिनिधी)लाखो रूपयांचा खर्च व्यर्थसिरोंचा तालुक्यातील सात कोल्हापुरी बंधाऱ्याच्या बांधकामासाठी २५ लाख ७४ हजार ८०४ रूपयांचा खर्च झाला. त्यानंतर २० लाख १७ हजार ३९१ रूपये दुरूस्तीवर खर्च करण्यात आले. सिरकोंडा तलावाच्या बांधकामासाठी ६ लाख ८५ हजार रूपयांचा खर्च आला. याशिवाय दुरूस्तीवर ३ लाख २० हजार रूपयांचा खर्च करण्यात आला. कारसपल्ली तलावासाठी सात लाखांचा खर्च करण्यात आला असून दुरूस्तीवर ३ लाख ७० हजार रूपयांचा खर्च प्रशासनाने केला. या तलाव व बंधाऱ्याची दरवर्षी दुरूस्ती केली जाते. मात्र शेतकऱ्यांना प्रत्यक्षात सिंचन सुविधा मिळत नाही. परिणामी या भागातील शेतकरी दरवर्षी दुष्काळाच्या संकटात सापडतात.