शहरं
Join us  
Trending Stories
1
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
2
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
3
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
4
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
5
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
6
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
7
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
8
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
9
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
10
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
11
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
12
AUS vs ENG: डोक्यात निवृत्तीचा विचार, मनात भीती… आणि त्यानेच सामना फिरवला!
13
कौतुकास्पद! आईने दागिने विकून शिकवलं, १० वेळा अपयश आलं पण लेकाने वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं
14
विराट कोहलीचा VIDEO घेण्यासाठी बस ड्रायव्हरची भन्नाट 'आयडिया', सोशल मीडियावर क्लिप VIRAL
15
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
16
शाकंभरी नवरात्र २०२५: शाकंभरी मातेच्या कृपेने 'या' राशींचे उजळणार भाग्य; २०२६ ची होणार स्वप्नवत सुरुवात!
17
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
18
Battle Of Galwan Teaser: मौत से क्या डरना...! 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर, 'या' दिवशी सिनेमा रिलीज होणार
19
जिवलग जीवाचा... विराट कोहली!! स्वत:चीच विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिलं एकदम खास 'गिफ्ट'
20
सोन्या-चांदीची भरारी, विदेशींची माघार अन् भारतीयांचा एल्गार! हे वर्ष कोणासाठी ठरलं फायद्याचं
Daily Top 2Weekly Top 5

झुडपी जंगलाचा तिढा कायम

By admin | Updated: August 7, 2014 23:58 IST

जिल्ह्याच्या विकासात अडथळा ठरत असलेले झुडपी जंगल क्षेत्र मुक्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यामुळे जिल्हा विकासासाठी आशा निर्माण झाल्या होत्या. परंतु शासनाने निर्णय

गडचिरोली : जिल्ह्याच्या विकासात अडथळा ठरत असलेले झुडपी जंगल क्षेत्र मुक्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यामुळे जिल्हा विकासासाठी आशा निर्माण झाल्या होत्या. परंतु शासनाने निर्णय घेतल्यानंतर अनेक दिवसांचा कालावधी लोटूनही अजूनपर्यंत यासंदर्भात परिपत्रक निर्गमित करण्यात आले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक महत्वपूर्ण प्रकल्प रखडण्याची भीती व्यक्त होत आहे. वनकायद्याच्या कचाट्यामुळे जिल्ह्यातील अनेक प्रकल्प रखडलेले आहेत. जिल्ह्यात १५ हजार ६० हेक्टर क्षेत्रावर झुडपी जंगल आहे. यापैकी १ हजार ३२३ हेक्टर क्षेत्रातील झुडपी जंगलावर अतिक्रमण करण्यात आले आहे. ५ हजार ८७६ हेक्टर झुडपी जमीन वनोत्तर विभागात असल्याची माहिती आहे. राज्य शासनाच्यावतीने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सिंचन प्रकल्प मंजूर करण्यात आले होते. अनेक सिंचन प्रकल्पांना वनविभागाच्या जागेची आवश्यकता आहे. शासनाच्यावतीने झुडपी जंगलाचा कायदा करण्यात आल्यानंतर अनेक सिंचन प्रकल्प रखडलेले आहेत. यापैकी जिल्ह्यातील अनेक प्रकल्पाचा खर्च आवाक्याबाहेर गेल्यानंतर शासनाच्यावतीने जिल्ह्यात उपसिंचन योजना मंजूर करण्यात आल्या होत्या. मात्र उपसा सिंचन योजनांनाही शेकडो हेक्टर वनजमिनीची गरज आहे. वनविभागाच्या धोरणानुसार एखाद्या प्रकल्पास वनविभागाची जागा मागितल्यानंतर त्या जागेच्या दुप्पट जागा तसेच पर्यायी वनिकरण करण्यासाठी रक्कम संबंधीत विभागास अदा करावी लागत होती. मात्र पर्यायी वनजमीन न मिळाल्याने जिल्ह्यातील उपसा सिंचन, लघू सिंचन प्रकल्प रखडलेले आहेत. मार्च महिन्यात शासनाच्यावतीने विदर्भातील झुडपी जंगल मुक्त करून त्यावर सार्वजनिक हिताचे प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यामुळे जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल. अनेकांना रोजगारा प्राप्त होईल, अशी आशा नागरिकांनी व्यक्त केली होती. परंतु तीन ते चार महिन्याचा कालावधी लोटूनही अद्यापही शासनाच्यावतीने या संदर्भात परिपत्रक काढण्यात आले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक प्रकल्प रखडण्याची भीती व्यक्त होत आहे. शासनाने घोषणा करूनही अजूनपर्यंत झुडपी जंगल वनकायद्याच्या कचाट्यातून मुक्त करण्याच्या निर्णयाचे परिपत्रक का काढले नाही, शासन झुडपी जंगल मुक्त करण्याबाबत उदासीन का आहे, असा परखड सवाल जिल्ह्यातील नागरिकांकडून होत आहे. (शहर प्रतिनिधी)