शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

लिंक फेलचा पोस्टाच्या ग्राहकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 00:38 IST

येथील पोस्ट आॅफिसमधील सॉफ्टवेअरमध्ये बिघाड निर्माण झाल्याने मागील तीन दिवसांपासून लिंक फेल झाली आहे. त्यामुळे खातेदारांची कामे ठप्प पडली आहेत. ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना परत जावे लागत असल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत.

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांची पदे रिक्त : खातेदारांना पैशासाठी माराव्या लागत आहेत वेळोवेळी चकरा

ऑनलाईन लोकमतआष्टी : येथील पोस्ट आॅफिसमधील सॉफ्टवेअरमध्ये बिघाड निर्माण झाल्याने मागील तीन दिवसांपासून लिंक फेल झाली आहे. त्यामुळे खातेदारांची कामे ठप्प पडली आहेत. ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना परत जावे लागत असल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत.आष्टी पोस्ट कार्यालयाच्या अंतर्गत सुमारे १७ गावे आहेत. पोस्टाच्या मार्फत अनेक योजना राबविल्या जातात. डाक विभाग केंद्र सरकारच्या मार्फत चालविला जात असल्याने या विभागाच्या योजनांवर नागरिकांचा विश्वास आहे. त्यामुळे शेकडो नागरिक पोस्टामध्ये पैसे भरतात. परिणामी दरदिवशी या कार्यालयात ग्राहकांची मोठी गर्दी राहते. पोस्टाचे जवळपास सर्वच कामकाज आॅनलाईन झाले आहे. त्यामुळे कामकाज करण्यासाठी लिंक असणे आवश्यक आहे. पोस्टाच्या माध्यमातून आरडी कलेक्शन, मासिक ठेवी गोळा केल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून पोस्टामध्ये दरदिवशी लाखो रूपयांचे व्यवहार होतो. मात्र ग्राहकांना आरडी भरल्यानंतर पासबुक मिळण्यास विलंब होत आहे. अनेक ग्राहकांना मॅच्युरिटी झाल्यानंतर पैसे मिळण्यास चकरा माराव्या लागत आहेत. यापूर्वी आरडीची मॅच्युरिटी झाल्यानंतर धनादेश उपलब्ध होत होता. आता मात्र पोस्टाचे बचत खाते काढावे लागत आहे. मात्र बऱ्याचवेळा लिंक फेल राहते किंवा तांत्रिक बिघाड राहत असल्याने वेळेवर पैसे मिळत नाही. परिणामी ग्राहक कमालीचे त्रस्त झाले आहेत. यावर उपाय शोधावा, अशी मागणी होत आहे.दोन दिवसात समस्या लागणार मार्गीपोस्टातील लिंक फेलबाबत पोस्ट मास्टर ए.यू. गोखरे यांना विचारले असता, मागील एक महिन्यापासून रात्री १० वाजेपर्यंत पोस्टात बसून ग्राहकांचे पासबुक अपडेट करण्याचे काम सुरू आहे. या कार्यालयात कर्मचारी कमी आहेत. आठ दिवसांपूर्वी नवीन लिपीक रूजू झाला आहे. त्यामुळे सर्व ग्राहकांचे पासबुक तयार झाले आहेत. एक ते दोन दिवसांमध्ये सॉफ्टवेअरचे काम पूर्ण होऊन ग्राहकांना त्यांच्या मागणीप्रमाणे पैसे मिळतील. आजपर्यंत पोस्टातील लिपीक डेप्युटेशनवर दुसरीकडे राहत होता. त्यामुळे पोस्टाचा कारभार एकट्या पोस्ट मास्टरलाच सांभाळावा लागत होता. आता ही समस्या दूर होणार आहे.