शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

सिरोंचा-आलापल्ली राष्ट्रीय महामार्गाची ख्याती पोहोचतेय महाराष्ट्रात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:48 IST

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सी ३५३ हा साकोलीवरून येऊन गडचिरोली, चामोर्शी, आलापल्ली, सिरोंचा आणि पुढे तेलंगणातील वरंगल येथे समाप्त होतो. ...

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सी ३५३ हा साकोलीवरून येऊन गडचिरोली, चामोर्शी, आलापल्ली, सिरोंचा आणि पुढे तेलंगणातील वरंगल येथे समाप्त होतो. सिरोंचा-आलापल्ली महामार्गाचे मागील दोन वर्षापूर्वी कोट्यवधी रुपये खर्च? करून बांधकाम करण्यात आले. पण पुन्हा या मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने आता ते बुजविण्याचे काम सुरू आहे. पण त्या कामातही दर्जा नाही.

दररोज शेकडो नागरिकांना या मार्गावरून तालुका मुख्यालयात कार्यालयीन कामे अथवा बँकिंगच्या कामासाठी यावे लागते. त्यामुळे प्रवाशांना आपले वाहन किंवा बस खड्ड्यातून जाताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. नांदगाव फाट्याजवळ व अमरावती गावाजवळ खड्ड्यांमुळे ट्रक फसून वाहतूक ठप्प होण्याची बाब नित्याचीच झाली होती. या राष्ट्रीय महामार्गाची अवस्था गंभीर असल्याची माहिती वरिष्ठ अभियंत्यांना असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते.

मागील दोन वर्षांपूर्वी व ९ महिन्यांपूर्वी या मार्गावर कोट्यवधींचा निधी खर्च? करूनही मार्गावर एवढे मोठमोठे खड्डे कसे, याची चौकशी आतापर्यंत कोणीही केलेली नाही. त्यावरून अधिकारी-पदाधिकाऱ्यांची साखळीच ्असल्याचे दिसून येते.

खड्डे बुजवल्यानंतरही काही दिवसांनी पुन्हा या महामार्गाची अवस्था वाईट होणार यात शंका नाही. याचा त्रास सामान्य नागरिकांना भोगावा लागत आहे.

गेल्या पावसाळ्यात राष्ट्रीय महामार्गावरचे डांबरीकरण उखडून माती बाहेर पडून चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले होते. त्यात ट्रक फसून अनेक वेळा ट्रॅफिक जाम झाला. अशा स्थितीत एखादा रुग्ण त्यात फसल्यास आणि त्याचे बरेवाईट झाल्यास त्याला जबाबदार कोण, हा प्रश्न अनुत्तरित आहे.

(बॉक्स)

खड्डे बुजवण्यावर आतापर्यंत किती खर्च?

सध्या सुरू असलेले खड्डे बुजवण्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. वापरलेली गिट्टी आणि डांबर योग्य दर्जाचे नसून खड्ड्यांमध्ये डांबर कमी आणि गिट्टीच जास्त टाकली जात आहे. दरवर्षी खड्डे बुजविण्यासाठी असा कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च? केला जातो. मात्र काम योग्यप्रकारे होत नाही आणि परिस्थिती जैसे थे होते. आतापर्यंत अशा खड्डे बुजवण्यावर किती रुपयांचा निधी खर्च? झाला याचाही हिशेब राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.