शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

गडचिरोलीत पोहोचले मीठ तुटवड्याचे लोण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 05:00 IST

माणसाच्या भोजनातील मीठ हे आवश्यक घटक मानले जाते. मिठाशिवाय भोजन अथवा कुठल्या खाद्यपदार्थाला चव येत नाही. मीठ सहज उपलब्ध होत असल्याने कुणीही साठाही करून ठेवत नाही. विशेष म्हणजे बरेच दुकानदार मिठाच्या चुंगड्या दुकानाच्या बाहेर ठेवतात. अशी परिस्थिती असताना गेल्या तीन-चार दिवसांपासून धानोरा, कुरखेडा, कोरची तालुक्याच्या काही भागात कोरोना संचारबंदीच्या काळात मिठाचा तुटवडा निर्माण होत असल्याची अफवा पसरली.

ठळक मुद्देदुप्पट भावाने विक्री : गरजेपेक्षा अधिक प्रमाणात मिठाची खरेदी करण्यासाठी ग्रामीण नागरिकांची झुंबड

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मिठाचा तुटवडा निर्माण झाला असून आता मिठ मिळणार नाही, अशी अफवा छत्तीसगडमधून गडचिरोली जिल्ह्यात पोहोचली. कोरची, कुरखेडा, धानोरा तालुक्यानंतर आता हे अफवेचे लोण चक्क गडचिरोली शहरापर्यंत पोहोचले. बुधवारी दिवसभर ग्रामीण नागरिकांनी गडचिरोलीच्या बाजारपेठेत मीठ खरेदीसाठी एकच गर्दी केली होती. त्याचा गैरफायदा घेत अनेक व्यापाऱ्यांनी दुप्पट दराने मिठाची विक्री केली.माणसाच्या भोजनातील मीठ हे आवश्यक घटक मानले जाते. मिठाशिवाय भोजन अथवा कुठल्या खाद्यपदार्थाला चव येत नाही. मीठ सहज उपलब्ध होत असल्याने कुणीही साठाही करून ठेवत नाही. विशेष म्हणजे बरेच दुकानदार मिठाच्या चुंगड्या दुकानाच्या बाहेर ठेवतात. अशी परिस्थिती असताना गेल्या तीन-चार दिवसांपासून धानोरा, कुरखेडा, कोरची तालुक्याच्या काही भागात कोरोना संचारबंदीच्या काळात मिठाचा तुटवडा निर्माण होत असल्याची अफवा पसरली. अफवेचे हे लोण अर्ध्याअधिक जिल्ह्यात पसरले. परिणामी काही दिवसानंतर दुकानात मीठ उपलब्ध होणार नाही, असा अंदाज बांधून जिल्ह्यातील काही नागरिकांनी अधिकच्या मिठाची खरेदी करणे सुरू केले. काही व्यावसायिकांनी याचा फायदा घेत तुटवडा निर्माण होत असल्याच्या अफवेत भर घालून अधिक भावाने मीठाची विक्री केली.शहरातील त्रिमूर्ती चौक परिसरातील बाजारपेठ तसेच आठवडी बाजारातील किराणा दुकान परिसरातून सायकल व दुचाकीवरून मीठ नेल्या जात असल्याचे दिसत होते. एक किलो मीठाचे पाकिट २० रुपयाला विकल्या जाते. मात्र बुधवारी हे पाकिट ३० रुपयाला घेतल्याचे काही महिलांनी लोकमतला सांगितले. तुटवडा असल्याने वरूनच भाव वाढले, असे दुकानदाराने सांगितल्याचे या महिला म्हणाल्या.१६० रुपये किलोला मिळणारी मिठाची बॅग बुधवारी चक्क ४०० रुपये दराने विकली जात होती. विशेष म्हणजे माडेमुल येथील काही नागरिकांनी किराणा दुकानातून ४०० रुपयाला बॅग खरेदी केली. शहरातील काही विक्रेत्यांनी मात्र प्रामाणिकपणे मिठाचा तुटवडा नाही, गर्दी करू नका, असे सांगत मूळ दरात विक्री केली.भरपूर मीठ उपलब्ध, अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई- जिल्हाधिकारीगडचिरोली जिल्ह्याच्या काही तालुक्यांमध्ये मिठाचा तुटवडा असल्याची चुकीची अफवा पसरली असून जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा मिठाचा तुटवडा नाही. मोठ्या प्रमाणात मीठ साठा आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यामुळे खोट्या अफवांवर विश्वास ठेवून नागरिकांनी जास्तीच्या मिठाची खरेदी करू नये, असे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी स्पष्ट केले. कुरखेडा व धानोरा तालुक्यांमध्ये काही लोकांकडून चुकीची अफवा पसरवण्यात आली. मिठाचा तुटवडा असल्याबाबत कोणी अफवा पसरविल्यास त्याच्याविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत मीठ खरेदीसाठी रांगा लावू नयेत. अफवांवर विश्वास ठेवून लोकांनी जास्तीचे मीठ खरेदी केल्यामुळे संबंधित तालुक्यात मीठ संपल्याचे समोर आले आहे. दुकानदारांनी ग्राहकांकडून जास्तीचे पैसे घेऊन मीठ विक्री करू नये. येणाºया ग्राहकांना खरी माहिती द्यावी. कोणतीही अफवा पसरवत असल्याचे लक्षात आल्यास ताबडतोब प्रशासनाला कळवा आणि त्याबाबत खात्री करून घ्या, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले.फंटर ग्राहकांच्या माध्यमातून कारवाईची गरजमीठ हा आवश्यक खाद्यपदार्थ असल्याने तो मिळाला नाही तर कसे? या भितीपोटी ग्राहक अधिकचे पैसे देऊनही ते खरेदी करत आहेत. पण याबद्दल तक्रार देण्याच्या भानगडीत पडण्यास कोणीही नागरिक तयार नाही. पुढेही याबाबतच्या तक्रारी प्रशासनाला प्राप्त होतील याची शाश्वती नाही. त्यामुळे प्रशासन व पुरवठा विभागाने स्वत:च पुढाकार घेऊन फंटर ग्राहकाच्या माध्यमातून गडचिरोली शहरासह जिल्हाभरात मिठाच्या या काळाबाजाराची पोलखोल करावी आणि जादा दराने मिठाची विक्री करणाऱ्या संबंधित दुकानदारांवर कारवाई करावी, अशी अपेक्षा सूज्ञ नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.